शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘मिलिपीड'मुळे शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:00 IST

चांदूर बाजार तालुक्यातील आसेगाव पूर्णा भागात मिलिपिड (पैसा) या गोगलगाय वर्गीय अळीचा प्रादुर्भाव सुरुवातीला तुरळक भागात असणाऱ्या अळीचा पिकावर फारसा परिणाम जाणवला नाही. दोन वर्षांपासून या अळ्यांची संख्या झपाट्याने वाढत गेली. चांदूर बाजार तालुक्यात प्रामुख्याने सोयाबीन, कापूस पिकाचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जातात.

ठळक मुद्देअंकुरलेल्या पिकांना धोका : दुबार पेरणीचे संकट, पीक उत्पादनात मोठी घट

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव पूर्णा : चांदूर बाजार तालुक्यात पेरणी केलेल्या बियाण्यांना अंकुर आले खरे; परंतु, अंकुर खाऊन टाकणाऱ्या मिलिपिड (पैसा) या गोगलगाय वर्गीय अळीने आसेगावपूर्णा परिसरात उच्छाद मांडला आहे. या अळीच्या प्रादुभार्वामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे, तर दुसरीकडे बळीराजावर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे.चांदूर बाजार तालुक्यातील आसेगाव पूर्णा भागात मिलिपिड (पैसा) या गोगलगाय वर्गीय अळीचा प्रादुर्भाव सुरुवातीला तुरळक भागात असणाऱ्या अळीचा पिकावर फारसा परिणाम जाणवला नाही. दोन वर्षांपासून या अळ्यांची संख्या झपाट्याने वाढत गेली. चांदूर बाजार तालुक्यात प्रामुख्याने सोयाबीन, कापूस पिकाचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जातात. सध्या पेरणीची लगबग सुरू असताना आसेगाव पूर्णा शिवारात या अळ्यांच्या मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या भागात जवळपास शेकडो एकर परिसरात मिलिपिडी प्रजातीच्या अळ्या दिसून येत आहेत. त्यामुळे नुकतेच अंकुरलेल्या खरीप पिकांना त्यांच्यापासून धोका निर्माण झाला आहे. शेतात दिसणाºया गोगलगायसदृश अळीने शेतकºयांना 'सळो की पळो' करून सोडले आहे. ही अळी जवळपास अडीच ते तीन इंच लांब आकाराची असून, तिला ग्रामीण भागात पैसा या नावाने ओळखले जाते. शेतकºयांना मोठ्या उत्पन्नाची आशा असताना दरवर्षी या अळीमुळे उत्पन्न निम्म्यावर येत आहे.तीन - चार वर्षांपासून या मिलिपिड (पैसा) अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या अळ्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. यावर उपाययोजना करण्यासंदर्भात कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे.उपाय करूनही यावर नियंत्रण येत नाही. त्यांनी सोयाबीन, कापूस यासह तेलवर्गीय पिकांना लक्ष्य केले असून, त्यांचे मुख्य खाद्य पाला व शेंगा हे असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.- राजेंद्र नवले,शेतकरी, आसेगाव पूर्णाएकीकडे दोन-तीन दिवसांपासून पावसाने पाठ फिरविली असून, दुसरीकडे पैसा अळीने पिकावर आक्रमण केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यासाठी कृषी विभागाने संशोधन करून ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा तालुक्यातील शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीनच्या उत्पादनापासून वंचित रहाावे लागेल.- मोहन नेरकर,शेतकरी, आसेगाव पूर्णा

टॅग्स :Farmerशेतकरी