शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

स्वातंत्र्यानंतरही रंगुलबेलीत वीज नाही अन् आता पाणीटंचाई; ग्रामस्थ धडकले एसडीओ कार्यालयावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 14:23 IST

तीन महिन्यापासून नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही

धारणी (अमरावती) : मेळघाटातील अतिदुर्गम क्षेत्रातील रंगूबेली गावात स्वातंत्र्यानंतर वीज तर पोहाेचली नाही; परंतु, तीन महिन्यांपासून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दोन किलोमीटर अंतरावरील तापी नदीपात्रातून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याने संतप्त नागरिकांनी मंगळवारी उपविभागीय कार्यलयावर धडक दिली व याबाबत निवेदन दिले.

विजेच्या समस्येतून नागरिक अद्यापही सुटले नाही. गावात कसाबसा सौरउर्जेचा आधार घेत फक्त मोक्याच्या ठिकाणी सौर कंदील लावण्यात आले त्यालाही भ्रष्टाचाराचे कुरण लागल्याने तेसुद्धा बंद पडले आहे. त्यामुळे गावात अंधार कायम आहेच, त्यासोबत नव्याने आणखी पाणीटंचाईची मोठी समस्या नागरिकांसमोर उभी झाली. तीन महिन्यापासून नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही. दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या तापी नदीपात्रातून पिण्याचे व वापरायचे पाणी आणावे लागत आहे. त्याबाबत गावकऱ्यांनी अनेकदा ग्रामपंचायत प्रशासनाला तक्रार दिल्या; परंतु, त्यांनी तांत्रिक अडचणींचा आधार घेत याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे कंटाळलेला नागरिकांनी मंगळवारला दुपारी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धाव घेऊन उपविभागीय अधिकारी सावनकुमार यांना निवेदन दिले. त्यावर ते काय करतात, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

पाणी पुरवठ्याची विहीर १० फूट उंच

गावातील विहीर दुरुस्तीचे काम चालू असून त्या ठिकाणी जुन्या विहिरीवर अंदाजे १० ते १५ फूट लांब बांधकाम केले आहे. अधिकारी, ठेकेदार यांनी जमिनीपासून बांधकाम केले नाही, विहिरीवर १० फूट बांधकाम केल्याने १० फूट उंच चढून पाणी ओढणे महिला व वृद्धांना शक्य नाही. त्या विहिरीचा मोबाइलमध्ये फोटो दाखवून, सांगा साहेब पाण्याची बकेट कशी ओढू, असा सवाल गावकऱ्यांनी एसडीओ यांना केला.

आरोग्यास धोका

तापी नदीपात्रातील पाणी आम्ही गावकरी पित आहे. त्या दूषित पाण्यामुळे आरोग्याला धोका आहे. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या तत्काळ निकाली काढावी, अन्यथा आमच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास त्याला शासन जबाबदार राहील, असा इशारा गावकऱ्यांनी दिल्याने अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतWaterपाणीAmravatiअमरावती