शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

आता सिंचन विहिरींना बीडीओं देणार मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:23 IST

अमरावती : शासकीय सिंचन विहीर व अन्य योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणीना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे गरीब व ...

अमरावती : शासकीय सिंचन विहीर व अन्य योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणीना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे गरीब व गरजू शेतकरी योजनांचा लाभ घेण्यासाठी धजावत नाही. मात्र नवीन आदेशानुसार आता सिंचन विहिरींच्या मंजुरीचे अंतिम अधिकार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्याऐवजी पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना (बीडिओ) देण्यात आले आहेत. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास शेतकऱ्यांना होणारा मनस्ताप दूर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्य शासनाच्या २८ नोव्हेंबर २०१७ च्या निर्णयानुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विहिरींसाठी शेतकऱ्यांना यापूर्वी ग्रामसेवक, कृषी अधिकाऱ्यांकडे कागदोपत्राची पूर्तता केल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावा लागत होता. त्यानंतर सर्व पंचायत समित्यांच्या एकत्रिक अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केले जात होता. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रशासकीय कार्याची व्याप्ती मोठी असते. त्यामुळे मंजुरीला विलंब लागत होता. ही बाब लक्षात घेता शासनाने आता सिंचन विहीर मंजुरीचे अधिकार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना बहाल केले आहेत. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना आपल्या तालुक्याच्या ठिकाणीच यासंदर्भात सुविधा उपलब्ध झाल्याने कामाला होणार विलंब वाचणार आहे.

बॉक्स

मान्यतेसाठी विलंब

लागवडीचा हंगाम निघून गेल्यानंतरही शेतकऱ्यांना सिंचन विहीर मंजूर होत नव्हती. विधींसाठी शेतकरी पंचायत समितीत चकरा मारून त्रस्त होते.

कोट

वैयक्तिक सिंचन विहिरीच्या कामांना प्रशासकीय अंतिम मंजुरी देण्याचे अधिकार गटविकास अधिकाऱ्यांना देण्याबाबत ४ मार्च रोजी शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार पंचायत समिती स्तरावर निर्णय होऊन शेतकऱ्यांना सिंचन विहिरी योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

- प्रवीण सिन्नारे,

उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेगा