शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
3
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
4
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
5
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
6
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
7
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
8
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
9
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
10
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
11
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
12
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
13
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
14
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
15
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
16
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
17
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
18
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
19
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
20
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO

बंडोबांना थंड करण्यासाठी आता राजकीय खेळींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:14 IST

अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आता माघारीसाठी खेळी खेळली जात आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ...

अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आता माघारीसाठी खेळी खेळली जात आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काही ठिकाणी हालचाली सुरू आहेत, तर काही ठिकाणी बंडोबांना थंडोबा करण्यासाठी गळ घातली जाणार आहे. माघार घेण्यासाठी जो काही शब्द दिलेला आहे, तो भविष्यात पाळला जाईलच याची खात्री कोण देणार, हा यक्षप्रश्न संबंधितांना सतावत आहे.

ज्या गावात काही पंचवार्षिकमध्ये सरपंचपद खुले आहे, त्या ठिकाणी आरक्षित जागांसाठी रस्सीखेच दिसून येत आहे. दाखल उमेदवारी अर्ज ४ जानेवारीला दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर लगेच उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. जिल्ह्यात निम्म्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींची निवडणूक होत असल्याने संपूर्ण जिल्हा ढवळून निघाला आहे. गावपातळीवर राजकारण कडाक्याच्या थंडीतही चांगलेच तापले आहे. यासाठी अनेक गावातील चौकाचौकांत, पारावर, हॉटेल, धाब्यावर चर्चेचे फड रंगत आहेत. गावाची धुरा कोणाच्या खांद्यावर द्यायची, यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. भावी सरपंचांचा आखडा तापला असून, कार्यकर्त्यांची जुळवाजुळव होत आहे. उमेदवारी अर्ज मोठया संख्येने दाखल झाले असून, आता माघार कोण-कोण घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. काही ठिकाणी बंडखोरी झाली असून, आघाड्या व पॅनेलचे गणित बिघडले आहे. बंडखोरी करणाऱ्यांवर माघार घेण्यासाठी दबाबतंत्राचा वापर केला जाऊ शकतो. त्यासाठी आमिषांची आयुधे तयार आहेत. माघारीची मुदत संपेपर्यंत गोडीगुलाबी कायम राहणार आहे.

बॉक्स

सरपंचपदाची शाश्वती नाही

निवडणूकीपूर्वीच सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होत असल्याने पूर्वी इच्छुक निवडणुकीतूनच माघार घ्यायचे. यंदाच्या निवडणुकीत सदस्य निवडीनंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार असल्याने निवडणुकीशिवाय पर्याय नाही अन् आरक्षण ठरल्याप्रमाणे निघेल, याची शाश्वती नाही. त्यामुळे अनेक इच्छुक ‘ऑक्सिजन’वर आहेत.