शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

मेळघाटातील कोट्यवधीचे सागवान लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 22:07 IST

मेळघाटातील कोट्यवधीचे सागवान चोरट्यांनी लंपास केले. या लाकडासोबतच डिंक, लाख, चारोळी, सांबराच्या शिंगाचीही तस्करी केली जात आहे.

ठळक मुद्देआंध्र प्रदेश, कर्नाटकात तस्करी : डिंक, लाख, चारोळी, सांबराची शिंगेही पाठविली जातात

अनिल कडू ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मेळघाटातील कोट्यवधीचे सागवान चोरट्यांनी लंपास केले. या लाकडासोबतच डिंक, लाख, चारोळी, सांबराच्या शिंगाचीही तस्करी केली जात आहे.पूर्व मेळघाट वनविभागांतर्गत घटांग, दहिगाव, जारिदा वनपरिक्षेत्रात वनतस्करांनी हैदोस घातला आहे. यातील एकही बीट सुरक्षित नाही. घटांग वनपरिक्षेत्रातील बिहाली, भवई, भुलोरी, सलोना, मसोंडी व घटांग, जारिदा वनपरिक्षेत्रातील लाखेवाडा, बोदू, खारी, कारंज, चोबीदा, बिबा, राहू, एकताई, तर दहिगाव रेंजमधील चिंचोना, सक्ती, खिरपानी, पांढराखडक, सावरपाणी, पूर्व खैरकुंड, पश्चिम खैरकुंड, टेम्ब्रुसोंडा, गिरगुटी, अंबापाटी, खोंगडा या बीटमध्ये अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात आहे. सक्ती, चिंचोना, पांढराखडक, खिरपाणी बीटमध्ये तर चोरट्यांनी हैदोस घातला आहे.सागवान तस्करांचे एजंट सातपुडा व मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या गावागावांमध्ये कार्यरत आहेत. वनतस्कर त्यांच्याकडे आवश्यक लाकडाची आॅर्डर नोंदवितात. एजंट वृक्षतोड करणाऱ्या टोळीकडून जंगलातील सागवानची अवैध वृक्षतोड करून घेतो. तोडलेला हा माल गोळा करून तो संबंधितांना पुरविला जातो. यात ‘दादू’ दलालाची चांगलीच चर्चा आहे. हे दलाल मोबाइलवरही आॅर्डर घेतात. वृक्षतोडीकरिता १५ ते २० लोकांच्या टोळी राबते.आडजात - बदली पासआंध्र प्रदेश आणि कर्नाटकात कडुनिंब आणि ुबाभळीच्या लाकडाला मागणी असते. अंजनगाव, परतवाडा, चांदूरबाजार येथून हे आडजात लाकूड मोठ्या ट्रकमध्ये पाठविले जाते. या आडजात लाकडासोबत संत्रा, केळी आणि कांद्याच्या ट्रकमधून या सागवान लाकडाची तस्करी केली जाते. याकरिता विशिष्ट पद्धत अवलंबिली जाते. या सागवान लाकडाची तस्करी करताना बदली पासचाही वापर केला जातो. ट्रकसोबत असलेल्या टीपीवरील माल व वन कार्यालयात असलेल्या टिपीवरील नोंदल्या गेलेल्या मालात मोठी तफावत राहते. यात कोºया टीपीचाही वापर होतो. आडजातच्या टीपीवरही सागवानची तस्करी केली जाते. बदली पास व हॅमरमध्येही तफावत असल्याचे वनविभागातील सूत्रांकडून सांगितले जात आहे.चक्री मशीनजंगलात तोडून व तेथूनच सोलून आणलेल्या या लाकडावर ९ इंची, २४ इंची चक्री मशीनवर संस्कार केले जातात. वेळप्रसंगी रंधा मशीनचाही वापर होतो. नंतर या लाकडाचे दोन्ही टोक आरीने कापून त्याला गेरू लावून अगदी कटसाईज लाकडाप्रमाणे त्याची तस्करी केली जाते.परिपक्व वृक्षांची कत्तलपरिपक्व अशी ४५ ते ६०, ६० ते ७५, ७५ ते ९०, ९० ते १०५, १०५ ते १२०, १२० ते १३५ गोलाईची झाडे चोरटे तोडत आहेत. २० ते २५ वर्षे वयाची झाडे यात तोडली गेली आहेत. त्याखालील गोलाईच्या झाडाला चोरटे हातही लावत नाहीत. कोट्यवधीची वृक्षतोड होत असतानाही खैरियत अहवालातील माहिती आणि परिस्थितीदर्शक प्रत्यक्ष क्षेत्रीय स्थिती यात तफावत आहे. यात जंगलाचे वाटोळे आणि पर्यावरणाचे दिवाळे निघाले आहे.