शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:11 IST

अमरावती : जिल्ह्यातील अतिवृष्टिग्रस्त परिसरात पंचनाम्यांना सुरुवात करण्यात आली आहे. पंचनामे परिपूर्ण, सविस्तर व गतीने पूर्ण करावेत. एकही बाधित ...

अमरावती : जिल्ह्यातील अतिवृष्टिग्रस्त परिसरात पंचनाम्यांना सुरुवात करण्यात आली आहे. पंचनामे परिपूर्ण, सविस्तर व गतीने पूर्ण करावेत. एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिले.

अतिवृष्टीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे पालकमंत्र्यांकडून पाठपुरावा होत असून, जिल्ह्यातील प्रत्येक बाधित शेतकरी बांधवाला भरपाई मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली आहे.

नुकसानीचा तपशील अचूक नोंदवा

जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेत तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार उपविभागीय अधिकारी रणजित भोसले, तहसीलदार संतोष काकडे, तहसीलदार नीता लबडे यांच्यासह पथकाने नुकसानग्रस्त भागात पाहणी व पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अमरावती तालुक्यात ब्राम्हणवाडा भगत, देवरा पुनर्वसन, शिराळा परिसरात पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. घरांची पडझड, शेतीपिकांचे नुकसान आदींबाबत प्रत्येक तपशील अचूक नोंदवा. शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, असे निर्देश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले. भातकुली तालुक्यात साऊर, रामा येथे घराच्या पडझडीबाबत पंचनामे सुरू झाले. साऊर येथे दीडशे घरांमध्ये पाणी शिरल्याचा प्रथमदर्शनी अहवाल आहे. नुकसानाबाबत पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे. शेतीचे पंचनामेही सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती तहसीलदार नीता लबडे यांनी दिली.

शेतीच्या नुकसानाचे पंचनामे तात्काळ पूर्ण करा

घरांच्या पडझडीची पंचनाम्याद्वारे नोंद घेतानाच शेतीपीकाच्या नुकसानाचे पंचनामेही तात्काळ पूर्ण करावेत. कृषिसहायक, तलाठी व ग्रामसेवक यांच्याकडून ही प्रक्रिया गतीने राबवा. जिल्ह्यातील अतिवृष्टीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी याबाबत चर्चा झाली असून, शेतकरी बांधवांना योग्य भरपाई मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ना. ठाकूर यांना दिली.

कोरोनाकाळात शेती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी बांधव अडचणीत आहेत. त्यात अतिवृष्टीसारखी नैसर्गिक आपत्ती उद्भवली आहे. शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी शासन खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहे. प्रशासनाने संवेदनशीलता बाळगून शेतकरी बांधवांची सुसंवाद साधून प्रत्येक नुकसानाची अचूक दखल घेत पंचनाम्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.