शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

आता सिंचन विहिरींना बीडीओं देणार मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:23 IST

अमरावती : शासकीय सिंचन विहीर व अन्य योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणीना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे गरीब व ...

अमरावती : शासकीय सिंचन विहीर व अन्य योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणीना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे गरीब व गरजू शेतकरी योजनांचा लाभ घेण्यासाठी धजावत नाही. मात्र नवीन आदेशानुसार आता सिंचन विहिरींच्या मंजुरीचे अंतिम अधिकार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्याऐवजी पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना (बीडिओ) देण्यात आले आहेत. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास शेतकऱ्यांना होणारा मनस्ताप दूर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्य शासनाच्या २८ नोव्हेंबर २०१७ च्या निर्णयानुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विहिरींसाठी शेतकऱ्यांना यापूर्वी ग्रामसेवक, कृषी अधिकाऱ्यांकडे कागदोपत्राची पूर्तता केल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावा लागत होता. त्यानंतर सर्व पंचायत समित्यांच्या एकत्रिक अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केले जात होता. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रशासकीय कार्याची व्याप्ती मोठी असते. त्यामुळे मंजुरीला विलंब लागत होता. ही बाब लक्षात घेता शासनाने आता सिंचन विहीर मंजुरीचे अधिकार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना बहाल केले आहेत. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना आपल्या तालुक्याच्या ठिकाणीच यासंदर्भात सुविधा उपलब्ध झाल्याने कामाला होणार विलंब वाचणार आहे.

बॉक्स

मान्यतेसाठी विलंब

लागवडीचा हंगाम निघून गेल्यानंतरही शेतकऱ्यांना सिंचन विहीर मंजूर होत नव्हती. विधींसाठी शेतकरी पंचायत समितीत चकरा मारून त्रस्त होते.

कोट

वैयक्तिक सिंचन विहिरीच्या कामांना प्रशासकीय अंतिम मंजुरी देण्याचे अधिकार गटविकास अधिकाऱ्यांना देण्याबाबत ४ मार्च रोजी शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार पंचायत समिती स्तरावर निर्णय होऊन शेतकऱ्यांना सिंचन विहिरी योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

- प्रवीण सिन्नारे,

उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेगा