शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

स्वातंत्र्यानंतरही रंगुलबेलीत वीज नाही अन् आता पाणीटंचाई; ग्रामस्थ धडकले एसडीओ कार्यालयावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 14:23 IST

तीन महिन्यापासून नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही

धारणी (अमरावती) : मेळघाटातील अतिदुर्गम क्षेत्रातील रंगूबेली गावात स्वातंत्र्यानंतर वीज तर पोहाेचली नाही; परंतु, तीन महिन्यांपासून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दोन किलोमीटर अंतरावरील तापी नदीपात्रातून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याने संतप्त नागरिकांनी मंगळवारी उपविभागीय कार्यलयावर धडक दिली व याबाबत निवेदन दिले.

विजेच्या समस्येतून नागरिक अद्यापही सुटले नाही. गावात कसाबसा सौरउर्जेचा आधार घेत फक्त मोक्याच्या ठिकाणी सौर कंदील लावण्यात आले त्यालाही भ्रष्टाचाराचे कुरण लागल्याने तेसुद्धा बंद पडले आहे. त्यामुळे गावात अंधार कायम आहेच, त्यासोबत नव्याने आणखी पाणीटंचाईची मोठी समस्या नागरिकांसमोर उभी झाली. तीन महिन्यापासून नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही. दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या तापी नदीपात्रातून पिण्याचे व वापरायचे पाणी आणावे लागत आहे. त्याबाबत गावकऱ्यांनी अनेकदा ग्रामपंचायत प्रशासनाला तक्रार दिल्या; परंतु, त्यांनी तांत्रिक अडचणींचा आधार घेत याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे कंटाळलेला नागरिकांनी मंगळवारला दुपारी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धाव घेऊन उपविभागीय अधिकारी सावनकुमार यांना निवेदन दिले. त्यावर ते काय करतात, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

पाणी पुरवठ्याची विहीर १० फूट उंच

गावातील विहीर दुरुस्तीचे काम चालू असून त्या ठिकाणी जुन्या विहिरीवर अंदाजे १० ते १५ फूट लांब बांधकाम केले आहे. अधिकारी, ठेकेदार यांनी जमिनीपासून बांधकाम केले नाही, विहिरीवर १० फूट बांधकाम केल्याने १० फूट उंच चढून पाणी ओढणे महिला व वृद्धांना शक्य नाही. त्या विहिरीचा मोबाइलमध्ये फोटो दाखवून, सांगा साहेब पाण्याची बकेट कशी ओढू, असा सवाल गावकऱ्यांनी एसडीओ यांना केला.

आरोग्यास धोका

तापी नदीपात्रातील पाणी आम्ही गावकरी पित आहे. त्या दूषित पाण्यामुळे आरोग्याला धोका आहे. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या तत्काळ निकाली काढावी, अन्यथा आमच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास त्याला शासन जबाबदार राहील, असा इशारा गावकऱ्यांनी दिल्याने अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतWaterपाणीAmravatiअमरावती