शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

अल्पभूधारक शेतकऱ्यांना दुप्पट वीज देयक !

By admin | Updated: January 8, 2017 00:19 IST

अत्यल्पभूधारक उपसा पंपधारक शेतकऱ्यांना वीजदरात सवलत देण्याची मागणी होत आहे.

नवे संकट : महावितरणचा ऐन थंडीत शॉकरोशन कडू तिवसाअत्यल्पभूधारक उपसा पंपधारक शेतकऱ्यांना वीजदरात सवलत देण्याची मागणी होत आहे. ती अव्हेरून या शेतकऱ्यांना दामदुप्पट दराने वीज बिल देण्यात आलेली आहे. यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेला शेतकरी त्रस्त झाला आहे. शेतीसाठी विजेचा दर सातत्याने चर्चेत राहिला आहे. आता तर मागील महिन्यात कृषी उपसा पंपाची वीजबिले दुप्पटीने आली आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकटात सापडला आहे. मध्यंतरीच्या काळात वीज नियामक मंडळाने ९ हजार कोटींच्या वीज दरवाढीस मंजुरी दिली. याचा सर्वाधिक फटका कृषी उपसा वीजपंप धारकांना बसला आहे. विद्युत नियामक आयोगाच्या मंजुरीनंतर नोव्हेंबर महिन्यापासून सुधारित दरवाढ लागू करण्यात आली. ही वाढीव दराची बिले आता शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. वीज बिलामधील काही रक्कम शासन शेतकऱ्यांना अनुदान स्वरुपात देते. ही अनुदानाची रक्कम वजा जाता दुप्पट दरवाढीचा बोजा मात्र कायम राहत आहे. शासनाने ही वीज दरवाढ करताना पूर्ण दाबाचे वीजपुरवठा करावा, ही शेतकऱ्यांची मागणी दुर्लक्षित राहिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विद्युत भारनियमन व कमी भारातील विजेच्या खेळखंडोबामुळे रबीचे सिंचन कसे करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. त्यातच दामदुप्पट दरातील वीज बिलांमुळेही शेतकरी अडचणीत सापडले आहे. शेतीचे वीज युनिट ३.३२ रुपयांच्या घरातयापूर्वीच्या सरकारच्या काळात शेतीपंपासाठी वीज नियामक मंडळाने प्रतियुनिट दोन रुपये ८८ पैसे दर निश्चित केला होता. त्याला विरोध झाल्यानंतर या दरामधील ७२ पैसे शेतकऱ्यांनी भरायचे उर्वरित २.१६ पैसे शासनाने अनुदान स्वरुपात देण्याचा निर्णय झाला होता. सन २०१४-१५ पर्यंत हे प्रमाण २५ ते ४४ टक्के या प्रमाणात होते. मात्र, १ जून २०१५ पासून राज्य शासनाने २.८८ या दरात ४४ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. या वाढीनुसार शेतीची वीज ३.३२ रुपयांपर्यंत पोहोचली आहे.