शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

रेल्वेच्या आरक्षित डब्यात ना मास्क,ना सोशल डिस्टंसिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:13 IST

बड़नेरा : (श्यामकांत सहस्त्रभोजने) रेल्वे गाड्यांमधून शेकडो प्रवासी प्रवास करतात. सध्या जिल्ह्यात कोरोना संसर्गाने रुग्ण पछाडले आहेत. रेल्वेच्या ...

बड़नेरा : (श्यामकांत सहस्त्रभोजने)

रेल्वे गाड्यांमधून शेकडो प्रवासी प्रवास करतात. सध्या जिल्ह्यात कोरोना संसर्गाने रुग्ण पछाडले आहेत. रेल्वेच्या आरक्षित डब्यांमध्ये ना मास्क,ना सोशल डिस्टंसिंगचे चित्र नक्कीच कोरोणा संसर्गात वाढ करणारे आहे. याची रेल्वे प्रशासनाला गांभीर्याने दखल घ्यावी लागणार आहे. दंडात्मक कारवाई करणारे स्वतंत्र पथक केव्हा नेमणार, हा प्रश्न यानिमित्ताने उभा ठाकला आहे.

अमरावती जिल्ह्यात काही दिवसात कोरोना संसर्गाने चांगलेच तोंड वर काढले आहे. रुग्णांची संख्या ६०० च्या वरच आहे. संसर्ग जिल्ह्यासाठी चिंतेची बाब ठरते आहे. जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहे. मात्र, रेल्वे प्रवासात प्रवाशांमध्ये सोशल डिस्टंसिंगचा असलेला अभाव तसेच बहुतांश प्रवासी मास्कविनाच प्रवास करीत असल्याचे चित्र कोरोना संसर्गात नक्कीच भर पाडणारे आहे बडनेरा रेल्वे स्थानकावरून ६० ते ६५ रेल्वे प्रवासी गाड्या धावतात शेकडो प्रवासी प्रवास करीत आहे गाड्यांमध्ये अधिकतर प्रवासी त्याच्याकडील मास्कचा वापरच करीत नसल्याचे दिसून पडते आहे. हनुवटीवर मास्क ठेवतो आहे. लहान मुले मास्क विनाच डब्यांमध्ये फिरत आहे. आरक्षित डब्यांमध्ये जवळपास एका डब्यात ७४ प्रवासी बसण्याची व्यवस्था आहे एका कंपार्टमेंटमध्ये सहा प्रवासी बसतात त्यामुळे सोशल डिस्टंसिंग कसे पाळल्या जाते हा प्रश्नच आहे. जवळपास रेल्वे गाड्यांमध्ये एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाता येते सहाजिकच प्रवाशांचा एकमेकांशी संपर्क येतो रेल्वे प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन विशेष पथक कारवाईसाठी तयार केले पाहिजे कोरोनाचा संसर्ग रेल्वे प्रवाशांमधूनदेखील वाढू शकतो हे एकूणच चित्रांवरून नाकारता येणार नाही. रेल्वे गाड्यांमधील टीटी व आरपीएफचे कर्मचारी त्यांच्या कामासोबतच मास्क तसेच सोशल डिस्टंसिंगवर लक्ष ठेवत असल्याचे समजले. अधिकृतपणे मात्र रेल्वेच्या अधिकाऱ्यांने कुठलीही माहिती देण्याचे टाळले रेल्वे गाड्या मध्ये आपली ड्युटी बजावणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना देखील संसर्गाचा त्रास होऊ शकतो.

"""""""""""""""""""""''''"""""

जिल्ह्यातून जाणाऱ्या रेल्वे

* अमरावती- मुंबई एक्सप्रेस

* विदर्भ एक्सप्रेस

* गीतांजली एक्सप्रेस

* महाराष्ट्र एक्सप्रेस

* अमरावती- तिरुपती

* हावडा- मेल

* अहमदाबाद- पुरी

"""""""'''''''''''''"""""""""""""""

बॉक्स

बडनेरा रेल्वे स्थानकावरून विविध मार्गांकड़े आठवडाभरात सद्यस्थितीत जवळपास ६५ रेल्वे गाड्या धावत असल्याची माहिती आहे. यामध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यात जाणाऱ्यादेखील गाड्या आहेत. जिल्ह्यात बडनेरा रेल्वे स्थानक जंक्शन असल्याने येथून मोठ्या संख्येत रेल्वे गाड्या धावतात प्रवासी संख्यादेखील मोठी असते.

”""""""""""""""""""""""'''''''''''''""""

बॉक्स:

विनामास्कवर कारवाईच नाही

रेल्वे प्रवासात अमरावती जिल्ह्यातून जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये विना मास्क तसेच कोरोना संसर्गाचे नियम न पाळणाऱ्या प्रवाशांवर अद्याप कुठलीही दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच अशा प्रवाशांवर धावत्या रेल्वेगाडीत नियंत्रण ठेवणारे पथकदेखील नसल्याचे समजते दंडाची कारवाई नसल्याने रेल्वे गाड्यांमधील अधिकतर प्रवासी बिनधास्त मास्कविनाच प्रवास करीत आहे. याचा मात्र नियम पाळणाऱ्या प्रवाशांना कोरोना संसर्गाचा धोका निश्चितच वाढणारा आहे. जिल्ह्यात संसर्गाचा वाढता प्रकोप पाहता रेल्वे प्रशासनाने वरिष्ठ स्तरावर प्रकर्षाने दखल घेणे तेवढेच गरजेचे झाले आहे. रुळावर असणारी रेल्वे पुन्हा बंद पडू नये, असे सर्वांच्याच मनातली बाब आहे.