शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

धामणगावात अर्धेअधिक शासकीय कार्यालये ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:01 IST

सकाळी ११ वाजेपर्यंत मदतनीस व चौकीदार हे दोघेच उपस्थित होते. या कार्यालयात जवळपास १६ अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. दोन कार्यालयाचा प्रभार असल्याचे सांगत जुना धामणगावच्या कार्यालयावर कार्यकारी अभियंत्यांनी तुळशीपत्रच ठेवले असल्याचे दिसले

ठळक मुद्दे६० टक्के अपडाऊन : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला 'खो'

मोहन राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश काढले. मात्र अर्धेअधिक शासकीय कार्यालये सोमवारी ओस पडली होती. सकाळी ९.४५ वाजतापासून दुपारी १२ पर्यंत कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या खाली असल्याचा प्रत्यय सोमवारी आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला अनेकांनी केराची टोपली दाखविली.

उर्ध्व वर्धा पाटबंधारे उपविभाग तीनयेथील उर्ध्व वर्धा पाटबंधारे उपविभाग क्रमांक तीन येथे सकाळी ११ वाजेपर्यंत मदतनीस व चौकीदार हे दोघेच उपस्थित होते. या कार्यालयात जवळपास १६ अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. दोन कार्यालयाचा प्रभार असल्याचे सांगत जुना धामणगावच्या कार्यालयावर कार्यकारी अभियंत्यांनी तुळशीपत्रच ठेवले असल्याचे दिसले. येथील अनेक कर्मचारी आर्वी, वर्धा, यवतमाळ येथून अपडाऊन करतात. काही अभियंता धामणगाव शहरात कार्यालयात वेळेवर येत नाहीत, हे सोमवारी उघड झाले.

तालुका कृषी अधिकारी कार्यालयतालुक्यातील अनेक शेतकरी सकाळी ११.१५ च्या सुमारास तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आले. तालुका कृषी अधिकारी अजय तळेगावकर, कृषी सहायक वालदे व एक चतुर्थश्रेणी कर्मचारी उपस्थित होता. या कार्यालयातील चार कर्मचारी बेपत्ता होते. नजीकच असलेल्या मंडळ कृषी अधिकारी क्रमांक एक व दोन मध्ये पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक अशा ३५ कर्मचाºयांनी सकाळी ११.२० वाजेपर्यंतही हजेरी लावली नव्हती. खरेदी-विक्री व्यवहार सुरू असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयातील उपनिबंधक के.के. राठोड हे सकाळी ९.३० वाजता लॉग इन करून घराकडे परतले होते.

तहसील कार्यालय निराधारतहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार हा विभाग पूर्णत: निराधार झाल्याचे दिसले. ११.३० वाजेपर्यंत एकही कर्मचारी तेथे उपलब्ध नव्हता. कनिष्ठ लिपिक उपलेखापाल कधी येईल, याची माहिती कार्यालयात नव्हती. या कार्यालयातील अनेक कर्मचारी यवतमाळ येथून अप-डाऊन करतात.भूमी अभिलेख कार्यालय उपअधीक्षक राणे हे चांदूर रेल्वेला गेले, तर यवतमाळहून येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वेळेवर मोबाईलवरूनच सुटीचा अर्ज पाठविला. त्यामुळे शेतकऱ्यांना आल्यापावली परत जावे लागले.

महावितरण कार्यालय, नारगावंडीनारंगावडी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील खुर्च्या दुपारी बारापर्यंत रिकाम्याच होत्या. शनिवार, रविवार सुटी आल्याने येथील कनिष्ठ अभियंता अंकुश सोनवणे यांना अमरावतीहून येण्यास उशीर होईल, अशी माहिती मिळाली.

धामणगाव तीन जिल्ह्यांचे केंद्रबिंदूधामणगाव रेल्वे हा तालुका अमरावती, यवतमाळ, वर्धा या तीन जिल्ह्यांचे केंद्रबिंदू आहे. अपडाऊनसाठी हा तालुका अधिक सोईस्कर असल्याने सर्व अधिकारी कर्मचारी या तालुक्याला पहिली पसंती दाखवितात. सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत शासकीय कार्यालयाची वेळ असली तरी दुपारी १२ ला येणे अन् ४ ला जाणे, असा अनेकांचा रतिब आहे. कोरोनाच्या काळात आजही ६० टक्के अधिकारी, कर्मचारी अप-डाऊन करीत असल्याने धामणगाव शहरातील शासकीय कार्यालयांमधील विविध विभागांत खुर्च्या रिकाम्या दिसून आल्यात. या लेटलतीफीचा फटका ग्रामीण भागातून विविध कामानिमित्त येणाºया नागरिकांना बसत आहे.

टॅग्स :Socialसामाजिक