शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

गुणपत्रिकाच नाही; पदवी, पदव्युत्तरचे प्रवेश कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:23 IST

‘विथहेल्ड’ निकालाने विद्यार्थी त्रस्त, विद्यापीठात गुणपत्रिकेसाठी गर्दी कायम अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अंतिम वर्ष परीक्षांचे निकाल जाहीर ...

‘विथहेल्ड’ निकालाने विद्यार्थी त्रस्त, विद्यापीठात गुणपत्रिकेसाठी गर्दी कायम

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अंतिम वर्ष परीक्षांचे निकाल जाहीर केले. मात्र, बहुतांश विद्यार्थ्यांचे निकाल ‘विथहेल्ड’ असल्याने गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. त्यामुळे पुढील अभ्यासक्रमात प्रवेश कसा घ्यावा, ही चिंता विद्यार्थ्यांसह पालकांना सतावत आहे. काही महाविद्यालयाने प्रवेशाची अंतिम तारीख ४ डिसेंबर निश्चित केल्यामुळे विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेसाठी विद्यापीठात गर्दी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, विद्यापीठाने २६ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान अंतिम वर्षाच्या ऑनलाईन, ऑफलाईन परीक्षा पार पडल्या. ३ नोव्हेंबरपासून अंतिम वर्ष परीक्षांचे निकाल जाहीर केले जात आहे. ज्या विद्यार्थ्यांचे अंतिम वर्ष वगळता अन्य सत्राच्या गुणपत्रिका व्यवस्थित आहे, अशा विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले आहे. परंतु, सुमारे ४० ते ५० टक्के विद्यार्थ्यांचे निकाल अन्य सत्राच्या गुणपत्रिका विद्यापीठात प्राप्त नसल्याने निकाल ‘विथहेल्ड’ ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे महाविद्यालयांनी पदवी, पदव्युत्तर प्रवेशाची तारीख निश्चित केली आहे. गुणपत्रिकाच नसल्याने प्रवेश कसा मिळेल, ही माेठी समस्या हल्ली विद्यार्थ्यांपुढे उद्‌भवली आहे. महाविदयालय आणि विद्यापीठ यांच्यात समन्वयाचा अभाव नसल्याचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. ‘विथहेल्ड’ निकालाची समस्या दूर करण्यासाठी तब्बल १५० ते २०० कि.मी. अंतर ओलांडून अमरावती विद्यापीठात यावे लागते, अशी कैफियत अनेक पालकांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.

--------------------

जुने सत्राच्या गुणपत्रिका तपासूनच अंतिम वर्षाची गुणपत्रिका तयार करण्यात येते,

पदवीसाठी ग्रेड निश्चित करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मागील सत्राच्या गुणपत्रिका गोळा करण्यात येत आहे. कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणारा नाही.

- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ

-----------------------

अमरावती विद्यापीठात १० वाजता पोहोचण्यासाठी घरून मुलींसोबत सकाळी ६ वाजता निघालो. खिडक्यांवर कर्मचाऱ्यांकडृून व्यवस्थित उत्तर मिळत नाही. काही मुली पालकांविना ‘विथहेल्ड’ निकालाची समस्या सोडविण्यासाठी आल्या आहेत. मुलींच्या अन्य सत्राच्या गुणपत्रिका जमा करूनही निकाल रोखला आहे.

- प्रमोद ठाकरे, पालक, देऊळगाव राजा

----------------

निकाल रोखण्यात आल्यामुळे पुढील प्रवेशापासून वंचित तर राहावे लागणार नाही ना, ही भीती आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयांत समन्वयाचा अभाव आहे. सोबतच्या काही मित्रांचे प्रवेश झाले. त्यामुळे आता विद्यापीठाने प्रवेशास मुदतवाढ द्यावी.

- विश्वजित साेळंके, विद्यार्थी, विद्याभारती महाविद्यालय, अमरावती