शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वणव्याने राखरांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 18:03 IST

राज्यात सहा व्याघ्र प्रकल्पांपैकी यावर्षीच्या मोसमात मंगळवार, २४ एप्रिल रोजी मेळघाट व्याघ्र प्रकल्पात लागलेल्या आगीने गत पाच वर्षांच्या तुलनेत वनक्षेत्राची सर्वाधिक राखरांगोळी केली आहे.

ठळक मुद्देनियंत्रण ढासळले विदर्भात पाच व्याघ्र प्रकल्पांपैकी सर्वाधिक आग

गणेश वासनिक।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात सहा व्याघ्र प्रकल्पांपैकी यावर्षीच्या मोसमात मंगळवार, २४ एप्रिल रोजी मेळघाट व्याघ्र प्रकल्पात लागलेल्या आगीने गत पाच वर्षांच्या तुलनेत वनक्षेत्राची सर्वाधिक राखरांगोळी केली आहे. यात सुमारे १५०० हेक्टर वनक्षेत्र जळून राख झाले असून, यात पूर्व मेळघाट वनविभागाच्या काही वनक्षेत्रांचा समावेश आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा परिसर २०२९.०६ चौरस कि.मी. क्षेत्रफळ इतका आहे. सिपना, गुगामल, अकोट व अकोला वन्यजीव विभागाचा समावेश आहे. यात १५०० हेक्टर कोअर, १२६८ हेक्टर बफर झोन आणि १९० हेक्टर परिसरात पर्यटनक्षेत्राचा समावेश आहे. मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास वनक्षेत्रात लागलेल्या वणव्याने कोकटू, कोहा, कुंड, तारूबांदा, ढाकणा, रायपूर, सेमाडोह, धारगड, गोलई, सोमठाणा, डोलार, मालूदा, अढाव आदी कोअर क्षेत्रातील जंगल जळून राख झाले. चिखलदरा, जारीदा, नरनाळा, अकोट, हरिसाल, चौराकुंड, वाण व अन्य बफर झोनचे वनक्षेत्रात प्रचंड हानी झाली आहे. या वणव्यात किती वन्यजिवांचा होरपळून मृत्यू झाला, ही आकडेवारी गुलदस्त्यात आहे. वनवणव्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध उपयायोजना करण्याचे शासन आदेश असताना मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे याबाबत पूर्णत: नियंत्रण ढासळले आहे. मेळघाटच्या वनक्षेत्रात आगीमुळे दुर्मीळ वनौषधी, सागवानासह अन्य वृक्षांची मोठी हानी झाली आहे. मात्र, या वणव्यांकडे वरिष्ठ वनअधिकारी ‘रूटीन’ आग म्हणून बघत असून, लाखो रुपयांची वनसंपदा आणि वन्यजिवांच्या मृत्यूबाबत ते अद्यापही बेफिकीर असल्याचे चित्र आहे. वणव्याचा वस्तुनिष्ठ अहवाल आल्यास आयएफएस लॉबी अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वणव्याचा विषय गुंडाळण्याची तयारी वनाधिकाऱ्यांनी चालविल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे.क्षेत्र संचालकांना ‘एसी केबिन’चा मोहवनक्षेत्राला आग लागल्यानंतर वनकर्मचाऱ्यांसह वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी आगीच्या ठिकाणी जाऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे क्रमप्राप्त आहे. पंरतु, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक हे पर्यटनाचा आराखडा तयार करण्यात मश्गूल असल्याची माहिती आहे. वातानुकूलित केबिनचा मोह आवरत नसल्याने ते मेळघाटऐवजी अमरावतीत मुख्यालयी ठाण मांडून आहेत. वनकर्मचाऱ्यांना मात्र वणव्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जीव मुठीत घेऊन जंगलात राहावे लागत आहे.ब्लोअर मशीन, इंधनाची कमतरतामेळघाटच्या विस्तीर्ण जंगलात वणव्याने मोठ्या वनक्षेत्राची हानी झाली आहे. यात वनाधिकारी कागदी घोडे नाचवित असले तरी आग विझविण्यासाठी ब्लोअर मशीन आणि इंधनाची कमतरता ही गंभीर समस्या आहे. आग विझविणारी उपकरणे वेळीच मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची ओरड आहे. या वणव्यात वन्यजिवांचीही दमझाक झाली आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वणव्यामध्ये वनक्षेत्र आणि वन्यपशूंचे नुकसान झाल्याबाबत अहवाल मागविला आहे. वस्तुनिष्ठ अहवाल येताच याप्रकरणी कार्यवाही केली जाईल.- सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव, नागपूर)

टॅग्स :forestजंगलfireआग