शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

आता निर्धारित वेळेतच द्यावी लागणार सेवा

By admin | Updated: July 17, 2015 00:11 IST

महसूल कार्यालयांतर्गत वीस सेवा दिल्या जातात. त्या कमीत कमी आणि निर्धारित वेळेत दिल्या जाव्यात यासाठी १४ जुलैपासून सेवा कायदा लागू केल्याचे ...

अमरावती : महसूल कार्यालयांतर्गत वीस सेवा दिल्या जातात. त्या कमीत कमी आणि निर्धारित वेळेत दिल्या जाव्यात यासाठी १४ जुलैपासून सेवा कायदा लागू केल्याचे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी सांगितले. सेवा कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी, अन्यथा पाचशेपासून पाच हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. सेवा कायदा सर्व महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लागू आहे. महसूलतर्फे दिली जाणारी सर्व कामे वेळेतच द्यावी लागणार आहेत. अन्यथा तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, नायब तहसीलदारांना हा दंड केला जाणार आहे. सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच हा कायदा लागू केला आहे. सेवा कायद्याच्या माध्यमातून महसूल विभागातील पारदर्शी कामाची ही सुरुवात आहे. शासनाने केलेल्या या कायद्यामुळे गोरगरिबांसह इतरांनाही न्याय मिळेल. यासाठी प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने त्यांची जबाबदारी सुरळीतपणे पार पाडावी. या अंतर्गत २० सेवा दिल्या जाणार आहेत. यापैकी १५ सेवांबाबत सूचना दिल्या आहेत. उर्वरीत सेवा लवकरच जाहीर केल्या जातील. एरवी नागरिकांना शासकिय कार्यालयातून कामांसाठी लागणारे दस्तऐवज वेळेत मिळत नव्हते. त्यामुळे अनेक वेळा महत्वाच्या कामामध्ये दस्तऐवज उपलब्ध न झाल्याने अनेकांना शासकिय योजनांपासून वंचित रहावे लागत होते. विशेषत: विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशाच्या वेळी लागणारे जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र अशा महत्वाच्या दस्तऐवज मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र, या निर्णयामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांना आता शासकिय प्रमाणपत्र वेळेत मिळेल.(प्रतिनिधी)सेवा आणि सेवेचा कालावधीवय, राष्ट्रीयत्व, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न, अल्पभूधारक तसेच शेतकरी असल्याचा दाखला या सेवांसाठी असा कालावधी दिला जाईल. १५ दिवस जाते प्रमाणपत्र १५दिवस, नॉन क्रिमिलेअर, ऐपतीचा दाखला २१ दिवस, तात्पुरता रहिवासी दाखला, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, सातबारा, सांस्कृतिक कार्यक्रम परवाना, डोंगर दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र ७ दिवस, भूमिहीन शेतमजूर दाखला ५ दिवस, प्रकल्पग्रस्तांसाठी किंवा त्यांच्या वारसदारांना प्रमाणपत्राचे हस्तांतरण करण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी दिला जाईल. सेवा कायद्याची धास्तीसेवा कायदा राबविताना सुरुवातीला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दमछाक होणार आहे. कायद्यातील तरतुदींनुसार शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सर्व कामे वेळेतच करावी लागतील. यातच जिल्हा प्रशासनात काही पदे रिक्त आहेत. त्यामुळे सेवा कायदा राबविताना अधिकारी व कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.