शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाखांची सुपारी... आणि एका लिपिकाचा रक्तरंजित मृत्यू !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 16:37 IST

आर्थिक व्यवहारातून हत्येचा संशय : तीन विधिसंघर्षित बालके ताब्यात, क्राईमची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील एका शाळेत कार्यरत वरिष्ठ लिपिकाच्या हत्येचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणाच्या मास्टरमाइंड असलेल्या फरार आरोपीने सुमारे दीड लाख रुपयांमध्ये त्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती चौकशीअंती पुढे आली आहे. २२ ऑगस्ट रोजी सकाळी ८ च्या सुमारास बडनेरा रेल्वेस्थानक ते तिलकनगर मार्गावर रस्त्याच्या कडेला एक मृतदेह रक्तबंबाळ स्थितीत आढळला होता. अतुल ज्ञानदेव पुरी (वय ५०, रा. पुंडलिकबाबा नगर) अशी मृताची ओळख पटविण्यात आली होती. या हत्येला आर्थिक व्यावहारिक वादाची किनार असण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. मात्र अद्यापही मास्टरमाइंड हाती आला नसल्याने खुनाचे कारण स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या हत्या प्रकरणात दोन युवकांना अटक केली. तर, तीन विधिसंघर्ष बालकांनाही चौकशीकरिता ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी रविवारी पत्रपरिषदेत दिली. साहिल ऊर्फ गोलू हरी मोहड (१९, रा. आदिवासी कॉलनी), सक्षम विजय लांडे (१९, रा. सावंगा गुरव, नांदगावखंडेश्वर, ह. मु. व्यंकय्यापुरा, अमरावती), अशी अटक दोघांची नावे आहेत. खून करताना या दोघांसोबत एक विधिसंघर्षित बालकही होता. अतुल पुरी यांचा खून केल्यानंतर त्यांना पळून जाण्यासाठी अन्य दोन विधिसंघर्ष बालकांनी मदत केली. त्यामुळे एकूण तीन विधिसंघर्ष बालकांना आतापर्यंत चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. आर्थिक व्यवहारातून अतुल पुरी यांच्या हत्येसाठी सुपारी देण्यात आली. सुपारी देणाऱ्या मास्टरमाइंडचा चेहरा उलगडला असला तरी त्याच्या अटकेनंतर हत्येचे कारण स्पष्ट होईल, असे शिंदे म्हणाले. 

मास्टरमाईंडच्या शोधार्थ पथके रवानाअतुल पुरी यांच्याविरूद्ध गतवर्षी फ्रेजरपुरा पोलिसांत गंभीर गुन्हा दाखल होता. त्यात त्यांना अटक देखील झाली होती. ती घटनादेखील आर्थिक व्यवहारातून घडली होती. त्यामुळे पुरी यांचा खून सुपारी देऊन करवून घेतल्याचे उघड झाले असले तरी कारण मात्र स्पष्ट झाले नाही. त्यामुळे पोलिसांनी जुन्या प्रकरणाचे धागेदोरे जुळविण्याकडे लक्ष वळविले आहे.

कारंजा लाडला पळाले२२ ऑगस्ट रोजी सकाळी अतुल पुरी हे बडनेरा रेल्वे स्थानकाकडे दुचाकीने जात होते. त्यावेळी दुचाकीवर असलेल्या तिघांनी पाठलाग करून अडवून त्यांची हत्या केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले होते. ते तिघेही मारेकरी वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथे निघून गेले होते. त्यांना गुन्हे शाखेने कारंजालाड येथून अटक करून बडनेरा पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षकत्रयी अमोल कडू, महेश इंगोले व अनिकेत कासार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती