शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

फोनवरून बोलण्यासाठी करावी लागते ‘वीरुगिरी’

By admin | Updated: September 26, 2015 00:01 IST

डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत मेळघाटातील एक गाव जागतिक पातळीवर लवकरच झळकणार आहे. दुसरीकडे आप्तस्वकीयांसोबत संवाद साधण्यासाठी नागरिकांनी...

योजनेचा बट्ट्याबोळ : दूरसंचार विभाग कुंभकर्णी झोपेतनरेंद्र जावरे चिखलदराडिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत मेळघाटातील एक गाव जागतिक पातळीवर लवकरच झळकणार आहे. दुसरीकडे आप्तस्वकीयांसोबत संवाद साधण्यासाठी नागरिकांनी पाण्याच्या टाकीवर चढून संवाद साधावा लागत असल्याचे दुर्दैवी चित्र तालुक्याच्या काटकुंभ येथील आहे. येथील बीएसएनएलचे टॉवर महिनाभरापासून चालू-बंद होत आहे.तालुक्यातील काटकुंभ येथे भारत संचार विभागाचे मोबाईल टॉवर आहे. यामुळे परिसरातील ५२ गावांपैकी किमान ८ ते १० गावांत मोबाईल नेटवर्क होते. परंतु महिनाभरापासून बीएसएनएलची सेवा कोलमडली आहे. लाखो रूपयांचे टॉवर निकामी झाल्याने ते पांढरा हत्ती ठरले आहे. या टॉवरकरिता आवश्यक यंत्रसामग्री कालबाह्य झाल्याने ते बंद पडून आहे. यासंदर्भात युवक काँग्रेसचे महासचिव राहुल येवले, पीयूष मालवीय, गौरव काळे, अमोल बोरेकार आदी पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनसुद्धा दिले. मात्र त्यावर एक महिन्याचा कालावधी लोटत असून कुठल्याच प्रकारची कार्यवाही संबंधित विभागाने केली नाही. परिणामी परिसरातील आदिवासींमध्ये शोभेची वास्तू ठरलेल्या टॉवरविरुद्ध संताप खदखदत आहे. पोटासाठी आवश्यक झाला मोबाईलजीवनावश्यक वस्तूप्रमाणेच दररोजच्या जीवनात मोबाईल आवश्यक झाला असताना मेळघाटातील आदिवासींच्या पोटासाठी अनिवार्य झाल्याचे स्पष्ट होत आहे. पोटासाठी स्थलांतरित होणाऱ्या आदिवासींच्या हाताला मेळघाटात काम नसल्याने ते दुसऱ्या शहरात पाठीवर बिऱ्हाड घेऊन निघतात, आवश्यक कामाच्या ठिकाणी जावे लागण्यासाठी त्यांनी संबंधित मजुरांच्या दलालास आपला मोबाईल क्रमांक दिला आहे. परंतु काटकुंभ येथील सेवा ७ महिन्यांपासून बंद असल्याने त्यांच्या पोटाचा प्रश्न या बंद टॉवरमुळे ऐरणीवर आला आहे. रोजंदारीच्या कामासह इतर आवश्यक संवाद आप्तस्वकियांसोबत साधणे बंद झाले आहे. टॉवरवर चढून वीरूगिरीकाटकुंभ येथील मुख्य चौकात पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. ७ महिन्यांपासून बीएसएनएल सेवा बंद असल्याने नागरिकांना या टाकीच्या पाऱ्यांवर चढून संवाद साधावा लागत आहे. लगतच्या भैसदेही, बैतूल (मध्य प्रदेश) चे नेटवर्क येथे लागते, तर कुठे उंच टेकडीवर चढावे लागते. त्यानंतर संवाद साधला जातो. यात मात्र पलिकडून फोन आल्यास रोमिंगचा अतिरिक्त भार सहन करावा लागतो. त्यापेक्षा स्वत:च बोलणे पसंद करतात. पाण्याची टाकी संवाद साधण्याचे केंद्र ठरले आहे.