शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:11 IST

अमरावती : जिल्ह्यातील अतिवृष्टिग्रस्त परिसरात पंचनाम्यांना सुरुवात करण्यात आली आहे. पंचनामे परिपूर्ण, सविस्तर व गतीने पूर्ण करावेत. एकही बाधित ...

अमरावती : जिल्ह्यातील अतिवृष्टिग्रस्त परिसरात पंचनाम्यांना सुरुवात करण्यात आली आहे. पंचनामे परिपूर्ण, सविस्तर व गतीने पूर्ण करावेत. एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिले.

अतिवृष्टीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे पालकमंत्र्यांकडून पाठपुरावा होत असून, जिल्ह्यातील प्रत्येक बाधित शेतकरी बांधवाला भरपाई मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली आहे.

नुकसानीचा तपशील अचूक नोंदवा

जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेत तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार उपविभागीय अधिकारी रणजित भोसले, तहसीलदार संतोष काकडे, तहसीलदार नीता लबडे यांच्यासह पथकाने नुकसानग्रस्त भागात पाहणी व पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अमरावती तालुक्यात ब्राम्हणवाडा भगत, देवरा पुनर्वसन, शिराळा परिसरात पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. घरांची पडझड, शेतीपिकांचे नुकसान आदींबाबत प्रत्येक तपशील अचूक नोंदवा. शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, असे निर्देश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले. भातकुली तालुक्यात साऊर, रामा येथे घराच्या पडझडीबाबत पंचनामे सुरू झाले. साऊर येथे दीडशे घरांमध्ये पाणी शिरल्याचा प्रथमदर्शनी अहवाल आहे. नुकसानाबाबत पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे. शेतीचे पंचनामेही सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती तहसीलदार नीता लबडे यांनी दिली.

शेतीच्या नुकसानाचे पंचनामे तात्काळ पूर्ण करा

घरांच्या पडझडीची पंचनाम्याद्वारे नोंद घेतानाच शेतीपीकाच्या नुकसानाचे पंचनामेही तात्काळ पूर्ण करावेत. कृषिसहायक, तलाठी व ग्रामसेवक यांच्याकडून ही प्रक्रिया गतीने राबवा. जिल्ह्यातील अतिवृष्टीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी याबाबत चर्चा झाली असून, शेतकरी बांधवांना योग्य भरपाई मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ना. ठाकूर यांना दिली.

कोरोनाकाळात शेती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी बांधव अडचणीत आहेत. त्यात अतिवृष्टीसारखी नैसर्गिक आपत्ती उद्भवली आहे. शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी शासन खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहे. प्रशासनाने संवेदनशीलता बाळगून शेतकरी बांधवांची सुसंवाद साधून प्रत्येक नुकसानाची अचूक दखल घेत पंचनाम्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.