शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मोबाईलचोरांचा छडा लागेना; कोतवाली पोलीस रिक्त हस्ते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2021 17:35 IST

१४ ऑक्टोबर रोजी पहाटे बकुल एंटरप्रायजेस व आर.के. टेलिकॉम या दुकानांचे शटर वाकवून १४.६९ लाख रुपयांचे मोबाईल फोन लंपास करण्यात आले होते.

ठळक मुद्देनागपूर, बिहारमध्ये शोधमोहिम : १५ लाखांचे मोबाईल ‘ऑनट्रॅक’ येईनात

अमरावती : स्थानिक जयस्तंभ चौकातील दोन प्रतिष्ठान फोडून सुमारे १५ लाखांचे मोबाईल पळविण्यात आले होते. त्या घटनेला पंधरवडा उलटत असताना शहर कोतवाली पोलीस रिक्त हस्तेच आहेत.

स्थानिक पोलिसांचे एक पथक आरोपींच्या शोधार्थ नागपूर, आसपासचे जिल्हे व थेट बिहारमधील एका गावातदेखील जाऊन आले. मात्र, ती टोळी बिहारमार्गे नेपाळमध्ये परागंदा झाल्याची माहिती खास सूत्रांनी दिली. ते चोर अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या सीमेवरून नेपाळमध्ये दाखल झाल्याने शहर पोलिसांचा नाईलाज झाल्याची माहिती पुढे आली आहे.

१४ ऑक्टोबर रोजी पहाटे बकुल एंटरप्रायजेस व आर.के. टेलिकॉम या दुकानांचे शटर वाकवून १४.६९ लाख रुपयांचे मोबाईल फोन लंपास करण्यात आले होते. आरकेमधील सीसीटिव्हीत पाच जणदेखील बंदिस्त झाले. तथा ते मध्यवर्ती आगारात पोहोचल्याची नोंददेखील फुटेजमधून पोलिसांना प्राप्त झाली. चोरांचा मागमूस लावण्यासाठी चोरीस गेलेले मोबाईल ट्रॅकिंगवर टाकण्यात आले. तर, तपासासाठी शोधपथके कार्यान्वित करण्यात आली. त्यातील एक पथक चार दिवसांपूर्वी बिहारमध्ये पोहोचले. आरोपींची नावे माहिती झाल्याने संबंधित गावापर्यंतदेखील पोहोचले. तेथे दोन दिवस राहिले. आरोपींच्या घरी जाऊन आले. मात्र, नेपाळची सीमा अवघ्या तीन किलाेमीटरवर असल्याने ते तिकडे परागंदा झाल्याने पोलीस पथकाला परवानगीची अडचण निर्माण झाली. त्यामुळे आरोपींच्या घरापर्यंत पोहोचूनदेखील त्यांना आरोपीशिवाय परत यावे लागल्याची माहिती खास पोलीस सूत्रांनी दिली.

तपास सुरू

याबाबत शहर कोतवालीच्या ठाणेदार नीलिमा आरज यांच्यानुसार, तपास योग्य ट्रॅकवर आहे. तपासपथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींचे चेहरे फारसे स्पष्ट दिसत नसल्याने पोलीस तपासाला मर्यादा आल्या आहेत. शहर कोतवाली हद्दीतून दुचाकी चोरीच्या घटना देखील भरमसाठ वाढल्या आहेत. त्यामुळे शहर कोतवाली पोलिसांच्या प्रभावी गस्तीची गरज आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMobileमोबाइलtheftचोरी