शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
2
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
3
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
4
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
5
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
6
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
7
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
8
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
9
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
10
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
11
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
12
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
13
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
14
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
15
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
16
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
17
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
18
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
19
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!

 बडने-यातील मेघे अभियांत्रिकीला राष्ट्रीय स्वच्छ भारत पुरस्कार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 17:31 IST

अमरावती येथील विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीद्वारा संचालित बडनेरा स्थित प्रा.राम मेघे कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅन्ड मॅनेजमेंटला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी आणि स्वच्छ भारत दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वच्छ भारत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते, हे विशेष.

अमरावती - येथील विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीद्वारा संचालित बडनेरा स्थित प्रा.राम मेघे कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅन्ड मॅनेजमेंटला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी आणि स्वच्छ भारत दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वच्छ भारत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते, हे विशेष.दिल्ली येथील विज्ञान भवनातील प्लेनरी हॉलमध्ये २ आॅक्टोबर रोजी राज्यातून एकमात्र मेघे अभियांत्रिकीला संस्था गटातून राष्ट्रीय स्वच्छ भारत पुरस्कार बहाल करण्यात आला. केंद्रीय शहरी विकास राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री अहलुवालिया आणि नगरविकास विभागाचे सचिव मिश्रा यांच्या हस्ते दिनेश हरकुट व सारंग धावडे यांनी महाविद्यालयाच्यावतीने हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी सारंग धावडे, रामेश्वर इंगळकर, आशिष सायवान, अतुल डहाणे, रश्मी सोनार आदींनी रासेयो विद्यार्थ्यांचे कौतुक करीत पुरस्कार मिळाल्याने स्वच्छतेबाबतची जबाबदारी अधिक वाढल्याची भावना व्यक्त केली.हा पुरस्कार मेघे अभियांत्रिकीला मिळाल्याने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मिशन स्वच्छ भारत' या हाकेला साद देत मेघे अभियांत्रिकीने २ आॅक्टोबर २०१४ पासून या अभियानात सहभाग घेतला. स्वच्छ भारत अभियान ही चळवळ राबविताना मेघे अभियांत्रिकीचे रासेयो पथक, प्राध्यापक वृंद, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचाºयांनी स्वत:ला झोकून देत अमरावती व बडनेरा शहरात निरंतर स्वच्छता अभियान राबविले. तसेच विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीने स्वच्छ भारत अभियानास अपेक्षित असा संस्थेचा विकास केला. अभियांत्रिकीचा स्वच्छ परिसर, देखण्या इमारती, दर्जेदार शिक्षण आदी बाबी स्वच्छ भारत पुरस्कारासाठी पूरक ठरल्याचे  संस्थेचे अध्यक्ष नितीन धांडे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत सांगितले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने संस्थेला विद्यापीठस्तरीय, राज्यस्तरीय स्वच्छ भारत मिशन पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यानंतर सन २०१४ पासून प्राचार्य एम.एस.अली, रासेयोचे कार्यक्रम अधिकारी सारंग धावडे, महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचाºयांनी स्वच्छतेसंदर्भात हिरीरीने सहभाग घेतला. महाविद्यालयाचा परिसर सतत स्वच्छ ठेवण्यात चमू यशस्वी ठरली. पत्रपरिषदेला विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष नितीन धांडे, उपाध्यक्ष विनय गोहाड, कोषाध्यक्ष पंकज देशमुख, सचिव युवराज चौधरी, तर सदस्य हेमंत देशमुख, नितीन हिवसे, उदय देशमुख, गजानन काळे, रागिणी देशमुख, प्राचार्य एम.एस. अली, प्रभारी प्राचार्य एन.व्ही. ठाकूर आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र