शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
5
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
6
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
7
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
8
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
9
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
10
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
11
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
12
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
13
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
14
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
15
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
16
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
17
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
18
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
19
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
20
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस

आता शालेय पोषण आहारासाठी ‘अ‍ॅप’

By admin | Updated: July 21, 2016 00:06 IST

प्रत्येक शाळेत सुरु असलेल्या शालेय पोषण आहाराची दैनंदिन माहिती जमा करुन ती मोबाईलद्वारे देण्यासाठी शिक्षण विभागाने अप्लीकेशन विकसित केले आहे.

दैनंदिन माहिती मिळणार : योजनेत पारदर्शकता हा उद्देशअमरावती : प्रत्येक शाळेत सुरु असलेल्या शालेय पोषण आहाराची दैनंदिन माहिती जमा करुन ती मोबाईलद्वारे देण्यासाठी शिक्षण विभागाने अप्लीकेशन विकसित केले आहे. ‘आॅटोमेटेड मॉनिटरिंग सिस्टीम’ (एमबीएम) असे याचे नाव आहे. शालेय पोषण आहार योजनेत पारदर्शकता यावी, हा याचा उद्देश आहे. एखाद्या योजनेसाठी विशिष्ट प्रकारचे मोबाइल अप्लीकेशन करण्यास शिक्षण विभाग हा पहिला ठरला आहेत. सद्य:स्थितीत ८६ हजार ६६० शाळांमध्ये ६५ लाख ३६ हजार विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. या योजनेनुसार राज्यातील किती विद्यार्थ्यांना दुपारी भोजन आहार देण्यात आला, कोणत्या प्रकारचा आहार दिला. याची दररोज आकडेवारी या मोबाईल अ‍ॅप्स द्वारे मिळणार आहे. पुण्यातील एनआयशीने हे अ‍ॅप विकसित केले आहे. याद्वारे शालेय पोषण आहाराची माहिती आॅनलाईन अ‍ॅप व एसएमएस द्वारे गटशिक्षणाधिकाऱ्यांना मिळेल. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळावा तसेच कोणत्या प्र्रकारचा आहार देण्यात आला आणि तो कुठल्या कारणांनी दिला गेला नाही याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांना एका ‘क्लिक’ वर मिळणार आहे. याप्र्रणालीमुळे मुख्याध्यापकांना शालेय पोषण आहाराच्या दैनंदिन नोंदणी ठेवण्याची गरज भासणार नाही तसेच केंद्र प्रमुखांना मासिक अहवाल देण्याची आवश्यकता नाही. अनुदानाचे वितरण ही सुलभ होईल. या योजनेच्या अंमलबजावणीची स्थिती दररोज तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर पाहता येणार आहे. प्रत्येक शाळेत कुठल्या वर्गात किती विद्यार्थी उपस्थित होते याची नियमित मिळणार आहे. विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी प्रभावी उपाय शाळेतील पटनोंदणीचे प्रमाण शंभर टक्क्यापर्यंत वाढविण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी केंद्र पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना सुरु करण्यात आली. शालेय पोषण आहार योजनेनुसार किती शाळांमधील विद्यार्थ्यांना दुपारचे भोजन मिळाले, याची नियमित माहिती शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी प्रभावी उपाय केल्या जाणार आहे.