शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

फोनवरून बोलण्यासाठी करावी लागते ‘वीरुगिरी’

By admin | Updated: September 26, 2015 00:01 IST

डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत मेळघाटातील एक गाव जागतिक पातळीवर लवकरच झळकणार आहे. दुसरीकडे आप्तस्वकीयांसोबत संवाद साधण्यासाठी नागरिकांनी...

योजनेचा बट्ट्याबोळ : दूरसंचार विभाग कुंभकर्णी झोपेतनरेंद्र जावरे चिखलदराडिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत मेळघाटातील एक गाव जागतिक पातळीवर लवकरच झळकणार आहे. दुसरीकडे आप्तस्वकीयांसोबत संवाद साधण्यासाठी नागरिकांनी पाण्याच्या टाकीवर चढून संवाद साधावा लागत असल्याचे दुर्दैवी चित्र तालुक्याच्या काटकुंभ येथील आहे. येथील बीएसएनएलचे टॉवर महिनाभरापासून चालू-बंद होत आहे.तालुक्यातील काटकुंभ येथे भारत संचार विभागाचे मोबाईल टॉवर आहे. यामुळे परिसरातील ५२ गावांपैकी किमान ८ ते १० गावांत मोबाईल नेटवर्क होते. परंतु महिनाभरापासून बीएसएनएलची सेवा कोलमडली आहे. लाखो रूपयांचे टॉवर निकामी झाल्याने ते पांढरा हत्ती ठरले आहे. या टॉवरकरिता आवश्यक यंत्रसामग्री कालबाह्य झाल्याने ते बंद पडून आहे. यासंदर्भात युवक काँग्रेसचे महासचिव राहुल येवले, पीयूष मालवीय, गौरव काळे, अमोल बोरेकार आदी पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनसुद्धा दिले. मात्र त्यावर एक महिन्याचा कालावधी लोटत असून कुठल्याच प्रकारची कार्यवाही संबंधित विभागाने केली नाही. परिणामी परिसरातील आदिवासींमध्ये शोभेची वास्तू ठरलेल्या टॉवरविरुद्ध संताप खदखदत आहे. पोटासाठी आवश्यक झाला मोबाईलजीवनावश्यक वस्तूप्रमाणेच दररोजच्या जीवनात मोबाईल आवश्यक झाला असताना मेळघाटातील आदिवासींच्या पोटासाठी अनिवार्य झाल्याचे स्पष्ट होत आहे. पोटासाठी स्थलांतरित होणाऱ्या आदिवासींच्या हाताला मेळघाटात काम नसल्याने ते दुसऱ्या शहरात पाठीवर बिऱ्हाड घेऊन निघतात, आवश्यक कामाच्या ठिकाणी जावे लागण्यासाठी त्यांनी संबंधित मजुरांच्या दलालास आपला मोबाईल क्रमांक दिला आहे. परंतु काटकुंभ येथील सेवा ७ महिन्यांपासून बंद असल्याने त्यांच्या पोटाचा प्रश्न या बंद टॉवरमुळे ऐरणीवर आला आहे. रोजंदारीच्या कामासह इतर आवश्यक संवाद आप्तस्वकियांसोबत साधणे बंद झाले आहे. टॉवरवर चढून वीरूगिरीकाटकुंभ येथील मुख्य चौकात पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. ७ महिन्यांपासून बीएसएनएल सेवा बंद असल्याने नागरिकांना या टाकीच्या पाऱ्यांवर चढून संवाद साधावा लागत आहे. लगतच्या भैसदेही, बैतूल (मध्य प्रदेश) चे नेटवर्क येथे लागते, तर कुठे उंच टेकडीवर चढावे लागते. त्यानंतर संवाद साधला जातो. यात मात्र पलिकडून फोन आल्यास रोमिंगचा अतिरिक्त भार सहन करावा लागतो. त्यापेक्षा स्वत:च बोलणे पसंद करतात. पाण्याची टाकी संवाद साधण्याचे केंद्र ठरले आहे.