शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

‘मिलिपीड'मुळे शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:00 IST

चांदूर बाजार तालुक्यातील आसेगाव पूर्णा भागात मिलिपिड (पैसा) या गोगलगाय वर्गीय अळीचा प्रादुर्भाव सुरुवातीला तुरळक भागात असणाऱ्या अळीचा पिकावर फारसा परिणाम जाणवला नाही. दोन वर्षांपासून या अळ्यांची संख्या झपाट्याने वाढत गेली. चांदूर बाजार तालुक्यात प्रामुख्याने सोयाबीन, कापूस पिकाचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जातात.

ठळक मुद्देअंकुरलेल्या पिकांना धोका : दुबार पेरणीचे संकट, पीक उत्पादनात मोठी घट

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव पूर्णा : चांदूर बाजार तालुक्यात पेरणी केलेल्या बियाण्यांना अंकुर आले खरे; परंतु, अंकुर खाऊन टाकणाऱ्या मिलिपिड (पैसा) या गोगलगाय वर्गीय अळीने आसेगावपूर्णा परिसरात उच्छाद मांडला आहे. या अळीच्या प्रादुभार्वामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे, तर दुसरीकडे बळीराजावर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे.चांदूर बाजार तालुक्यातील आसेगाव पूर्णा भागात मिलिपिड (पैसा) या गोगलगाय वर्गीय अळीचा प्रादुर्भाव सुरुवातीला तुरळक भागात असणाऱ्या अळीचा पिकावर फारसा परिणाम जाणवला नाही. दोन वर्षांपासून या अळ्यांची संख्या झपाट्याने वाढत गेली. चांदूर बाजार तालुक्यात प्रामुख्याने सोयाबीन, कापूस पिकाचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जातात. सध्या पेरणीची लगबग सुरू असताना आसेगाव पूर्णा शिवारात या अळ्यांच्या मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या भागात जवळपास शेकडो एकर परिसरात मिलिपिडी प्रजातीच्या अळ्या दिसून येत आहेत. त्यामुळे नुकतेच अंकुरलेल्या खरीप पिकांना त्यांच्यापासून धोका निर्माण झाला आहे. शेतात दिसणाºया गोगलगायसदृश अळीने शेतकºयांना 'सळो की पळो' करून सोडले आहे. ही अळी जवळपास अडीच ते तीन इंच लांब आकाराची असून, तिला ग्रामीण भागात पैसा या नावाने ओळखले जाते. शेतकºयांना मोठ्या उत्पन्नाची आशा असताना दरवर्षी या अळीमुळे उत्पन्न निम्म्यावर येत आहे.तीन - चार वर्षांपासून या मिलिपिड (पैसा) अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या अळ्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. यावर उपाययोजना करण्यासंदर्भात कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे.उपाय करूनही यावर नियंत्रण येत नाही. त्यांनी सोयाबीन, कापूस यासह तेलवर्गीय पिकांना लक्ष्य केले असून, त्यांचे मुख्य खाद्य पाला व शेंगा हे असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.- राजेंद्र नवले,शेतकरी, आसेगाव पूर्णाएकीकडे दोन-तीन दिवसांपासून पावसाने पाठ फिरविली असून, दुसरीकडे पैसा अळीने पिकावर आक्रमण केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यासाठी कृषी विभागाने संशोधन करून ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा तालुक्यातील शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीनच्या उत्पादनापासून वंचित रहाावे लागेल.- मोहन नेरकर,शेतकरी, आसेगाव पूर्णा

टॅग्स :Farmerशेतकरी