शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

वातावरणीय बदलात नंदुरबार, धुळे, बुलडाणा अतिसंवेदनशील; ‘टेरी’चा अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 19:24 IST

वातावरणीय बदलाचे शास्त्रोक्त अनुमान काढण्यासाठी युके मेट आॅफिस, द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (टेरी) ही संस्था प्रयत्नशील आहे. संस्थेने सन २०७० पर्यंतच्या वातावरणीय बदलांच्या अनुमानाचा अभ्यास करून वातावरणीय बदलासाठी अतिसंवेदनशील असलेल्या जिल्ह्यांची यादी निश्चित केली आहे.

- गजानन मोहोड

अमरावती : वातावरणीय बदलाचे शास्त्रोक्त अनुमान काढण्यासाठी युके मेट आॅफिस, द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (टेरी) ही संस्था प्रयत्नशील आहे. संस्थेने सन २०७० पर्यंतच्या वातावरणीय बदलांच्या अनुमानाचा अभ्यास करून वातावरणीय बदलासाठी अतिसंवेदनशील असलेल्या जिल्ह्यांची यादी निश्चित केली आहे. यामध्ये नंदुरबार, धुळे व बुलडाणा जिल्हा पहिल्या तीन क्रमांकावर  असल्याचे पर्यावरण विभागाने स्पष्ट केले आहे.जागतिक वातावरणबदलामुळे राज्यातील तापमानातदेखील वाढ झाली. यामुळे पर्जन्यमान व उष्णता निर्देशांकात बदल होत आहे. राज्यात सन २०३०, सन २०५० व सन २०७० या कालखंडात वाढते तापमान, आर्द्रतेमधील बदलांमुळे  पिकांच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होणार आहे. अनियमित पावसाचे वातावरण पिकांवर रोगराई वाढण्यास कारणीभूत ठरेल. डासांच्या प्रजननामुळे होणाºया रोगांमध्ये वाढ होणार आहे. बदलणाºया वातावरणामुळे पिकांची तग धरण्याची शक्ती कमी होणार आहे.  या संभाव्य संवेदनशील निर्देशांक ( व्हर्नेबिलिटी इंडेक्स) नुसार वातावरणीय बदलास राज्यातील नंदुरबार जिल्हा सर्वाधिक संवेदनशील आहे. याखालोखाल धुळे, बुलडाणा, जळगाव, हिंगोली, नाशिक, जालना, गोंदिया, वाशिम, गडचिरोली या जिल्ह्यांचा क्रम अहवालात नमूद आहे. समुद्र किनारे, जंगले, आरोग्य, पाण्याचे स्रोत, जैवविविधता आदींवर वातावरणीय बदलांच्या अनुकूलनासाठी (अ‍ॅडॉप्टेशन) व बदलांचे परिणाम कमी करण्यासाठी (मीडिटेशन) पर्यावरण विभागाने व्यापक धोरण तयार केले आहे.

या आहेत महत्त्वाच्या शिफारशी* नदीच्या उगमस्थानापासून जंगलांचे रक्षण करणे. त्रिस्तरीय वनांमुळे पावसाचे पाणी मुरण्याची डोंगराची क्षमता वाढून पुराची तीव्रता कमी होईल. वर्षभर नदी प्रवाहित राहून भुजल पातळी अबाधित राखण्यास मदत होणार आहे.* बदलत्या वातावरणात तग धरणा-या पिकांच्या व फळांंच्या प्रजातीच्या संशोधनास व लागवडीस प्रोत्साहन देणे. पारंपरिक पिकांचे संवर्धन करणे. उपजीविकेच्या पर्यायी संसाधनास प्रोत्साहन देणे* वातावरणीय बदलास पूरक गावांच्या निर्मितीवर भर देणे. जनसहभागातून पर्यावरण संवर्धन, जलसंधारण, गावतळे, वनराई आदी योजनांचा विकास करणे. सागर किनारी कांदळवनांचे व कोरलचे संवर्धन करणे.

टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र