शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

आता आमदार ठेवणार बिबट्यांवर ‘वॉच’ राज्य शासनाचे पत्र

By गणेश वासनिक | Updated: January 5, 2024 16:00 IST

जयंत पाटील, समीर कुणावार, प्रतिभा धानाेकार व आशिष जयस्वाल यासह १५ आमदारांवर सोपविली जबाबदारी

अमरावती : मतदार संघातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कडक निगराणी ठेवणाऱ्या आमदारांवर आता राज्य शासनाने बिबट्यांवर ‘वॉच’ ठेवण्याची जबाबदारी सोपविली आहे. त्याकरिता १५ आमदार मानवी वस्तीत ये-जा करणाऱ्या बिबट्यांवर नजर ठेवणार आहे. त्यामुळे आमदारांच्या मतदार संघात जाताना त्याला जरा विचार करावाच लागेल. मात्र, बिबट गेल्यास आमदार अधिकाऱ्यांप्रमाणे त्याला फैलावर घेतील का? असाही प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

वाघांचे संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी राज्यात सध्या सात व्याघ्र प्रकल्प आणि ४२ अभयारण्य आहेत. मात्र, बिबट्याची संख्या महाराष्ट्रात मोठ्या संख्येने वाढली आहे. जंगल अपुरे पडत असल्याने बिबट्यांची धाव मानवी वस्तीत सुरू आहे. काही ठिकाणी बिबट्याने उच्छाद मांडला आहे. मानवी वस्तीत बिबट्यांचा हैदोस वन विभागाच्या हाताबाहेर गेल्यामुळेच राज्य शासनाने आता बिबट्यांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील तब्बल १५ आमदारांवर जबाबदारी निश्चित केली आहे. हे आमदार बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी आराखडा व नियोजन वन विभागाला सांगतील. आता हे आमदार बिबट्याचा बंदोबस्त कसा करतील, हे येत्या काळात दिसून येईल, हे वास्तव आहे.१५ आमदार बिबट मोहिमेत

बिबट आणि मानव संघर्ष टाळण्यासाठी शासनाने १५ आमदार वन विभागाच्या मदतीला दिले आहेत. यात नागपूर विभागात समीर कुणावार व आशिष जयस्वाल, अमरावतीसाठी संजय कुंटे, यवतमाळ अशोक उईके व मदन येरावार, गडचिराेलीत कृष्णा गजबे, चंद्रपूर येथे प्रतिभा धानाेकार, कोल्हापूर विभागात अनिल बाबर, प्रकाश आविटकर, जयंत पाटील व मानसिंग नाईक, पुणेसाठी अतुल बैनके व अशोक पवार, ठाणे सुनील प्रभू तर नाशिकसाठी दिलीप बनकर अशी विभागनिहाय आमदारांची फौज बिबट्यांसाठी सज्ज आहे.