शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीचा प्रवास, ट्रॅवल्स-हॉटेल्सची फिक्सिंग, प्रवाशांना निकृष्ट जेवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 14:04 IST

मनमानी दराने आकारणी; प्रशासनाची मुकसंमती, प्रवासी हैराण

मनीष तसरे

अमरावती : लांब पल्ल्याच्या ट्रॅव्हल्स सहसा रात्री प्रवाशांच्या जेवणाकरिता ठरलेल्या हॉटेल किंवा ढाब्यावर थांबतात. मात्र अनेकदा प्रवाशांची हॉटेल संचालकडून चढ्या दरात जेवण अथवा खाद्यपदार्थांची विक्री करून आर्थिक लूट होताना ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने सोमवारी रात्री केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत लक्षात आले. मात्र, असे असताना प्रशासन मात्र यांच्यावर कुठलीच कारवाई करत नाही.

ट्रॅव्हल्स चालकांचे ‘फिक्स’ असलेल्या हाॅटेलवर त्यांचा थांबा असतो. ट्रॅव्हल्स ज्या हॉटेल्सवर थांबतात तिथे त्या प्रवाशांच्या जेवणाकरिता जास्तीत जास्त अर्धा तास थांबतात. अशावेळी बऱ्याच जणांसोबत लहान मुले असतात, तर कधी वृद्ध असतात. अनेक जण कमीत कमी खर्चात जेवण कसे होईल हेच बघतात. अशावेळी जवळपास दुसरे हॉटेल अथवा ढाबा राहत नाही. असले तरी लांब अंतरावर असते. त्या हॉटेलवर जेवणासाठी गेलो अन ट्रॅव्हल्स निघून जाईल, याचीच भीती असते. मात्र, भूक लागलेली असते, कधी छोटी मुले हट्ट करतात. पटकन जेवण करायचे नाहीतर गाडी निघेल. ही पण काही कारणे आहेत. त्यामुळे प्रवास ज्या प्रकारचे जेवण वा फूडस् आहे, त्या भावात विकत घेतात. काहीही प्रश्न किंवा छापील किंमत बघत नाही, हे वास्तव आहे.

‘लोकमत’ ने काय पाहिले?

सोमवारी रात्री वाजताच्या १०च्या सुमारास बडनेरा ते अकोला राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलची प्रत्यक्ष पाहणी केली असता त्या ठिकाणी १२ वाजेपर्यंत लांब पल्ल्याच्या मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या २५ ट्रॅव्हल्स थांबल्या. या ठिकाणी दुसरे कुठलेही हॉटेल वा ढाबा नसल्याने प्रवाशांना दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. या ट्रॅव्हल्समधील अनेक प्रवाशांनी या हाॅटेलमध्ये जेवण केले. जेवणानंतर अनेकांनी बिलासंबंधी विचारणा केली असता दरामध्ये बराच फरक आढळून आला. मात्र अनेकांना पुढचा प्रवासाला जायचे असल्याने कोणताही वाद अथवा वेळ न घालवता निघून गेले

पाण्याची बॉटल २० रुपये

अमरावती-अकोला मार्गावरील एका हॉटेलवर रात्री लांब पल्ल्याच्या अनेक ट्रॅव्हल्स येथे थांबतात. काही प्रवासी या ठिकाणी येथे जेवण करतात, तर काही प्रवासी चहा-पाणी घेतात. मात्र या ठिकाणी पाण्याची बॉटेल २० रुपयाला मिळते. बॉटलवर छापील किमत ही १५ रुपये एवढीच आहे, हे पाहणीत लक्षात आले. बाॅटल चिलिंगच्या नावावर या ठिकाणी नी प्रवाशांची लूट होत असल्याचे या ठिकाणी दिसून आले.

स्वच्छता नाहीच

नागपूर, अमरावतीहून पुढे नाशिक, मुंबई, संभाजीनगरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स ठराविक हॉटेलवर थांबतात. तेव्हा अनेक प्रवासी प्रसाधनगृहात जातात. मात्र या ठिकाणी स्वच्छता मात्र दिसून आली नाही.

सुरक्षादेखील नाही

प्रवासादरम्यान अनेकजण मद्यपान करतात. हाॅटेलमध्ये मद्यपान करणाऱ्यांकरिता वेगळी व्यवस्था असायला हवी. मात्र या हाॅटेलवर तशी दिसून आली नाही. त्या कारणाने महिला या ठिकाणी असुरक्षित असल्याचे दिसून आले.

हाॅटेल संचालक अन्न परवानाकरिता अर्ज करतात. नियमात असेल तर आम्ही परवानगी देताे. मात्र पाण्याच्या बॉटलचे जास्त पैसे घेत असतील तर त्याबाबत आम्ही काही करू शकत नाही.

- शरद कोलते, सहआयुक्त, अन्न व औषधी प्रशासन

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकAmravatiअमरावतीpassengerप्रवासी