शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

आता उत्कृष्ट पदवी वितरण समारंभासाठी पुरस्कार; संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा पहिलाच उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 21:07 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यावर्षीपासून महाविद्यालयांना उत्कृष्ट पदवी वितरण समारंभासाठी पुरस्कार प्रदान करणार आहे.

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यावर्षीपासून महाविद्यालयांना उत्कृष्ट पदवी वितरण समारंभासाठी पुरस्कार प्रदान करणार आहे. या प्रस्तावाला कुलगुरूंनी तत्त्वत: मान्यता दिली असून, त्याकरिता समिती गठित करण्यात आली आहे. उत्कृष्ट पदवी वितरणासाठी पुरस्कार देणारे राज्यात हे विद्यापीठ पहिले ठरणार आहे. विद्यापीठ अंतर्गत ३९४ महाविद्यालयांकडून या पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले जाणार आहेत. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार प्रत्येक महाविद्यालयस्तरावर पदवी वितरण सोहळ्याचे आयोजन करणे हे अनिवार्य आहे. त्यानुसार संत  गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सन २०१९ पासून महाविद्यालयांना त्यांच्या स्तरावर पदवी वितरण समारंभ आयोजनाबाबत मंजुरी दिली. मात्र, महाविद्यालये पदवी वितरण समारंभाचे आयोजन करण्यात माघारली आहेत. ३९४ पैकी १४४ महाविद्यालयांनीच पदवी वितरण समारंभ आयोजनाबाबत विद्यापीठाकडे अहवाल पाठविले आहेत. त्यामुळे विद्यापीठाने उर्वरित २५० संस्थाध्यक्ष, प्राचार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. दरम्यान, महाविद्यालयांनी स्वयंस्फूर्तीने पदवी वितरण समारंभ आयोजित करून विद्यार्थ्यांचा गौरव करावा, यासाठी १ मे रोजी महाराष्ट्र दिनी उत्कृष्ट पदवी वितरणासाठी पुरस्कार बहाल केला जाणार आहे. यात २०१९ या वर्षातील पदवी वितरण समारंभ ग्राह्य धरण्यात येणार आहे. महाविद्यालयांनी पाठविलेल्या पदवी वितरण समारंभ अहवाल पुस्तक रूपात तयार करण्याचे प्रस्तावित आहे. प्रथम, द्वितीय व तृतीय आणि प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाणार आहे.

समिती तयार करणार नियमावली, अटी पुरस्काराच्या अटी, नियमावली तयार करण्याची जबाबदारी कुलगुरूंनी गठित के लेल्या समितीकडे सोपविली आहे. महाविद्यालयाचा परिसर, पदवी वितरणाचे स्वरूप, मान्यवरांची उपस्थिती, सामाजिक, शिक्षणक्षेत्राची व्याप्ती आदी बाबींचा यात समावेश असेल. समितीने तयार केलेला अहवाल परीक्षा मंडळ आणि पुढे व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयार्थ ठेवण्यात येणार आहे. एकदा व्यवस्थापन परिषदेने मान्यता प्रदान करताच महाविद्यालयांना उत्कृष्ट पदवी वितरण पुरस्कार देण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

महाविद्यालयस्तरावर पदवी वितरण समारंभाची व्याप्ती आणि त्याचे स्वरूप वाढीस लागावे, यासाठी पदवी वितरण पुरस्कार देण्याचा मानस आहे. कुलगुरूंनी त्यास मान्यता प्रदान केली आहे. आता काही औपचारिक बाबी शिल्लक असून, मेपर्यंत त्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी चालविली आहे. महाराष्ट्र दिनी पुरस्कार वितरण केला जाणार आहे. - हेमंत देशमुख,संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ.