शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

मेळघाटातील कोट्यवधीचे सागवान लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 22:07 IST

मेळघाटातील कोट्यवधीचे सागवान चोरट्यांनी लंपास केले. या लाकडासोबतच डिंक, लाख, चारोळी, सांबराच्या शिंगाचीही तस्करी केली जात आहे.

ठळक मुद्देआंध्र प्रदेश, कर्नाटकात तस्करी : डिंक, लाख, चारोळी, सांबराची शिंगेही पाठविली जातात

अनिल कडू ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मेळघाटातील कोट्यवधीचे सागवान चोरट्यांनी लंपास केले. या लाकडासोबतच डिंक, लाख, चारोळी, सांबराच्या शिंगाचीही तस्करी केली जात आहे.पूर्व मेळघाट वनविभागांतर्गत घटांग, दहिगाव, जारिदा वनपरिक्षेत्रात वनतस्करांनी हैदोस घातला आहे. यातील एकही बीट सुरक्षित नाही. घटांग वनपरिक्षेत्रातील बिहाली, भवई, भुलोरी, सलोना, मसोंडी व घटांग, जारिदा वनपरिक्षेत्रातील लाखेवाडा, बोदू, खारी, कारंज, चोबीदा, बिबा, राहू, एकताई, तर दहिगाव रेंजमधील चिंचोना, सक्ती, खिरपानी, पांढराखडक, सावरपाणी, पूर्व खैरकुंड, पश्चिम खैरकुंड, टेम्ब्रुसोंडा, गिरगुटी, अंबापाटी, खोंगडा या बीटमध्ये अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात आहे. सक्ती, चिंचोना, पांढराखडक, खिरपाणी बीटमध्ये तर चोरट्यांनी हैदोस घातला आहे.सागवान तस्करांचे एजंट सातपुडा व मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या गावागावांमध्ये कार्यरत आहेत. वनतस्कर त्यांच्याकडे आवश्यक लाकडाची आॅर्डर नोंदवितात. एजंट वृक्षतोड करणाऱ्या टोळीकडून जंगलातील सागवानची अवैध वृक्षतोड करून घेतो. तोडलेला हा माल गोळा करून तो संबंधितांना पुरविला जातो. यात ‘दादू’ दलालाची चांगलीच चर्चा आहे. हे दलाल मोबाइलवरही आॅर्डर घेतात. वृक्षतोडीकरिता १५ ते २० लोकांच्या टोळी राबते.आडजात - बदली पासआंध्र प्रदेश आणि कर्नाटकात कडुनिंब आणि ुबाभळीच्या लाकडाला मागणी असते. अंजनगाव, परतवाडा, चांदूरबाजार येथून हे आडजात लाकूड मोठ्या ट्रकमध्ये पाठविले जाते. या आडजात लाकडासोबत संत्रा, केळी आणि कांद्याच्या ट्रकमधून या सागवान लाकडाची तस्करी केली जाते. याकरिता विशिष्ट पद्धत अवलंबिली जाते. या सागवान लाकडाची तस्करी करताना बदली पासचाही वापर केला जातो. ट्रकसोबत असलेल्या टीपीवरील माल व वन कार्यालयात असलेल्या टिपीवरील नोंदल्या गेलेल्या मालात मोठी तफावत राहते. यात कोºया टीपीचाही वापर होतो. आडजातच्या टीपीवरही सागवानची तस्करी केली जाते. बदली पास व हॅमरमध्येही तफावत असल्याचे वनविभागातील सूत्रांकडून सांगितले जात आहे.चक्री मशीनजंगलात तोडून व तेथूनच सोलून आणलेल्या या लाकडावर ९ इंची, २४ इंची चक्री मशीनवर संस्कार केले जातात. वेळप्रसंगी रंधा मशीनचाही वापर होतो. नंतर या लाकडाचे दोन्ही टोक आरीने कापून त्याला गेरू लावून अगदी कटसाईज लाकडाप्रमाणे त्याची तस्करी केली जाते.परिपक्व वृक्षांची कत्तलपरिपक्व अशी ४५ ते ६०, ६० ते ७५, ७५ ते ९०, ९० ते १०५, १०५ ते १२०, १२० ते १३५ गोलाईची झाडे चोरटे तोडत आहेत. २० ते २५ वर्षे वयाची झाडे यात तोडली गेली आहेत. त्याखालील गोलाईच्या झाडाला चोरटे हातही लावत नाहीत. कोट्यवधीची वृक्षतोड होत असतानाही खैरियत अहवालातील माहिती आणि परिस्थितीदर्शक प्रत्यक्ष क्षेत्रीय स्थिती यात तफावत आहे. यात जंगलाचे वाटोळे आणि पर्यावरणाचे दिवाळे निघाले आहे.