शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

जातीय सलोख्यासाठी ‘मिशन सर्वधर्म समभाव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2021 10:44 IST

अमरावतीतील परिस्थिती आटोक्यात आणून जातीय सलोखा टिकविण्यासाठी शहर आयुक्तालय क्षेत्रात ‘मिशन सर्वधर्म समभाव’ राबविले जाणार आहे. त्याची सुरुवात बुधवारी पटवा चौकातील प्रभाकरराव वैद्य यांच्या संबोधनाने करण्यात आली. 

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : शुक्रवार व शनिवारी लागोपाठ घडलेल्या हिंसाचाराच्या घटनांमुळे शहरात संचारबंदी लागू करण्यात आली, तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नदेखील निर्माण झाला. ती परिस्थिती आटोक्यात आणून जातीय सलोखा टिकविण्यासाठी शहर आयुक्तालय क्षेत्रात ‘मिशन सर्वधर्म समभाव’ राबविले जाणार आहे. त्याची सुरुवात बुधवारी पटवा चौकातील प्रभाकरराव वैद्य यांच्या संबोधनाने करण्यात आली. 

शहरातील ज्या भागात हिंसाचार उफाळला, लोक आमनेसामने ठाकले, अशा संवेदनशील ठिकाणी, विविध धर्मगुरू विशेषत: तरूणाईला मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हिंदू, मुस्लिम, शिख. इसाई या धर्मगुरूंसोबतच समाजातील प्रभावशाली व्यक्तींचा त्यात समावेश आहे. हिंसाचाराच्या परिणामावर यात समुपदेशन केले जाईल. संवेदनशील भागातील सर्व समुदायांचे प्रतिनिधी, पोलिसांचा समावेश असलेले व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून अफवा पसरिवणाऱ्यांवर प्रतिबंध घालण्याचा मानसदेखील पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी व्यक्त केला. 

आज ११ ते ५ शिथिलता

संचारबंदीमध्ये गुरूवारी ११ ते ५ अशी शिथिलता देण्यात येणार आहे. त्यात जीवनावश्यक वस्तू, पेट्रोलपंप सुरू राहतील, सोमवारपर्यंत शिथिलतेमध्ये वाढ करण्यात येणार आहे. मेडिकल २४ बाय ७ सुरू असतील.सध्या १५०० पोलीस रस्त्यावर आहेत. कुणीही अफवा पसरवू नका. अफवेला बळी पडुू नका. दोन्ही दिवसांतील घटनांच्या अनुषंगाने अटकसत्र चालू आहे. कुणाचाही मुलाहिजा बाळगला जाणार नाही.- डॉ. आरती सिंह, पोलीस आयुक्त

टॅग्स :Socialसामाजिक