शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

‘मिलिपीड'मुळे शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:00 IST

चांदूर बाजार तालुक्यातील आसेगाव पूर्णा भागात मिलिपिड (पैसा) या गोगलगाय वर्गीय अळीचा प्रादुर्भाव सुरुवातीला तुरळक भागात असणाऱ्या अळीचा पिकावर फारसा परिणाम जाणवला नाही. दोन वर्षांपासून या अळ्यांची संख्या झपाट्याने वाढत गेली. चांदूर बाजार तालुक्यात प्रामुख्याने सोयाबीन, कापूस पिकाचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जातात.

ठळक मुद्देअंकुरलेल्या पिकांना धोका : दुबार पेरणीचे संकट, पीक उत्पादनात मोठी घट

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव पूर्णा : चांदूर बाजार तालुक्यात पेरणी केलेल्या बियाण्यांना अंकुर आले खरे; परंतु, अंकुर खाऊन टाकणाऱ्या मिलिपिड (पैसा) या गोगलगाय वर्गीय अळीने आसेगावपूर्णा परिसरात उच्छाद मांडला आहे. या अळीच्या प्रादुभार्वामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे, तर दुसरीकडे बळीराजावर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे.चांदूर बाजार तालुक्यातील आसेगाव पूर्णा भागात मिलिपिड (पैसा) या गोगलगाय वर्गीय अळीचा प्रादुर्भाव सुरुवातीला तुरळक भागात असणाऱ्या अळीचा पिकावर फारसा परिणाम जाणवला नाही. दोन वर्षांपासून या अळ्यांची संख्या झपाट्याने वाढत गेली. चांदूर बाजार तालुक्यात प्रामुख्याने सोयाबीन, कापूस पिकाचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जातात. सध्या पेरणीची लगबग सुरू असताना आसेगाव पूर्णा शिवारात या अळ्यांच्या मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या भागात जवळपास शेकडो एकर परिसरात मिलिपिडी प्रजातीच्या अळ्या दिसून येत आहेत. त्यामुळे नुकतेच अंकुरलेल्या खरीप पिकांना त्यांच्यापासून धोका निर्माण झाला आहे. शेतात दिसणाºया गोगलगायसदृश अळीने शेतकºयांना 'सळो की पळो' करून सोडले आहे. ही अळी जवळपास अडीच ते तीन इंच लांब आकाराची असून, तिला ग्रामीण भागात पैसा या नावाने ओळखले जाते. शेतकºयांना मोठ्या उत्पन्नाची आशा असताना दरवर्षी या अळीमुळे उत्पन्न निम्म्यावर येत आहे.तीन - चार वर्षांपासून या मिलिपिड (पैसा) अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या अळ्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. यावर उपाययोजना करण्यासंदर्भात कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे.उपाय करूनही यावर नियंत्रण येत नाही. त्यांनी सोयाबीन, कापूस यासह तेलवर्गीय पिकांना लक्ष्य केले असून, त्यांचे मुख्य खाद्य पाला व शेंगा हे असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.- राजेंद्र नवले,शेतकरी, आसेगाव पूर्णाएकीकडे दोन-तीन दिवसांपासून पावसाने पाठ फिरविली असून, दुसरीकडे पैसा अळीने पिकावर आक्रमण केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यासाठी कृषी विभागाने संशोधन करून ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा तालुक्यातील शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीनच्या उत्पादनापासून वंचित रहाावे लागेल.- मोहन नेरकर,शेतकरी, आसेगाव पूर्णा

टॅग्स :Farmerशेतकरी