शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
3
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
4
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
5
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
6
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
7
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
8
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
9
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
10
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
11
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
12
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
13
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
14
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
15
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
16
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा
17
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
18
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
19
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
20
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...

एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:11 IST

अमरावती : जिल्ह्यातील अतिवृष्टिग्रस्त परिसरात पंचनाम्यांना सुरुवात करण्यात आली आहे. पंचनामे परिपूर्ण, सविस्तर व गतीने पूर्ण करावेत. एकही बाधित ...

अमरावती : जिल्ह्यातील अतिवृष्टिग्रस्त परिसरात पंचनाम्यांना सुरुवात करण्यात आली आहे. पंचनामे परिपूर्ण, सविस्तर व गतीने पूर्ण करावेत. एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिले.

अतिवृष्टीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे पालकमंत्र्यांकडून पाठपुरावा होत असून, जिल्ह्यातील प्रत्येक बाधित शेतकरी बांधवाला भरपाई मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली आहे.

नुकसानीचा तपशील अचूक नोंदवा

जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेत तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार उपविभागीय अधिकारी रणजित भोसले, तहसीलदार संतोष काकडे, तहसीलदार नीता लबडे यांच्यासह पथकाने नुकसानग्रस्त भागात पाहणी व पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अमरावती तालुक्यात ब्राम्हणवाडा भगत, देवरा पुनर्वसन, शिराळा परिसरात पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. घरांची पडझड, शेतीपिकांचे नुकसान आदींबाबत प्रत्येक तपशील अचूक नोंदवा. शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, असे निर्देश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले. भातकुली तालुक्यात साऊर, रामा येथे घराच्या पडझडीबाबत पंचनामे सुरू झाले. साऊर येथे दीडशे घरांमध्ये पाणी शिरल्याचा प्रथमदर्शनी अहवाल आहे. नुकसानाबाबत पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे. शेतीचे पंचनामेही सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती तहसीलदार नीता लबडे यांनी दिली.

शेतीच्या नुकसानाचे पंचनामे तात्काळ पूर्ण करा

घरांच्या पडझडीची पंचनाम्याद्वारे नोंद घेतानाच शेतीपीकाच्या नुकसानाचे पंचनामेही तात्काळ पूर्ण करावेत. कृषिसहायक, तलाठी व ग्रामसेवक यांच्याकडून ही प्रक्रिया गतीने राबवा. जिल्ह्यातील अतिवृष्टीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी याबाबत चर्चा झाली असून, शेतकरी बांधवांना योग्य भरपाई मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ना. ठाकूर यांना दिली.

कोरोनाकाळात शेती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी बांधव अडचणीत आहेत. त्यात अतिवृष्टीसारखी नैसर्गिक आपत्ती उद्भवली आहे. शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी शासन खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहे. प्रशासनाने संवेदनशीलता बाळगून शेतकरी बांधवांची सुसंवाद साधून प्रत्येक नुकसानाची अचूक दखल घेत पंचनाम्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.