शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

राज्यमंत्री बच्चू कडू तिसऱ्यांदा विलगीकरणात, ताप अंगदुखी असल्यानं केली टेस्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2021 07:42 IST

बच्चू कडू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती देताना पुढील 3 दिवस कुणीही मला न विचारता भेटण्यासाठी येऊ नये, असे म्हटलंय. तसेच, ताप व अंगदुखी असल्याने Rapid Antigen Test केली असून ती निगेटिव्ह आली आहे.

ठळक मुद्देबच्चू कडू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती देताना पुढील 3 दिवस कुणीही मला न विचारता भेटण्यासाठी येऊ नये, असे म्हटलंय. तसेच, ताप व अंगदुखी असल्याने Rapid Antigen Test केली असून ती निगेटिव्ह आली आहे.

अमरावती/मुंबई - राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे राज्यातील कोरोना रुग्णांसंख्या वाढल्याने राज्यात रात्रीची संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची दुसऱ्यांदा बाधा झाल्याचे समोर आले होते. तर, राज्यमंत्री बच्चू कडू यांना देखील दोनवेळा कोरोना होऊन गेला आहे. आता, पुन्हा एकदा त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना विलगीकरणात राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. 

बच्चू कडू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती देताना पुढील 3 दिवस कुणीही मला न विचारता भेटण्यासाठी येऊ नये, असे म्हटलंय. तसेच, ताप व अंगदुखी असल्याने Rapid Antigen Test केली असून ती निगेटिव्ह आली आहे. परंतु, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम आवश्यक असल्याने पुढील काही दिवस मी विलगीकरणात आहे, असे ट्विट कडून यांनी केलंय. विशेष म्हणजे यापूर्वी दोनवेळा बच्चू कडू यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यावेळी, विलगीकरणात जाऊन उपचार घेतल्यानंतर ते बरे झाले होते. 

फेब्रुवारी महिन्यात कोरोना पॉझिटीव्ह

"माझी कोरोना चाचणी दुसर्‍यांदा पॉझिटिव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची काळजी घ्यावी, आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी करून घ्यावी" असं आवाहन बच्चू कडू यांनी 19 फेब्रुवारी रोजी ट्विट करुन केलं होतं. अकोल्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर, 19 फेब्रुवारी रोजी दुसऱ्यांदा त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता.  

15 एप्रिलपर्यंत रात्रीची संचारबंदी

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार येत्या १५ एप्रिलपर्यंत पुन्हा काही निर्बंध कडक करण्यात आले आहेत. रविवारी रात्री ८ वाजेपासून जमावबंदी लागू करताना ती मोडल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. गर्दीच्या, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास एक हजार रुपये दंड आकारला जाईल. विनामास्क फिरल्यास पाचशे रुपये दंड पडेल. रात्री ८ पासून ते सकाळी ७ पर्यंत या जमावबंदी लागू असल्याच्या काळात उद्याने, समुद्रकिनारे, मॉल्‍स, सर्व सिनेमागृहे, रेस्‍टॉरंट  बंद राहणार आहेत. 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस