शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

आता उत्कृष्ट पदवी वितरण समारंभासाठी पुरस्कार; संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा पहिलाच उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 21:07 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यावर्षीपासून महाविद्यालयांना उत्कृष्ट पदवी वितरण समारंभासाठी पुरस्कार प्रदान करणार आहे.

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यावर्षीपासून महाविद्यालयांना उत्कृष्ट पदवी वितरण समारंभासाठी पुरस्कार प्रदान करणार आहे. या प्रस्तावाला कुलगुरूंनी तत्त्वत: मान्यता दिली असून, त्याकरिता समिती गठित करण्यात आली आहे. उत्कृष्ट पदवी वितरणासाठी पुरस्कार देणारे राज्यात हे विद्यापीठ पहिले ठरणार आहे. विद्यापीठ अंतर्गत ३९४ महाविद्यालयांकडून या पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले जाणार आहेत. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार प्रत्येक महाविद्यालयस्तरावर पदवी वितरण सोहळ्याचे आयोजन करणे हे अनिवार्य आहे. त्यानुसार संत  गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सन २०१९ पासून महाविद्यालयांना त्यांच्या स्तरावर पदवी वितरण समारंभ आयोजनाबाबत मंजुरी दिली. मात्र, महाविद्यालये पदवी वितरण समारंभाचे आयोजन करण्यात माघारली आहेत. ३९४ पैकी १४४ महाविद्यालयांनीच पदवी वितरण समारंभ आयोजनाबाबत विद्यापीठाकडे अहवाल पाठविले आहेत. त्यामुळे विद्यापीठाने उर्वरित २५० संस्थाध्यक्ष, प्राचार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. दरम्यान, महाविद्यालयांनी स्वयंस्फूर्तीने पदवी वितरण समारंभ आयोजित करून विद्यार्थ्यांचा गौरव करावा, यासाठी १ मे रोजी महाराष्ट्र दिनी उत्कृष्ट पदवी वितरणासाठी पुरस्कार बहाल केला जाणार आहे. यात २०१९ या वर्षातील पदवी वितरण समारंभ ग्राह्य धरण्यात येणार आहे. महाविद्यालयांनी पाठविलेल्या पदवी वितरण समारंभ अहवाल पुस्तक रूपात तयार करण्याचे प्रस्तावित आहे. प्रथम, द्वितीय व तृतीय आणि प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाणार आहे.

समिती तयार करणार नियमावली, अटी पुरस्काराच्या अटी, नियमावली तयार करण्याची जबाबदारी कुलगुरूंनी गठित के लेल्या समितीकडे सोपविली आहे. महाविद्यालयाचा परिसर, पदवी वितरणाचे स्वरूप, मान्यवरांची उपस्थिती, सामाजिक, शिक्षणक्षेत्राची व्याप्ती आदी बाबींचा यात समावेश असेल. समितीने तयार केलेला अहवाल परीक्षा मंडळ आणि पुढे व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयार्थ ठेवण्यात येणार आहे. एकदा व्यवस्थापन परिषदेने मान्यता प्रदान करताच महाविद्यालयांना उत्कृष्ट पदवी वितरण पुरस्कार देण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

महाविद्यालयस्तरावर पदवी वितरण समारंभाची व्याप्ती आणि त्याचे स्वरूप वाढीस लागावे, यासाठी पदवी वितरण पुरस्कार देण्याचा मानस आहे. कुलगुरूंनी त्यास मान्यता प्रदान केली आहे. आता काही औपचारिक बाबी शिल्लक असून, मेपर्यंत त्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी चालविली आहे. महाराष्ट्र दिनी पुरस्कार वितरण केला जाणार आहे. - हेमंत देशमुख,संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ.