शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

स्वातंत्र्यानंतरही रंगुलबेलीत वीज नाही अन् आता पाणीटंचाई; ग्रामस्थ धडकले एसडीओ कार्यालयावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 14:23 IST

तीन महिन्यापासून नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही

धारणी (अमरावती) : मेळघाटातील अतिदुर्गम क्षेत्रातील रंगूबेली गावात स्वातंत्र्यानंतर वीज तर पोहाेचली नाही; परंतु, तीन महिन्यांपासून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दोन किलोमीटर अंतरावरील तापी नदीपात्रातून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याने संतप्त नागरिकांनी मंगळवारी उपविभागीय कार्यलयावर धडक दिली व याबाबत निवेदन दिले.

विजेच्या समस्येतून नागरिक अद्यापही सुटले नाही. गावात कसाबसा सौरउर्जेचा आधार घेत फक्त मोक्याच्या ठिकाणी सौर कंदील लावण्यात आले त्यालाही भ्रष्टाचाराचे कुरण लागल्याने तेसुद्धा बंद पडले आहे. त्यामुळे गावात अंधार कायम आहेच, त्यासोबत नव्याने आणखी पाणीटंचाईची मोठी समस्या नागरिकांसमोर उभी झाली. तीन महिन्यापासून नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही. दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या तापी नदीपात्रातून पिण्याचे व वापरायचे पाणी आणावे लागत आहे. त्याबाबत गावकऱ्यांनी अनेकदा ग्रामपंचायत प्रशासनाला तक्रार दिल्या; परंतु, त्यांनी तांत्रिक अडचणींचा आधार घेत याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे कंटाळलेला नागरिकांनी मंगळवारला दुपारी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धाव घेऊन उपविभागीय अधिकारी सावनकुमार यांना निवेदन दिले. त्यावर ते काय करतात, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

पाणी पुरवठ्याची विहीर १० फूट उंच

गावातील विहीर दुरुस्तीचे काम चालू असून त्या ठिकाणी जुन्या विहिरीवर अंदाजे १० ते १५ फूट लांब बांधकाम केले आहे. अधिकारी, ठेकेदार यांनी जमिनीपासून बांधकाम केले नाही, विहिरीवर १० फूट बांधकाम केल्याने १० फूट उंच चढून पाणी ओढणे महिला व वृद्धांना शक्य नाही. त्या विहिरीचा मोबाइलमध्ये फोटो दाखवून, सांगा साहेब पाण्याची बकेट कशी ओढू, असा सवाल गावकऱ्यांनी एसडीओ यांना केला.

आरोग्यास धोका

तापी नदीपात्रातील पाणी आम्ही गावकरी पित आहे. त्या दूषित पाण्यामुळे आरोग्याला धोका आहे. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या तत्काळ निकाली काढावी, अन्यथा आमच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास त्याला शासन जबाबदार राहील, असा इशारा गावकऱ्यांनी दिल्याने अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतWaterपाणीAmravatiअमरावती