शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

आता आमदार ठेवणार बिबट्यांवर ‘वॉच’ राज्य शासनाचे पत्र

By गणेश वासनिक | Updated: January 5, 2024 16:00 IST

जयंत पाटील, समीर कुणावार, प्रतिभा धानाेकार व आशिष जयस्वाल यासह १५ आमदारांवर सोपविली जबाबदारी

अमरावती : मतदार संघातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कडक निगराणी ठेवणाऱ्या आमदारांवर आता राज्य शासनाने बिबट्यांवर ‘वॉच’ ठेवण्याची जबाबदारी सोपविली आहे. त्याकरिता १५ आमदार मानवी वस्तीत ये-जा करणाऱ्या बिबट्यांवर नजर ठेवणार आहे. त्यामुळे आमदारांच्या मतदार संघात जाताना त्याला जरा विचार करावाच लागेल. मात्र, बिबट गेल्यास आमदार अधिकाऱ्यांप्रमाणे त्याला फैलावर घेतील का? असाही प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

वाघांचे संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी राज्यात सध्या सात व्याघ्र प्रकल्प आणि ४२ अभयारण्य आहेत. मात्र, बिबट्याची संख्या महाराष्ट्रात मोठ्या संख्येने वाढली आहे. जंगल अपुरे पडत असल्याने बिबट्यांची धाव मानवी वस्तीत सुरू आहे. काही ठिकाणी बिबट्याने उच्छाद मांडला आहे. मानवी वस्तीत बिबट्यांचा हैदोस वन विभागाच्या हाताबाहेर गेल्यामुळेच राज्य शासनाने आता बिबट्यांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील तब्बल १५ आमदारांवर जबाबदारी निश्चित केली आहे. हे आमदार बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी आराखडा व नियोजन वन विभागाला सांगतील. आता हे आमदार बिबट्याचा बंदोबस्त कसा करतील, हे येत्या काळात दिसून येईल, हे वास्तव आहे.१५ आमदार बिबट मोहिमेत

बिबट आणि मानव संघर्ष टाळण्यासाठी शासनाने १५ आमदार वन विभागाच्या मदतीला दिले आहेत. यात नागपूर विभागात समीर कुणावार व आशिष जयस्वाल, अमरावतीसाठी संजय कुंटे, यवतमाळ अशोक उईके व मदन येरावार, गडचिराेलीत कृष्णा गजबे, चंद्रपूर येथे प्रतिभा धानाेकार, कोल्हापूर विभागात अनिल बाबर, प्रकाश आविटकर, जयंत पाटील व मानसिंग नाईक, पुणेसाठी अतुल बैनके व अशोक पवार, ठाणे सुनील प्रभू तर नाशिकसाठी दिलीप बनकर अशी विभागनिहाय आमदारांची फौज बिबट्यांसाठी सज्ज आहे.