शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
2
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
3
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
4
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
7
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
8
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
9
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
10
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
11
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
12
Operation Sindoor Live Updates: हरियाणात मुसळधार पाऊस, पाहा व्हिडीओ
13
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
14
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
15
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
16
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
17
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
18
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
19
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
20
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video

घर नाही, शौचालय बांधावे कुठे ?

By admin | Updated: June 26, 2017 00:05 IST

प्रत्येक गावाला १०० टक्के हागणदारीमुक्तीची अट घालण्यात आल्याने ग्रामीण भागात शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत अडसर निर्माण झाला आहे.

ग्रामस्थ हैराण : शंभर टक्के हागणदारीची अट त्रासदायक लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रत्येक गावाला १०० टक्के हागणदारीमुक्तीची अट घालण्यात आल्याने ग्रामीण भागात शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत अडसर निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने गोरगरीब जनतेच्या अडचणी ओळखून शौचालयाची ही अट रद्द करण्याची मागणी होऊ लागली आहे.पाच एकर शेती असलेल्या बीपीएलधारकाला शौचालयाच्या बांधकामासाठी १२ हजार रूपये अनुदान दिले जाते तर एपीएलधारकांना रोहयोतून योजनेचा लाभ दिला जातो. एपीएलधारकांना आधी स्वखर्चाने शौचालय बांधून मग अनुदान दिले जाते. मात्र, आता गाव १०० टक्के हागणदारीमुक्त झाल्याशिवाय कोणत्याही योजनांचा लाभ न देण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. त्यामुळे अनेक गावे वैयक्तिक व सार्वजनिक लाभांच्या योजनांपासून वंचित आहेत. ग्रामीण भागात भाऊबंदकीमुळे अनेक कुटुंब विभक्त झाली आहेत. अनेकांची गुुजराण एका खोलीत सुरू आहे. रहायलाच पुरेशी जागा नसताना शौचालय बांधायचे तरी कुठे, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. कित्येक कुटुंब गावात अतिक्रमण करून राहात आहेत. मग, अतिक्रमित जागेत शौचालय बांधायचे काय, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. पूर्वी हागणदारीमुक्तीची अट टप्प्याने राबवून त्यानुसार योजनांचा लाभ दिला जात होता. गाव ७० टक्के हागणदारीमुक्त झाल्यास त्या गावाला विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत असे. परंतु आता शंभर टक्के हागणदारीमुक्तीची अट घातल्याने ग्रामीण विकासात मोठा अडसर निर्माण झाला आहे. पयार्याने गावाचा विकास खुंटला आहे. राहण्यासाठीच पुरेशी जागा उपलब्ध नसताना शौचालयाची अट कशी पूर्ण करावी, हा प्रश्न ग्रामस्थांना भेडसावतोय. परिणामी गाव शंभर टक्के हगणदारीमुक्त होण्याच्या अटींची पूर्तता होऊ शकत नाही. ‘पेपरलेस’चे काय ?शासनाचे सर्व कामकाज पेपरलेस करण्यावर सरकारचा भर असला तरी झेडपीतील विविध १४ विभाग पेपरलेस करण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे आजही फाईली वेगवेगळ्या टेबलवर फिरत असून त्याचा आर्थिक फटका संबंधिताना सहन करावा लागत आहे. अकाऊंटमध्ये प्रशासनाची मास्टरी असतानाही कामकाज पेपरलेस होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. झेडपीतील केवळ १४ विभागा पेपरलेस झाले आहेत.