शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्गांवर सर्वाधिक अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 05:00 IST

ग्रामीण हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान ३६ अपघातांची नोंद झाली. यामध्ये १२ जणांचे प्राण गेले. यामध्ये १० पुरुष व दोन महिला आहेत. ४६ जण जखमी झाले. राज्य मार्गांवर एकूण २८१ अपघात झाले. यामध्ये १२३ जणांचे बळी गेले. यात १०९ पुरुष व १४ महिला आहेत. ग्रामीण हद्दीत इतर २४२ अपघातांची नोंद झाली.

ठळक मुद्दे३१७ अपघातांमध्ये १३५ जणांचा मृत्यू : ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील आकडेवारी

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पोलीस अधीक्षक कार्यालय अंतर्गत ग्रामीण भागात एकूण ३२ पोलीस ठाणे येतात. ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येणारे राष्ट्रीय महामार्ग, प्रमुख जिल्हा व राज्य मार्गावर वर्षभरात सर्वाधिक ३१७ अपघात घडले. यामध्ये १३५ जणांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे.ग्रामीण हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान ३६ अपघातांची नोंद झाली. यामध्ये १२ जणांचे प्राण गेले. यामध्ये १० पुरुष व दोन महिला आहेत. ४६ जण जखमी झाले. राज्य मार्गांवर एकूण २८१ अपघात झाले. यामध्ये १२३ जणांचे बळी गेले. यात १०९ पुरुष व १४ महिला आहेत. ग्रामीण हद्दीत इतर २४२ अपघातांची नोंद झाली. यात ९० पुरुष व सहा महिला अशा ९६ जणांचा मृत्यू झाला. अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, याकरिता दरवर्षी शासनाच्या आरटीओ, पोलीस प्रशासन विभाग, सार्वजनिक बांधकामसह इतर विभागांच्यावतीने रस्ता सुरक्षा अभियान राबविले जाते; पण अपघातांची संख्या दरवर्षी वाढतच आहेत.आणखी १९ ब्लॅक स्पॉट वाढलेजिल्ह्यात आणखी १९ अपघातप्रवण स्थळे (ब्लॅक स्पॉट) वाढल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिली. शहर वाहतूक पोलीस व जिल्हा ग्रामीण वाहतूक पोलिसांची ‘ब्लॅक स्पॉट’ची आकडेवारी यात कुठेही तारतम्य नाही. त्यांची आकडेवारी आरटीओच्या आकडेवारीशी जुळेनाशी झाली आहे. वाहतूक पोलिसांनी जिल्ह्यात एकूण २९ ‘ब्लॅक स्पॉट’ असल्याची माहिती दिली. परंतु, दीड वर्षांपूर्वी ३२ ‘ब्लॅक स्पॉट’ निश्चित करण्यात आले होते. २५ नोव्हेंबर २०१९ ला रस्ता सुरक्षा संसदीय क्षेत्र समितीच्या बैठकीत १९ ‘ब्लॅक स्पॉट’मध्ये वाढ करून ४८ ब्लॅक स्पॉट असल्याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाला पाठविण्यात आली. त्या ब्लॅक स्पॉटची सुधारणा किंवा उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ती यादी पाठविण्यात आल्याची माहिती आरटीओ कार्यालयाने दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात नेमके ‘ब्लॅक स्पॉट’ किती, याची तपासणी करून किती ठिकाणचे ‘ब्लॅक स्पॉट’ची सुधारणा केली आहे, याची वरिष्ठ अधिकाºयांंद्वारे तपासणी होणे अपेक्षित आहे.

टॅग्स :Accidentअपघात