शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून पुनर्वसित झालेल्या आदिवासींच्या समस्यांबाबत सोमवारी बैठक, समाधानकारक निर्णयाची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2017 18:12 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून पुनर्वसित झालेल्या आठ गावांतील हजारो आदिवासींच्या समस्यांवर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत बैठक बोलविण्यात आली आहे. पुनर्वसित वस्त्यांमधील गैरसोयींना कंटाळून काही दिवसांपूर्वी मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांच्या नेतृत्वात शेकडो आदिवासी त्यांच्या मूळगावी परतले होते.

 चिखलदरा (अमरावती), दि. 17  - मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून पुनर्वसित झालेल्या आठ गावांतील हजारो आदिवासींच्या समस्यांवर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत बैठक बोलविण्यात आली आहे. पुनर्वसित वस्त्यांमधील गैरसोयींना कंटाळून काही दिवसांपूर्वी मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांच्या नेतृत्वात शेकडो आदिवासी त्यांच्या मूळगावी परतले होते. त्यामुळे प्रशासनाची प्रचंड तारांबळ उडाली होती. 

चिखलदरा तालुक्यातील सोमठाणा खुर्द, सोमठणा बु., केलपाणी, अमोना, नागरतास, गुल्लरघाट, धारगड व बारूखेडा या आठ गावांचे व्याघ्र प्रकल्पांच्या गाभाक्षेत्रातून सन २०११ ते २०१५ या वर्षात टप्प्याटप्प्याने पुनर्वसन करण्यात आले. मात्र, मेळघाटप्रमाणे त्यांना कुठल्याच मूलभूत सुविधा देण्यात आल्या नाहीत.  यामुळे आदिवासींमध्ये प्रचंड संताप उफाळून आला. अखेरीस १६ आॅगस्ट रोजी माजी आमदार राजकुमार पटेल यांच्या नेतृत्वात बैठक घेऊन ९ सप्टेंबर रोजी सर्व आदिवासी मूळगावी परतीचा निर्णय घेतला होता. व्याघ्र प्रकल्पासह महसूल विभागाने याआंदोलनाचा धसका घेतला होता. आदिवासींना रोखण्यासाठी प्रचंड पोलीस ताफा तैनात करण्यात आला होता. मात्र, तरीही आदिवासींनी खटकाली नाक्याचे कुलूप तोडून मुळगावी प्रवेश केला होता. या प्रकारामुळे शासनाला खडबडून जाग आली. अकोला व अमरावतीच्या जिल्हाधिकाºयांनी १० सप्टेंबर रोजी दिवसभर आदिवासींची मनधरणी केली. मात्र, त्याचा काहीही फायदा झाला नाही. अखेर मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी यांनी राजकुमार पटेल यांचे मन वळवून समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन देत आदिवासींना पुनर्वसित गावी परत नेले होते. 

आज मुख्यमंत्री घेणार आढावापुनर्वसित आदिवासींच्या सर्व समस्यांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी मुंबईत ऐकणार आहेत. या बैठकीला अमरावतीचे आ.सुनील देशमुख, माजी आमदार राजकुमार पटेल, पाणीपुरवठा, महसूल, ग्रामविकास, वने, आदिवासी विभागाचे सचिव, अकोला व अमरावतीचे जिल्हाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

दोन्ही आमदार बेपत्ता?मेळघाटचे आ. प्रभूदास भिलावेकर व अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना या बैठकीला आमंत्रित करण्यात आलेले नाही, हे पत्रावरून स्पष्ट झाले आहे. पुनर्वसित गावात आ.भिलावेकर पोहोचताच आदिवासींनी प्रश्नांचा भडीमार केला होता. त्यानंतर ते इकडे फिरकलेच नाहीत, असे आदिवासींचे म्हणणे आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार