शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
2
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
3
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
4
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
5
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
6
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
7
मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले
8
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
9
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
10
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
11
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
12
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
13
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
14
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
15
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
16
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
17
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
18
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
19
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड

राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्गांवर सर्वाधिक अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 05:00 IST

ग्रामीण हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान ३६ अपघातांची नोंद झाली. यामध्ये १२ जणांचे प्राण गेले. यामध्ये १० पुरुष व दोन महिला आहेत. ४६ जण जखमी झाले. राज्य मार्गांवर एकूण २८१ अपघात झाले. यामध्ये १२३ जणांचे बळी गेले. यात १०९ पुरुष व १४ महिला आहेत. ग्रामीण हद्दीत इतर २४२ अपघातांची नोंद झाली.

ठळक मुद्दे३१७ अपघातांमध्ये १३५ जणांचा मृत्यू : ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील आकडेवारी

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पोलीस अधीक्षक कार्यालय अंतर्गत ग्रामीण भागात एकूण ३२ पोलीस ठाणे येतात. ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येणारे राष्ट्रीय महामार्ग, प्रमुख जिल्हा व राज्य मार्गावर वर्षभरात सर्वाधिक ३१७ अपघात घडले. यामध्ये १३५ जणांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे.ग्रामीण हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान ३६ अपघातांची नोंद झाली. यामध्ये १२ जणांचे प्राण गेले. यामध्ये १० पुरुष व दोन महिला आहेत. ४६ जण जखमी झाले. राज्य मार्गांवर एकूण २८१ अपघात झाले. यामध्ये १२३ जणांचे बळी गेले. यात १०९ पुरुष व १४ महिला आहेत. ग्रामीण हद्दीत इतर २४२ अपघातांची नोंद झाली. यात ९० पुरुष व सहा महिला अशा ९६ जणांचा मृत्यू झाला. अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, याकरिता दरवर्षी शासनाच्या आरटीओ, पोलीस प्रशासन विभाग, सार्वजनिक बांधकामसह इतर विभागांच्यावतीने रस्ता सुरक्षा अभियान राबविले जाते; पण अपघातांची संख्या दरवर्षी वाढतच आहेत.आणखी १९ ब्लॅक स्पॉट वाढलेजिल्ह्यात आणखी १९ अपघातप्रवण स्थळे (ब्लॅक स्पॉट) वाढल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिली. शहर वाहतूक पोलीस व जिल्हा ग्रामीण वाहतूक पोलिसांची ‘ब्लॅक स्पॉट’ची आकडेवारी यात कुठेही तारतम्य नाही. त्यांची आकडेवारी आरटीओच्या आकडेवारीशी जुळेनाशी झाली आहे. वाहतूक पोलिसांनी जिल्ह्यात एकूण २९ ‘ब्लॅक स्पॉट’ असल्याची माहिती दिली. परंतु, दीड वर्षांपूर्वी ३२ ‘ब्लॅक स्पॉट’ निश्चित करण्यात आले होते. २५ नोव्हेंबर २०१९ ला रस्ता सुरक्षा संसदीय क्षेत्र समितीच्या बैठकीत १९ ‘ब्लॅक स्पॉट’मध्ये वाढ करून ४८ ब्लॅक स्पॉट असल्याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाला पाठविण्यात आली. त्या ब्लॅक स्पॉटची सुधारणा किंवा उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ती यादी पाठविण्यात आल्याची माहिती आरटीओ कार्यालयाने दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात नेमके ‘ब्लॅक स्पॉट’ किती, याची तपासणी करून किती ठिकाणचे ‘ब्लॅक स्पॉट’ची सुधारणा केली आहे, याची वरिष्ठ अधिकाºयांंद्वारे तपासणी होणे अपेक्षित आहे.

टॅग्स :Accidentअपघात