शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

लग्नसमारंभात आता ५० जणांना परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:01 IST

सध्या पावसाळा सुरू झाला असल्याने खुले लॉन, विनावातानुकूलन मंगल कार्यालये, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात विवाह समारंभ हा सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडता येणार आहे. विशेष म्हणजे, लग्न समारंभात मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. विवाह समारंभात वर-वधूसह ५० पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागेल. खुले लॉन, मंगल कार्यालय उघडल्यानंतर तसेच हाताळण्यात येणाऱ्या सर्व वस्तूंचे निर्जंतुकीकरण बंधनकारक आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्याचा आदेश : मंगल कार्यालये, हॉल, सभागृहातही होणार कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लॉकडाऊन व संचारबंदीत आता टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात येत आहे. यामध्ये आता विवाह समारंभासाठी ५० व्यक्तींना सहभागी होता येईल. मात्र, शासन व प्रशासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तींचे पालन करावे लागणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी जारी केले.सध्या पावसाळा सुरू झाला असल्याने खुले लॉन, विनावातानुकूलन मंगल कार्यालये, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात विवाह समारंभ हा सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडता येणार आहे. विशेष म्हणजे, लग्न समारंभात मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. विवाह समारंभात वर-वधूसह ५० पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागेल. खुले लॉन, मंगल कार्यालय उघडल्यानंतर तसेच हाताळण्यात येणाऱ्या सर्व वस्तूंचे निर्जंतुकीकरण बंधनकारक आहे. याशिवाय दर तीन तासांनी संबंधित कार्यालयाचे काऊंटर निर्जंतुकीकरण करावे. खुले लॉन, विनावातानुकूलन मंगल कार्यालये, सभागृहांत काम करणाºया कर्मचाऱ्यांनी लोकांचा संपर्क टाळावा व सर्वांनी हातमोजे, मास्क, हँडवॉश, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा आवश्यकता भासल्यास तसेच कोरोनासदृश लक्षणे आढळल्यास तात्काळ संबंधित कर्मचारी, कामगारांची वैद्यकीय तपासणी करावी. आजारी व्यक्तींना कामांवर ठेवू नये. मंगल कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने एक मीटर अंतर ठेवणे बंधनकारक आहे. विवाह समारंभात येणाऱ्या व्यक्तींना कोरोना संसर्गापासून बचावाबाबत सूचना दर्शनी भागात लावण्यात याव्यात आदी अटी-शर्तींवर जिल्हाधिकाऱ्यांनी विवाह समारंभात ५० जणांना सहभागी करण्यास परवानगी दिली आहे. सहभागी व्यक्तींना आरोग्य सेतु अ‍ॅप वापरणे बंधनकारक आहे. कंटेमेंट झोनमधील कुठल्याही व्यक्तीला या समारंभात उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली आहे. तसे आढळून आल्यास मनपा आयुक्त, नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि ग्रामीण भागात तहसीलदार यांच्याकडून कारवाई केली जाणार आहे. कंटेनमेंट झोन परिसरात २०० मीटर अंतरापर्यतची सर्व लॉन, मंगल कार्यालये बंद राहतील.परवानगी घ्यावी लागणारवर-वधुपक्षाकडून आमंत्रित केलेल्या व विवाह समारंभात सहभागी होणाºया लोकांची यादी परवानगीसाठी शहरी भागात महापालिका आयुक्त, नागरी क्षेत्रात नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि ग्रामीण भागात तहसीलदार यांच्याकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. लग्न समारंभात गर्दी होऊन कोविड-१९ चा प्रादुर्भाव होणार नाही, या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांना देखरेख व नियंत्रण ठेवावे लागणार आहे.प्रवेशाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग, मास्क, सॅनिटायझरची व्यवस्था करण्याची जबाबदारी ही संबंधित लॉन, मंगल कार्यालयाच्या संचालकांवर राहणार आहे. विवाह समारंभात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. शासन व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. सभागृहात गर्दी झाल्यास याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्याला संचालकांनी द्यावी तसेच मंगल कार्यालय तात्काळ बंद करावे. असे न केल्यास प्रशासन ‘अ‍ॅक्टिव्ह मोड’वर येऊन संबंधित लॉन, मंगल कार्यालय सील करण्याची प्रक्रिया पार पाडेल, असे या आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :marriageलग्न