शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

बँकांचे असहकार्य : पश्चिम विदर्भात खरिपाचे २७ टक्केच कर्जवाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 17:26 IST

पश्चिम विदर्भात सलग चार वर्षे दुष्काळ व नापिकीने शेतकरी आर्थिक संकटात असताना पीक कर्जवाटपासाठी बँकादेखील माघारी पाठवित असल्याचे चित्र आहे.

अमरावती  - पश्चिम विदर्भात सलग चार वर्षे दुष्काळ व नापिकीने शेतकरी आर्थिक संकटात असताना पीक कर्जवाटपासाठी बँकादेखील माघारी पाठवित असल्याचे चित्र आहे. खरीप हंगामाला दोन महिने झाले असतानाही पीक कर्जवाटपाचा टक्का २७ वरच रखडलेला आहे. शासन व जिल्हा प्रशासनाने वारंवार तंबी दिल्यावरही बँका जुमानत नसल्याने या बँकावर नियंत्रण कुणाचे, असा शेतकºयांचा सवाल आहे. यंदाच्या खरिपासाठी विभागात ३२ लाख ३१ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. पावसाने सुरुवातीपासून दडी मारल्याने किमान चार लाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात असताना पीककर्ज वाटपासाठी बँकांचा टक्का वाढलेला नाही. यंदाच्या हंगामात अमरावती विभागातील बँकांना खरिपासाठी ८५४९ कोटी ३२ लाखांच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत ३ लाख ५ हजार ९५० शेतकºयांना २ लाख ४० हजार ६८० हेक्टर क्षेत्रासाठी २३६० कोटी चार लाखांचे कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. दर आठवड्यात एक टक्का वाटप अशी बँकांची गती राहिली आहे. शेतक-यांसह लोकप्रतिनिधींच्या तक्रारीनंतर प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी खरिपाच्या कर्जवाटपाचा आढावा घेतला. जिल्हाधिका-यांनी दर आठवड्यात कर्जवाटपाच्या आढावा सभा घेतल्या, मात्र, बँकांवर शासन-प्रशासनाच्या तंबीचा कोणताच परिणाम झालेला नाही, असे दिसून येते.विभागात जिल्हा सहकारी बँकांनी ४३ टक्के कर्जवाटप केल्यामुळे वाटपाची सरासरी वाढली आहे. जिल्हा बँकांना २३०५ कोटी ६९ लाखांच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत ९९१ कोटी ५३ लाखांचे कर्जवाटप केल्यामुळेच कर्जवाटपाची सरासरी वाढली आहे. राष्ट्रीयीकृत बँकांना ५४११ कोटी तीन लाखांच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असतांना आतापर्यत १२२५ कोटी ४७ लाखांचे वाटप झाले आहे. ही २२ टक्केवारी आहे, तर ग्रामीण बँकांना ८३२ कोटी ५८ लाखांच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत ११९ तीन लाखांचे कर्जवाटप केले आहे. ही १४.३० टक्केवारी आहे. दर आठवड्याला एक टक्का अशी गती गृहीत धरल्यास यंदाच्या हंगामात कर्ज वाटपाचा ३५ टक्क्यांच्या आत राहणार, हे वास्तव आहे.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रVidarbhaविदर्भ