शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

राज्यात अनुसूचित क्षेत्रातील १३ नगर पंचायतींचे नगराध्यक्ष गैरआदिवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2022 15:09 IST

राष्ट्रपतींनी संविधानातील पाचव्या अनुसूचीच्या अनुषंगाने २ डिसेंबर १९८५ रोजी अधिसूचनेद्वारे राज्यात अनुसूचित क्षेत्र घोषित केले आहे. या क्षेत्रातील कामकाज शासन पेसा कायद्यानुसार अपेक्षित आहे.

ठळक मुद्देट्रायबल फोरमची तक्रारराज्यघटनेतील तरतुदींचे उल्लंघन

गणेश वासनिक

अमरावती : राज्यात नुकत्याच १३९ नगर पंचायतींच्या निवडणुका घेऊन नगराध्यक्षपदाचे आरक्षण घोषित झाले आहे. यात अनुसूचित क्षेत्रात येत असलेल्या १३ नगर पंचायतींमध्ये गैरआदिवासी उमेदवार नगराध्यक्ष पदावर विराजमान होणार आहेत. हा सर्व प्रकार घटनाबाह्य असून, राज्यघटेनेतील तरतुदींचे उल्लंघन करणारा असल्याची तक्रार ट्रायबल फोरमच्यावतीने करण्यात आली आहे.

राष्ट्रपतींनी संविधानातील पाचव्या अनुसूचीच्या अनुषंगाने २ डिसेंबर १९८५ रोजी अधिसूचनेद्वारे राज्यात अनुसूचित क्षेत्र घोषित केले आहे. या क्षेत्रातील कामकाज शासन पेसा कायद्यानुसार अपेक्षित आहे. मात्र, पाचव्या अनुसूचीतील, पेसा कायद्यातील तरतुदींना डावलून अनुसूचित क्षेत्रात शासन चालविले जात असल्याचा प्रत्यय नगराध्यक्षपदाच्या आरक्षणावरून येत आहे.

भारतीय संविधान (७४ वी सुधारणा) अधिनियम १९९२ अन्वये नगर परिषद कारभाराबाबत राज्यघटनेत भाग नऊ - (क)चा समावेश केलेला आहे. अनुसूचित क्षेत्रातील तालुका मुख्यालयांचे राज्यघटनेतील भाग नऊ - (क)मधील अनुच्छेद २४३ (थ)नुसार नगर पंचायतींमध्ये रुपांतर केलेले आहे. घटनेतील भाग नऊ - (क)च्या तरतुदी अनुसूचित क्षेत्रासाठी लागू करण्यासाठी अपवाद व योग्य सुधारणांसह कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. परंतु, नगर परिषदेसंबंधी अद्याप २० वर्षे झाली तरी संसदेने अनुच्छेद २४३ (य, ग) अंतर्गत कायदा केलेला नाही. त्यामुळे अनुसूचित क्षेत्रातील गावांचे रुपांतर शहरात व नगर पंचायतीमध्ये करताना राज्यघटनेतील तरतुदींचे उल्लंघन झाले आहे. सहा नगरपंचायती या खुला प्रवर्गातील महिला, तर ७ नगर पंचायती खुला प्रवर्गातील सर्वसाधारणकरिता राखीव आहेत.

नगरपंचायती नावे - आरक्षण

१) वाडा - खुला प्रवर्ग महिला

२) एटापल्ली - खुला प्रवर्ग महिला

३) सिरोंचा - खुला प्रवर्ग महिला

४) कोरची - खुला प्रवर्ग महिला

५) धारणी - खुला प्रवर्ग महिला

६) कुरखेडा - खुला प्रवर्ग महिला

७) पेठ - खुला प्रवर्ग (सर्वसाधारण )

८) भामरागड - खुला प्रवर्ग (सर्वसाधारण)

९) सुरगाणा - खुला प्रवर्ग सर्वसाधारण

१०) धडगाव - खुला प्रवर्ग सर्वसाधारण

११) तलासरी - खुला प्रवर्ग सर्वसाधारण

१२) मोखाडा - खुला प्रवर्ग सर्वसाधारण

१३) विक्रमगड - खुला प्रवर्ग सर्वसाधारण.

भारतीय संविधानात नगरपंचायती संबंधी सुस्पष्ट तरतूद असताना राजकीय नेते, मंत्री आणि सनदी अधिकारी यांना कळत नसेल किंवा तरतुदींनुसार कार्यवाही करीत नसेल तर ते संविधानाविषयी जागरूक नाहीत. मुख्यमंत्र्यांसह राज्य निवडणूक आयुक्तांना तक्रार दिली आहे.

- एकनाथ भोये, राज्य सचिव, ट्रायबल फोरम

टॅग्स :Socialसामाजिक