शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

भाषण नको, अ‍ॅक्शन हवी

By admin | Updated: June 23, 2016 00:02 IST

शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. त्यांना तत्काळ पीक कर्ज मिळायला पाहिजे. यातील तीन बैठकी घेतल्या आता वाटपाच्या टक्केवारीचे कागदी घोडे नाचवू नका,...

पालकमंत्री : जून अखेरपर्यंत १०० टक्के पीक कर्ज वाटपाचे निर्देशअमरावती : शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. त्यांना तत्काळ पीक कर्ज मिळायला पाहिजे. यातील तीन बैठकी घेतल्या आता वाटपाच्या टक्केवारीचे कागदी घोडे नाचवू नका, बैठकीत नेहमीचे तुमचे भाषण नको, आता फक्त अ‍ॅक्शन पाहिजे दिलेले कर्जवाटपाचे ‘टार्गेट’ मुदतीच्या आत पूर्ण झाले पाहिजे, अशी तंबी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी बुधवारी बचत भवन येथे आयोजित पीक कर्ज वाटपाच्या आढावा बैठकीत बँक अधिकाऱ्यांना दिली.सर्वच बैठकांविषयी शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. शेतकऱ्यांची विनाकारण अडवणूक केली जाते. त्यांना उद्धटपणाची वागणूक दिली जाते. वेगवेगळ्या कारणांनी त्यांच्याकडून रक्कम उकळल्या जाते, हे सर्व प्रकार खपवून घेतल्या जाणार नाही. शेतकऱ्यांना तात्काळ कर्जवाटप करण्याचे राज्याच्या मुख्यमंत्र्याचे आदेश आहेत. या आदेशाची अंमलबजावणी झालीच पाहीजे, ज्या बँका मुदतीच्या आत शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करु शकणार नाही. त्यांनी आपल्या या बैठकीत स्पष्टपणे सांगावे त्यांचा तसा अहवाल मुख्यमंत्र्यांना देऊ मात्र, शेतकरी बँॅकात येत नाही अश्या खोटया सबबी आता सांगू नका, आपण सर्व शेतकऱ्यांची मुले आहात शेतकऱ्यांच्या हितासाठीच काम झाले पाहिजे. शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप व पुनर्गठन ३० जूनच्या आत झाले पाहिजे, असे पालकमंत्र्यानी निक्षून सांगितले.यंदाच्या खरीपासाठी १७५९ कोटी रुपये पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. यापैकी ९४० कोटी रुपयांचे कर्जवाटप सद्य:स्थितीत झाले आहे. पीक कर्ज वाटपाची ही ५३ टक्केवारी आहेत. यापैकी जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३१७ कोटी, राष्ट्रीयकृत बँकांनी ६२३ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. अजून २ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना पीक अजून ८१९ कोटी कर्जवाटप करायचे आहे. पुनर्र्गठनासाठी जिल्ह्यात ७१ हजार २२९ शेतकरी पात्र आहेत. त्यापैकी ४३ हजार ७२९ शेतकऱ्यांचे पुनर्गठन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी दिली. जिल्हा उपनिंबधक गौतम वालदे, सुनील रामटेके आदी उपस्थित होते.कर्जातून कुठल्याही शुल्काची कपात नकोस्टेट बँक व बँक आॅफ महाराष्ट्र या बँका शेतकऱ्यांच्या पीक कर्जातून प्रक्रिया शुल्क वसूल करुन कर्जात विम्याची रक्कम चढवित आहेत. शासनाने प्रक्रिया शुल्क रद्द केले आहे. शासनाचा कृषी पीक विमा असताना तूम्ही तुमचा पीक विमा शेतकऱ्यांवर लावू नका, असे पालकमंत्री म्हणाले.ही धमकी समजायची असले तर समजादेना बॅकेच्या व्यवस्थापकाविषयी अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. मुख्यमंत्र्यांना आधी काही समजत नाही, असे उर्मट बोलल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या बँकेनी केवळ ११ कोटीचे कर्ज वाटप केले आहे. शुक्रवारच्या आत १५ कोटीचे कर्जवाटप झालेच पाहीजे. याला तुम्ही धमकी समजा असेल तर समजा? असे पालकमंत्र्याची दरडाऊन सांगितले.शेतकऱ्यांच्या तक्रारीचा वाचला पाढाजिल्हा बँकेसह सेट्रल बँक, बँक आॅफ महाराष्ट्र, देना बँक, आदी बँक संदर्भात शेतकऱ्यांच्या असलेल्या तक्रारीचा पाढा पालकमंत्र्यानी वाचून दाखविला, शेतकऱ्यांना बँकेतून हाकलून दिल्याच्या तक्रारीमुळे पालकमंत्री संतापले.