शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

अल्पवयीन मुली असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 01:19 IST

अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून, फूस लावून पळवून नेण्याच्या दररोज किमान एक घटना जिल्ह्यात घडत आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्या १३ दिवसांत सात अल्पवयीन मुली व एका १४ वर्षीय मुलाला फूस लावून पळविण्यात आले. चौघा विवाहितांचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला.

ठळक मुद्दे१३ दिवसांत आठ मुली पळविल्या : दोघींवर बलात्कार, विनयभंगाच्या सहा घटना

प्रदीप भाकरे।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चोरी-दरोड्याप्रमाणे आता अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या वाढत्या घटना पालक आणि पोलिसांसाठी चिंतेची बाब ठरत आहेत. अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून, फूस लावून पळवून नेण्याच्या दररोज किमान एक घटना जिल्ह्यात घडत आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्या १३ दिवसांत सात अल्पवयीन मुली व एका १४ वर्षीय मुलाला फूस लावून पळविण्यात आले. चौघा विवाहितांचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. सहा विनयभंगाच्या घटना नोंदविण्यात आल्या तसेच दोन अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्यात आला. अर्थात १३ दिवसांमध्ये २० अल्पवयीन मुली, महिला अत्याचाराच्या बळी पडल्या.विशेष म्हणजे, या अपहरणांमध्ये परिचित किंवा परिसरातील तरुणांचा समावेश सर्वाधिक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. अल्पवयीन शाळकरी मुले आणि मुली बेपत्ता होण्याच्या घटनांत जिल्ह्यामध्ये अलीकडे वाढ झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे पालकांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे.अल्पवयीन मुलगा-मुलगी बेपत्ता झाल्यास त्याचे अपहरण झाल्याचा गुन्हा नोंद करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यानुसार, पोलीस भादंविचे कलम ३६३ अन्वये गुन्हा नोंदवितात. तपासाअंती त्यातील काही मुली प्रेमप्रकरणातून पळून गेल्याचे निष्पन्न होते. अशा प्रसंगी कुटुंब तडजोडीकडे वळत असल्याचा अनुभव आहे.चार विवाहितांचा शारीरिक छळमाहेरहून हुंडा आणण्यासाठी, तो आणला नाही म्हणून, मूल होत नसल्याने विवाहितांचा छळ केला जातो. ऑक्टोबरच्या पहिल्या १३ दिवसांत अशा चार प्रकरणांमध्ये विवाहितेच्या तक्रारीवरून सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शेंदूरजनाघाट, येवदा, अंजनगाव सुर्जी व सरमसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या.येथून पळविले अल्पवयीन मुलींनाअंजनगाव सुर्जी शहरातील शहापुरा येथून एका १४ वर्षीय मुलाला पळवून नेण्यात आले. दर्यापुरातील सांगळूदकरनगर, शिरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अडगाव येथून एका अल्पवयीन मुलीला, तिवसा तालुक्यातील वाठोडा खुर्द येथील १५ वर्षीय मुलीला, तळेगाव दशासर हद्दीतील सुलतानपूर येथील १७ वर्षे ८ महिने वयाच्या मुलीला, मंगरुळ दस्तगिर हद्दीतील १३ वर्षीय मुलीला व तळेगाव दशासर पंचक्रोशीतील एका १६ वर्षीय मुलीला तर मंगरूळ चव्हाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १७ वर्षीय मुलीला पळविले. या सर्व घटनांची तक्रार १ ते १३ आॅक्टोबर दरम्यान नोंदविण्यात आल्या. यापैकी केवळ एक मुलगी घरी परतली.बदनामीमुळे माघारमुलगी अचानक घरातून गायब झाल्याने घाबरलेले पालक पोलिसांत तक्रार करतात. अल्पवयीन असल्याने पोलीसही गुन्हा दाखल करून गांभीर्याने तपास करतात. मात्र, आरोपी पकडल्यानंतर प्रेमप्रकरण समोर येते. न्यायालयीन प्रक्रियेमुळे त्रास व बदनामीच्या भीतीने अशा प्रकरणांत अनेकदा पालकांकडूनच माघार घेतली जाते. काही वेळेला त्याचा बागुलबुवा करूनही प्रकरण मागे घेण्यास भाग पाडले जाते.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी