शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

आता लालपरी धावू लागली पूर्ण क्षमतेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 05:00 IST

लॉकडाऊननंतर २० ऑगस्टपासून एसटी सेवा सुरू करण्यात आली. पण तेव्हापासून प्रत्येक आसन क्षमतेचे निर्णयक्षमतेवर म्हणजेच प्रत्येक आसनावर एकच प्रवासी बसला पाहिजे, असा नियम घातला होता. त्यामुळे एसटीला आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. परंतु शुक्रवार, १८ सप्टेंबरपासून पूर्ण सक्षमतेने एसटी बसेस धावत आहेत. प्रत्येक प्रवाशांच्या चेहऱ्याला मास्क आणि सोबत सॅनिटायझर बंधनकारक करण्यात आले आहे.

ठळक मुद्देएसटी महामंडळ : जिल्ह्यातील आठ आगारांतून अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :सर्वसामान्यांची जीवन वाहिनी असलेल्या ‘लालपरी’ची रुतलेली चाके आता धावू लागली आहे. आतापर्यंत अपूर्ण क्षमतेने धावणाऱ्या बसमधून आता पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतुकीस परवानगी मिळाली आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून याबाबतचे आदेश काढले असून, जिल्ह्यात याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.लॉकडाऊननंतर २० ऑगस्टपासून एसटी सेवा सुरू करण्यात आली. पण तेव्हापासून प्रत्येक आसन क्षमतेचे निर्णयक्षमतेवर म्हणजेच प्रत्येक आसनावर एकच प्रवासी बसला पाहिजे, असा नियम घातला होता. त्यामुळे एसटीला आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. परंतु शुक्रवार, १८ सप्टेंबरपासून पूर्ण सक्षमतेने एसटी बसेस धावत आहेत. प्रत्येक प्रवाशांच्या चेहऱ्याला मास्क आणि सोबत सॅनिटायझर बंधनकारक करण्यात आले आहे. विभागातील ८ आगारांमधून सध्या जवळपास ४०० बसफेऱ्या धावत आहेत. प्रत्येक बसमध्ये २२ प्रवाशांनी प्रवास करणेबाबत नियम असल्याने काही मार्ग सोडले तर अनेक मार्गावर एसटी तोट्यात जात होती. त्यामुळे नुकसान होत होते. प्रशासनाच्या या निर्णयामुळे एसटीला फायदा होणार आहे. विभागीय नियंत्रकांनी अमरावती, बडनेरा, चांदूरबाजार, मोर्शी, वरूड, परतवाडा, चांदूर रेल्वे, दर्यापूर या आठ एसटी आगारांमधून पूर्ण क्षमतेने बसेस सुरू करण्यास परवानगी दिली आहे.पाच महिने थांबली होती चाकेकोरोनाचा संसर्ग वाढण्यास सुरूवात झाल्यानंतर रस्त्यावरून धावणारी एसटी जागेवरच थांबवावी लागली. तब्बल पाच महिन्यांपासून लालपरी बंद ठेवल्याने महामंडळाचे उत्पन्नाचे स्त्रोत संपले होते. यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचाही प्रश्न निर्माण झाला होता. परिणामी प्रवासी सेवेसोबतच महामंडळाला मालवाहतूक सुरू करावी लागली.राज्य परिवहन महामंडळाने एसटी बसेस आता पूर्ण प्रवाशी क्षमतेने चालविण्यास परवानगी दिली आहे.त्यानुसार विभागातील आठही आगारांमधून २२ ऐवजी पूर्ण क्षमतेने बसव्दारे प्रवासी वाहतूक केली जात असून, प्रवाशांना मास्क, सॅनिटायझर वापर अनिवार्य केले आहे.- श्रीकांत गभणे,विभाग नियंत्रण

टॅग्स :state transportएसटी