शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वीज मीटरमध्ये फेरफार, फौजदारी गुन्हा व लाखो रुपयांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:17 IST

आठ महिन्यात ५१० वीज ग्राहकांवर कारवाई, लाखोंचा दंड वसूल अमरावती : वीजमीटरमध्ये फेरफार करण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. मात्र, ...

आठ महिन्यात ५१० वीज ग्राहकांवर कारवाई, लाखोंचा दंड वसूल

अमरावती : वीजमीटरमध्ये फेरफार करण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. मात्र, असे प्रकार निदर्शनास आल्यास जबर दंड वसूल केला जातो. त्याने वापरलेल्या विजेच्या पाच ते सहा पट दंड वसूल होत असून, विद्युत ग्राहकाने वीज मीटरमध्ये फेरफार केल्यास फौजदारी गुन्हा अन् लाखो रुपयांचा दंड वसूल केला जाऊ शकतो, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान आठ महिन्यात ५१० ग्राहकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून लाखो रुपयांच्या दंडाची रक्कम वसूल केली.

आठ महिन्यांत झालेली कारवाई

महिना ग्राहक वसूल दंड (लाखात)

जानेवारी ७३ २९.६

फेब्रुवारी ७१ १०.९५

मार्च २८ ५.५३

एप्रिल ३२ ६.६४

मे १ ०.०८

जून ६४ २८.२०

जुुलै १२५ ९६.०३

ऑगस्ट ११६ ४५.१०

बॉक्स:

वीज चोरीसाठी अशीही चलाखी

तांत्रिक पद्धतीने मीटरमध्ये इलेक्ट्रीक चीप टाकणे, मीटर स्लो करणे, मीटरमध्ये रिमोट कंट्रोल किट बसवून मीटर चालू - बंद करणे, मीटरच्या मागच्या भागात छिद्र पाडून कनेक्शन डायरेक्ट करणे अशी चलाखी ग्राहकांकडून केली जाते. मात्र, महावितरणचे पथक धाडी टाकून अशा ग्राहकांना शोधून काढतात. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा किंवा वापरलेल्या विजेनुसार लाखो रुपयांचा दंड आकारण्यात येतो.

बॉक्स:

फौजदारी गुन्हा अन् जबरी दंड

मीटरमध्ये फेरफार करताना आढळून आल्यास फौजदारी गुन्हा किंवा जबरी दंड आकारण्याची तरतूद आहे. कलम १३५ व १३६नुसार मीटरमध्ये फेरफार आढळून आल्यास एका केडब्ल्यु एचपीनुसार औद्योगिक ग्राहकांवर १०

हजारांचा दंड केला जातो. तसेच एका केडब्ल्युएचपीच्या वापराकरिता पाच हजारांचा, तर घरगुती वर्गवारीतील ग्राहकांकरिता दोन हजाराच्या दंडाची तरतूद आहे. तसेच दंड न भरल्यास फौजदारी गुन्हा सिद्ध झाल्यास तीन वर्षांपर्यंतच्या शिक्षेची यामध्ये तरतूद असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोट

प्रत्येक सबडीव्हीजन एई कॉल्टी कंट्रोलची पोस्ट त्यांच्या चोऱ्या पकडण्यात केली जाते. प्रत्येक उपविभागामध्ये एक पथक तयार करून कारवाई केली जाते. मीटरमध्ये कुणीही फेरफार करू नये, तो गुन्हा आहे.

दिलीप खानंदे, अधीक्षक अभियंता, महावितरण, अमरावती