शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
2
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
3
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
4
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
5
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
6
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
7
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
8
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
9
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
10
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
11
जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये
12
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
13
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
14
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
15
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
16
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
17
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
18
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
19
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
20
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश

बंडोबांना थंड करण्यासाठी आता राजकीय खेळींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:14 IST

अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आता माघारीसाठी खेळी खेळली जात आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ...

अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आता माघारीसाठी खेळी खेळली जात आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काही ठिकाणी हालचाली सुरू आहेत, तर काही ठिकाणी बंडोबांना थंडोबा करण्यासाठी गळ घातली जाणार आहे. माघार घेण्यासाठी जो काही शब्द दिलेला आहे, तो भविष्यात पाळला जाईलच याची खात्री कोण देणार, हा यक्षप्रश्न संबंधितांना सतावत आहे.

ज्या गावात काही पंचवार्षिकमध्ये सरपंचपद खुले आहे, त्या ठिकाणी आरक्षित जागांसाठी रस्सीखेच दिसून येत आहे. दाखल उमेदवारी अर्ज ४ जानेवारीला दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर लगेच उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. जिल्ह्यात निम्म्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींची निवडणूक होत असल्याने संपूर्ण जिल्हा ढवळून निघाला आहे. गावपातळीवर राजकारण कडाक्याच्या थंडीतही चांगलेच तापले आहे. यासाठी अनेक गावातील चौकाचौकांत, पारावर, हॉटेल, धाब्यावर चर्चेचे फड रंगत आहेत. गावाची धुरा कोणाच्या खांद्यावर द्यायची, यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. भावी सरपंचांचा आखडा तापला असून, कार्यकर्त्यांची जुळवाजुळव होत आहे. उमेदवारी अर्ज मोठया संख्येने दाखल झाले असून, आता माघार कोण-कोण घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. काही ठिकाणी बंडखोरी झाली असून, आघाड्या व पॅनेलचे गणित बिघडले आहे. बंडखोरी करणाऱ्यांवर माघार घेण्यासाठी दबाबतंत्राचा वापर केला जाऊ शकतो. त्यासाठी आमिषांची आयुधे तयार आहेत. माघारीची मुदत संपेपर्यंत गोडीगुलाबी कायम राहणार आहे.

बॉक्स

सरपंचपदाची शाश्वती नाही

निवडणूकीपूर्वीच सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होत असल्याने पूर्वी इच्छुक निवडणुकीतूनच माघार घ्यायचे. यंदाच्या निवडणुकीत सदस्य निवडीनंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार असल्याने निवडणुकीशिवाय पर्याय नाही अन् आरक्षण ठरल्याप्रमाणे निघेल, याची शाश्वती नाही. त्यामुळे अनेक इच्छुक ‘ऑक्सिजन’वर आहेत.