शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

मास्क नाही, काढा उठाबशा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:00 IST

देशभर लॉकडाऊन आहे. घराबाहेर फिरण्यास सक्त मनाई आहे. सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत आवश्यक कामासाठीच बाहेर निघण्याची मुभा संचारबंदीच्या काळात देण्यात आली आहे. त्यासाठी सुरक्षित अंतर तोंडाला मास्क बांधणे सक्तीचे करण्यात आले, ही सुरक्षा नागरिकांच्या स्वत:च्या आरोग्यासाठी असतानाही परतवाडा, अचलपूर या जुळ्या शहरातील काही नागरिक काही ऐकच नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देवाहनांची काढली हवा : वारंवार सांगूनही नागरिक ऐकेना, नगरपालिका प्रशासन सक्त

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : जगावर कोरोनाचे भयंकर संकट ओढावले असताना जुळ्या शहरातील नागरिक सुरक्षिततेसंबंधी उपाययोजनांवर अंमल करण्याच्या स्थितीत नाहीत. तोंडाला मास्क न बांधणाऱ्यांना सोमवारी अचलपूर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सक्त होत प्रत्येकी शंभर उठाबशा आठवडी बाजारातच काढायला लावल्या. यात जवळपास २० नागरिक सहभागी झाले. अकारण बाहेर फिरणाºया काही नागरिकांच्या वाहनांच्या चाकाची हवा सोडण्यात आलीदेशभर लॉकडाऊन आहे. घराबाहेर फिरण्यास सक्त मनाई आहे. सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत आवश्यक कामासाठीच बाहेर निघण्याची मुभा संचारबंदीच्या काळात देण्यात आली आहे. त्यासाठी सुरक्षित अंतर तोंडाला मास्क बांधणे सक्तीचे करण्यात आले, ही सुरक्षा नागरिकांच्या स्वत:च्या आरोग्यासाठी असतानाही परतवाडा, अचलपूर या जुळ्या शहरातील काही नागरिक काही ऐकच नसल्याचे चित्र आहे. त्यावर आता अचलपूर नगरपालिकेने सोमवारी सकाळी आठवडी बाजारातील परिसरात तोंडाला मास्क न बांधणाऱ्यां नागरिकांना उठाबशा काढायला लावल्या. पथकात अचलपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, बांधकाम अभीयंता रमेश तायडे, आरोग्य विभागाचे जहीर, पाणीपुरवठ्याचे पोटे यांच्यासह कर निरीक्षक व कर्मचारी सहभागी झाले होते.संचारबंदीच्या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांनी प्रसाद दिला, तर कुठे पुष्पगुच्छ देऊन स्वागतही केले. महसूल, नगरपालिका, पोलीस प्रशासनाच्यावतीने रात्रंदिवस घराबाहेर न निघण्याच्या सूचना मोबाइल, लाऊडस्पीकर अशा विविध माध्यमांतून दिल्या जात आहेत. तरीसुद्धा नागरिक कशाचीच भीती न बाळगता सूचनांचे पालन करता दिसत नाहीत.नेहमीप्रमाणे फिरत असल्याचे चित्र संचारबंदी काळात आहे. सर्वसामान्य नागरिकांना औषधे, किराणा, भाजी खरेदीसाठी दिलेली सूट मोजक्या टवाळखोरांमुळे सर्वांना वेठीस धरणारी ठरली आहे. अचलपूर नगरपालिका पथकामार्फत परतवाडा शहरातील सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांना कडक सूचना देण्यात आल्या.बँकांसमोर वाहने लावून लोकांना उभे राहण्यास अडचण निर्माण करणाऱ्या वाहनांचीसुद्धा हवा सोडण्यात आली.सूचना संपल्या; आता आर्थिक दंडवारंवार सांगूनही नागरिक ऐकत नसल्याने अचलपूर नगरपालिकेच्या कोरोनाविरोधी पथकाने आता यापुढे आर्थिक दंड आकारणीसुद्धा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे त्यानुसार आता दंड आकारला जाणार आहे.

टॅग्स :Policeपोलिस