शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

मनरेगाचा राष्ट्रीय पुरस्कार अमरावती जिल्ह्याला जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2019 21:44 IST

पुरस्काराचे वितरण नवी दिल्लीच्या सुब्रमण्यम सभागृहात १९ ते २० डिसेंबरला होणार आहे

 अमरावती : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अमरावती जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण नवी दिल्लीच्या सुब्रमण्यम सभागृहात १९ ते २० डिसेंबरला होणार आहे. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षातील पुरस्कारासाठी मनरेगा आयुक्तालय नागपूर यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. महाराष्ट्र राज्यातून सदर पुरस्कारासाठी अमरावतीसह यवतमाळ, गोदिंया, गडचिरोली या चार जिल्ह्यांचे नामांकण सादर करण्यात आले होते. त्यानुसार दिल्ली येथे अवार्ड समितीसमोर सादरीकरणासाठी जिल्ह्याची निवड करून बोलविण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी शैलेश नवाल, तत्कालीन सीईओ मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त जिल्हाधिकारी मिताली सेठी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी माया वानखडे यांनी अंमलबजावणीचे सादरीकरण २९ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे केले होते. त्या आधारे केंद्र सरकारच्या चमूने ७ डिसेंबर रोजी अमरावती जिल्ह्यातील भातकुली, चिखलदारा, चांदूर बाजार या तीन तालुक्यांत प्रत्यक्ष भेट देऊन रोजगार हमी योजनेच्या कामांची पाहणी केली.अमरावती जिल्ह्याला सन २०१८-१९  या वर्षात ७८ लाख ८१ हजार मनुष्य दिवसाचे उद्दिष्ट दिले होते. प्रत्यक्षात जिल्ह्याने ८४ लाख ८४ हजार दिवसांत उद्दिष्ट (१०७ टक्के) साध्य केले. त्या वर्षात जिल्ह्यात या योजनेवर एकूण २३० कोटी ९१ लाख रुपये खर्च करण्यात आले. त्या वर्षात २ लाख ६ हजार ३७७ व्यक्तींना रोजगार मिळाला आहे. अमरावती जिल्ह्याने रोजगार हमी योजनेत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल केंद्र शासनाकडून राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात केला आहे.कोटमनरेगात जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाली, ही अभिमानाची बाब आहे. या पुरस्कारापेक्षा जास्तीत जास्त लोकांना रोजगातून लाभ देऊ शकले, याचे समाधान आहे. याकरिता सर्वांचे सहकार्य लाभले.- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी, अमरावतीकोटजिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात केलेल्या कामांना राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार झाल्याचा आनंदच असून, अधिक चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे.- माया वानखडे,उपमुख्यकार्यकारी अधिकारी रोहयो विभाग झेडपी अमरावती

टॅग्स :Amravatiअमरावती