शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

आता आमदार ठेवणार बिबट्यांवर ‘वॉच’ राज्य शासनाचे पत्र

By गणेश वासनिक | Updated: January 5, 2024 16:00 IST

जयंत पाटील, समीर कुणावार, प्रतिभा धानाेकार व आशिष जयस्वाल यासह १५ आमदारांवर सोपविली जबाबदारी

अमरावती : मतदार संघातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कडक निगराणी ठेवणाऱ्या आमदारांवर आता राज्य शासनाने बिबट्यांवर ‘वॉच’ ठेवण्याची जबाबदारी सोपविली आहे. त्याकरिता १५ आमदार मानवी वस्तीत ये-जा करणाऱ्या बिबट्यांवर नजर ठेवणार आहे. त्यामुळे आमदारांच्या मतदार संघात जाताना त्याला जरा विचार करावाच लागेल. मात्र, बिबट गेल्यास आमदार अधिकाऱ्यांप्रमाणे त्याला फैलावर घेतील का? असाही प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

वाघांचे संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी राज्यात सध्या सात व्याघ्र प्रकल्प आणि ४२ अभयारण्य आहेत. मात्र, बिबट्याची संख्या महाराष्ट्रात मोठ्या संख्येने वाढली आहे. जंगल अपुरे पडत असल्याने बिबट्यांची धाव मानवी वस्तीत सुरू आहे. काही ठिकाणी बिबट्याने उच्छाद मांडला आहे. मानवी वस्तीत बिबट्यांचा हैदोस वन विभागाच्या हाताबाहेर गेल्यामुळेच राज्य शासनाने आता बिबट्यांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील तब्बल १५ आमदारांवर जबाबदारी निश्चित केली आहे. हे आमदार बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी आराखडा व नियोजन वन विभागाला सांगतील. आता हे आमदार बिबट्याचा बंदोबस्त कसा करतील, हे येत्या काळात दिसून येईल, हे वास्तव आहे.१५ आमदार बिबट मोहिमेत

बिबट आणि मानव संघर्ष टाळण्यासाठी शासनाने १५ आमदार वन विभागाच्या मदतीला दिले आहेत. यात नागपूर विभागात समीर कुणावार व आशिष जयस्वाल, अमरावतीसाठी संजय कुंटे, यवतमाळ अशोक उईके व मदन येरावार, गडचिराेलीत कृष्णा गजबे, चंद्रपूर येथे प्रतिभा धानाेकार, कोल्हापूर विभागात अनिल बाबर, प्रकाश आविटकर, जयंत पाटील व मानसिंग नाईक, पुणेसाठी अतुल बैनके व अशोक पवार, ठाणे सुनील प्रभू तर नाशिकसाठी दिलीप बनकर अशी विभागनिहाय आमदारांची फौज बिबट्यांसाठी सज्ज आहे.