शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

आ. बच्चू कडू यांचे १५ पासून मंत्रालयात उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 10:22 IST

अतिवृष्टीच्या मदतीचे २४ कोटी रखडले

चांदूर बाजार (अमरावती) : तालुक्यातील आसेगाव व तळेगाव मोहना येथील १४ हजार शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्यांना २४ कोटी रुपये मदतीसाठी अनेकवेळा घोषणा होऊनही रक्कम उपलब्ध झाली नाही. मंत्रिपदाचा दर्जा प्राप्त आ. बच्चू कडू आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी १५ जूनपासून मंत्रालयात बेमुदत उपोषण करणार आहेत.

गेल्या खरीप हंगामातील जुलै-ऑगस्ट महिन्यात चांदूर बाजार तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. त्यात आसेगाव व तळेगाव मोहना या दोन मंडळांना पर्जन्यमापक यंत्राच्या तांत्रिक अडचणीमुळे अतिवृष्टीची नोंद झाली नसल्याने वगळण्यात आले. ही चूक लक्षात आणून दिल्यानंतर या दोन मंडळांतील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून प्रशासनाकडून शासनाला मदतीची मागणी करण्यात आली.

अर्थसंकल्पात ७६ कोटींची मदत घोषित करण्यात आली. यात या दोन मंडळांतील १४ हजार शेतकऱ्यांच्या २४ कोटी निधीचा समावेश आहे. यासाठी आ. बच्चू कडू यांनी मदत व पुनर्वसन सचिवांशी संपर्क साधून मदत निधी तत्काळ देण्याचे निर्देश दिले. तथापि, काहीही झाले नाही. त्यामुळे संतप्त झालेले आ. बच्चू कडू हे १५ जून रोजी मदत व पुनर्वसन मंत्रालयाचे सचिव यांच्या दालनातच बेमुदत उपोषण करणार आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणBacchu Kaduबच्चू कडूStrikeसंप