शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्गांवर सर्वाधिक अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 05:00 IST

ग्रामीण हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान ३६ अपघातांची नोंद झाली. यामध्ये १२ जणांचे प्राण गेले. यामध्ये १० पुरुष व दोन महिला आहेत. ४६ जण जखमी झाले. राज्य मार्गांवर एकूण २८१ अपघात झाले. यामध्ये १२३ जणांचे बळी गेले. यात १०९ पुरुष व १४ महिला आहेत. ग्रामीण हद्दीत इतर २४२ अपघातांची नोंद झाली.

ठळक मुद्दे३१७ अपघातांमध्ये १३५ जणांचा मृत्यू : ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील आकडेवारी

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पोलीस अधीक्षक कार्यालय अंतर्गत ग्रामीण भागात एकूण ३२ पोलीस ठाणे येतात. ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येणारे राष्ट्रीय महामार्ग, प्रमुख जिल्हा व राज्य मार्गावर वर्षभरात सर्वाधिक ३१७ अपघात घडले. यामध्ये १३५ जणांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे.ग्रामीण हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान ३६ अपघातांची नोंद झाली. यामध्ये १२ जणांचे प्राण गेले. यामध्ये १० पुरुष व दोन महिला आहेत. ४६ जण जखमी झाले. राज्य मार्गांवर एकूण २८१ अपघात झाले. यामध्ये १२३ जणांचे बळी गेले. यात १०९ पुरुष व १४ महिला आहेत. ग्रामीण हद्दीत इतर २४२ अपघातांची नोंद झाली. यात ९० पुरुष व सहा महिला अशा ९६ जणांचा मृत्यू झाला. अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, याकरिता दरवर्षी शासनाच्या आरटीओ, पोलीस प्रशासन विभाग, सार्वजनिक बांधकामसह इतर विभागांच्यावतीने रस्ता सुरक्षा अभियान राबविले जाते; पण अपघातांची संख्या दरवर्षी वाढतच आहेत.आणखी १९ ब्लॅक स्पॉट वाढलेजिल्ह्यात आणखी १९ अपघातप्रवण स्थळे (ब्लॅक स्पॉट) वाढल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिली. शहर वाहतूक पोलीस व जिल्हा ग्रामीण वाहतूक पोलिसांची ‘ब्लॅक स्पॉट’ची आकडेवारी यात कुठेही तारतम्य नाही. त्यांची आकडेवारी आरटीओच्या आकडेवारीशी जुळेनाशी झाली आहे. वाहतूक पोलिसांनी जिल्ह्यात एकूण २९ ‘ब्लॅक स्पॉट’ असल्याची माहिती दिली. परंतु, दीड वर्षांपूर्वी ३२ ‘ब्लॅक स्पॉट’ निश्चित करण्यात आले होते. २५ नोव्हेंबर २०१९ ला रस्ता सुरक्षा संसदीय क्षेत्र समितीच्या बैठकीत १९ ‘ब्लॅक स्पॉट’मध्ये वाढ करून ४८ ब्लॅक स्पॉट असल्याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाला पाठविण्यात आली. त्या ब्लॅक स्पॉटची सुधारणा किंवा उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ती यादी पाठविण्यात आल्याची माहिती आरटीओ कार्यालयाने दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात नेमके ‘ब्लॅक स्पॉट’ किती, याची तपासणी करून किती ठिकाणचे ‘ब्लॅक स्पॉट’ची सुधारणा केली आहे, याची वरिष्ठ अधिकाºयांंद्वारे तपासणी होणे अपेक्षित आहे.

टॅग्स :Accidentअपघात