शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पुणे येथे शेतकरी संघटनेची होणार राष्ट्रीय किसान परिषद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 15:05 IST

शेतकरी संघटनेच्यावतीने पुण्याच्या नवी पेठमध्ये राष्ट्रीय किसान परिषदेचे आयोजन १० डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. शरद जोशी व बाबू गेणू स्मृत्यर्थ आयोजित ही परिषद १२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. 

अमरावती-  शेतकरी संघटनेच्यावतीने पुण्याच्या नवी पेठमध्ये राष्ट्रीय किसान परिषदेचे आयोजन १० डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. शरद जोशी व बाबू गेणू स्मृत्यर्थ आयोजित ही परिषद १२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. 

देशाच्या स्वातंत्र्यापासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या चळवळीत ७० वर्षांत समस्या बिकट व जटील होत चालल्या आहेत. आंदोलनातून नेते तयार होतात. शेतकºयांच्या हाती मात्र काहीच लागत नाही. सत्ताधारी व विरोधी पक्षांबाबतही हाच अनुभव आल्याने शेतकऱ्यांच्या हिताचा तिसरा पर्याय उपलब्ध करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय किसान परिषद होत आहे. यावेळी सुकाणू समितीचे सदस्य आणि देशभरातील शेतकरी नेते उपस्थित राहतील. शेतकऱ्यांच्या गळ्याला फास ठरणारे कायदे व धोरण बदलविण्याच्या दृष्टीने विधानसभेत आमदार व संसदेत खासदार निवडून देण्यासंबंधी देशव्यापी मोहिमेची चाचपणी यावेळी होईल, अशी माहिती सुकाणू समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य व विदर्भ शेतकरी संघटनेचे संयोजक धनंजय काकडे यांनी दिली.

दरम्यान, राष्ट्रीय किसान परिषदेत १० डिसेंबरला रघुनाथदादा पाटील, चेगल रेड्डी (आंध्र प्रदेश), सतनामसिंग बेरू (पंजाब), दशरथ रेड्डी (आंध्र प्रदेश मार्गदर्शन करतील. ११ डिसेंबरला दोन सत्रांमध्ये रघुनाथदादा पाटील, श्रीगोपाल (तामिळनाडू), कालीदास आपेट, आ. बच्चू कडू, सतनामसिंग बेरू (पंजाब), समशेरसिंह दहिया (हरियाणा), बी.टी. अग्रवाल (राजस्थान), पार्थ शहा, हेरंब कुळकर्णी (दिल्ली), छावा संघटनेचे करण गायकर, मिलिंद मुरुगकर, शांताकुमार कुलबर्गी (कर्नाटक), बाळासाहेब पटारे (अहमदनगर), बाबा आढाव, कालीदास आपेट, दिनेश ओऊळकर (माजी सहकार आयुक्त) विविध विषयांवर मार्गदर्शन करतील. १२ डिसेंबरला शिवाजीनाना नांदखिले, योगेश दहिया (उत्तर प्रदेश), चंद्रशेखर (कर्नाटक), वीरेंद्रसिंह राय (बिहार), अनिल पाटील, तसनीम अहमद यांचे मार्गदर्शन होणार आहे.