अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चौसाळा येथील राजेंद्र काळमेघ या शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर ६ हेक्टर ११ आर जमिनीची नोंद आहे. परंतु, तब्बल १२ वर्षांपूर्वी मोजणीचे पैसे भरूनही शेताची मोजणी महसूल विभागाने अर्धवट केली व शेत घटवून ५ हेक्टर १३ आर केले, असा आरोप काळमेघ यांचा आहे.
नझुल विभागाचे प्रमुख एस.जी. पालवे यांनी मात्र ही बाब नाकारली. सदर शेतकऱ्याचे आजूबाजूचे शेतकरी जोपर्यंत संमतीपत्र लेखी स्वरुपात देत नाही तोपर्यंत मोजणी करून देणे कठीण आहे, असे सांगितले. यापूर्वी प्रत्यक्ष मोजणी करून जे क्षेत्र मोजणीत भरले त्याचा सातबारा दित्याचे नझुलचे म्हणणे आहे. सध्यातरी हा प्रश्न अनुत्तरित आहे. पण नझुलचे लोक पदोपदी खोटे बोलतात, असा काळमेघ यांचा आरोप आहे. या शेतकऱ्याची मागणी रास्त असल्यामुळे त्यांचेवर कोणताहीगुन्हा नोंदविला नाही, असे पोलीस प्रशासनाने सांगितले.