शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

भरपाई मिळालीच नाही; रुपयात विमा काढून उपयोग काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 13:01 IST

Amravati : पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकऱ्यांना फक्त एक रुपयात पीक विमा योजनेत सहभाग असल्याने गतवर्षी पाच लाखांवर शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केले होते. पिकांचे नुकसान झाले असतानाही कंपनीद्वारा परतावा देण्यात आलेला नाही. त्याचा फटका यंदा बसल्याचे दिसून येत आहे. मुदत संपण्याला फक्त १० दिवस बाकी असताना केवळ एक लाख शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदविला आहे.

पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना एक रुपया विमा हप्ता भरून सहभागी घेता येतो. गतवर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ५.१० लाख अर्जाद्वारे या मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. यावर्षी सुद्धा अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाद्वारे करण्यात आले आहे. प्रत्यक्षात यंदा शेतकऱ्यांचा सध्या फारसा प्रतिसाद नसल्याचे दिसून येते.

विमा योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी शेतकरी स्वतः केंद्र सरकारच्या विमा पोर्टल वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. शेतकऱ्याचे ज्या बँकेमध्ये बचत खाते आहे, त्या बँकेमध्ये जाऊन तो विमा अर्ज भरू शकतो. विमा प्रतिनिधी यांच्यामार्फत ही विमा योजनेत सहभागी होता येते शिवाय सीएससी केंद्र चालकामार्फत अर्ज करता येऊ शकतो, असे कृषी विभागाने सांगितले.

योजनेत शेतकरी सहभागाची सद्यस्थितीकर्जदार शेतकऱ्यांचे अर्ज               - १५६४गैरकर्जदार शेतकरी सहभाग          - ३५६९५ जुलैपर्यंत शेतकरी सहभाग          - ९५१३३गतवर्षी तुलनेत सध्या सहभाग         - १८.६६गतवर्षी सहभागी शेतकरी संख्या     - ५,०९,५४५

गतवर्षीच्या परताव्यासाठी शेतकरी संतप्त● गतवर्षी बाधित पिकांसाठी तब्बल १६९५६३ पूर्वसूचना कंपनीला प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी १,१२,६०४ सूचना (६६.४० टक्के) कंपनीद्वारा नाकारण्यात आल्या. शिवाय फेर तपासणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही कंपनीद्वारा पालन नाही.

● कंपनीकडे शेतकरी हिस्सा, राज्य व केंद्र शासनाचा हिस्सा असे एकूण ३८२.३५ कोटी जमा झाले. तुलनेत स्थानिक नैसर्गिक आपत्ती ३७.५० कोटी, प्रतिकूल हवामान ९.३८ कोटी, काढणीपश्चात २.८३ कोटी, असा एकूण ४८.७७ कोटींचा परतावा देण्यात आला आहे.

गतवर्षीच्या परताव्यासाठी पीक विमा कंपनीकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. यंदाही एक रुपयात सहभागी होता येत असल्याने शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घ्यावा. या योजनेद्वारे नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण मिळते- राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीfarmingशेती