शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

आता निर्धारित वेळेतच द्यावी लागणार सेवा

By admin | Updated: July 17, 2015 00:11 IST

महसूल कार्यालयांतर्गत वीस सेवा दिल्या जातात. त्या कमीत कमी आणि निर्धारित वेळेत दिल्या जाव्यात यासाठी १४ जुलैपासून सेवा कायदा लागू केल्याचे ...

अमरावती : महसूल कार्यालयांतर्गत वीस सेवा दिल्या जातात. त्या कमीत कमी आणि निर्धारित वेळेत दिल्या जाव्यात यासाठी १४ जुलैपासून सेवा कायदा लागू केल्याचे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी सांगितले. सेवा कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी, अन्यथा पाचशेपासून पाच हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. सेवा कायदा सर्व महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लागू आहे. महसूलतर्फे दिली जाणारी सर्व कामे वेळेतच द्यावी लागणार आहेत. अन्यथा तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, नायब तहसीलदारांना हा दंड केला जाणार आहे. सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच हा कायदा लागू केला आहे. सेवा कायद्याच्या माध्यमातून महसूल विभागातील पारदर्शी कामाची ही सुरुवात आहे. शासनाने केलेल्या या कायद्यामुळे गोरगरिबांसह इतरांनाही न्याय मिळेल. यासाठी प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने त्यांची जबाबदारी सुरळीतपणे पार पाडावी. या अंतर्गत २० सेवा दिल्या जाणार आहेत. यापैकी १५ सेवांबाबत सूचना दिल्या आहेत. उर्वरीत सेवा लवकरच जाहीर केल्या जातील. एरवी नागरिकांना शासकिय कार्यालयातून कामांसाठी लागणारे दस्तऐवज वेळेत मिळत नव्हते. त्यामुळे अनेक वेळा महत्वाच्या कामामध्ये दस्तऐवज उपलब्ध न झाल्याने अनेकांना शासकिय योजनांपासून वंचित रहावे लागत होते. विशेषत: विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशाच्या वेळी लागणारे जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र अशा महत्वाच्या दस्तऐवज मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र, या निर्णयामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांना आता शासकिय प्रमाणपत्र वेळेत मिळेल.(प्रतिनिधी)सेवा आणि सेवेचा कालावधीवय, राष्ट्रीयत्व, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न, अल्पभूधारक तसेच शेतकरी असल्याचा दाखला या सेवांसाठी असा कालावधी दिला जाईल. १५ दिवस जाते प्रमाणपत्र १५दिवस, नॉन क्रिमिलेअर, ऐपतीचा दाखला २१ दिवस, तात्पुरता रहिवासी दाखला, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, सातबारा, सांस्कृतिक कार्यक्रम परवाना, डोंगर दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र ७ दिवस, भूमिहीन शेतमजूर दाखला ५ दिवस, प्रकल्पग्रस्तांसाठी किंवा त्यांच्या वारसदारांना प्रमाणपत्राचे हस्तांतरण करण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी दिला जाईल. सेवा कायद्याची धास्तीसेवा कायदा राबविताना सुरुवातीला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दमछाक होणार आहे. कायद्यातील तरतुदींनुसार शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सर्व कामे वेळेतच करावी लागतील. यातच जिल्हा प्रशासनात काही पदे रिक्त आहेत. त्यामुळे सेवा कायदा राबविताना अधिकारी व कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.