शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून पुनर्वसित झालेल्या आदिवासींच्या समस्यांबाबत सोमवारी बैठक, समाधानकारक निर्णयाची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2017 18:12 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून पुनर्वसित झालेल्या आठ गावांतील हजारो आदिवासींच्या समस्यांवर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत बैठक बोलविण्यात आली आहे. पुनर्वसित वस्त्यांमधील गैरसोयींना कंटाळून काही दिवसांपूर्वी मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांच्या नेतृत्वात शेकडो आदिवासी त्यांच्या मूळगावी परतले होते.

 चिखलदरा (अमरावती), दि. 17  - मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून पुनर्वसित झालेल्या आठ गावांतील हजारो आदिवासींच्या समस्यांवर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत बैठक बोलविण्यात आली आहे. पुनर्वसित वस्त्यांमधील गैरसोयींना कंटाळून काही दिवसांपूर्वी मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांच्या नेतृत्वात शेकडो आदिवासी त्यांच्या मूळगावी परतले होते. त्यामुळे प्रशासनाची प्रचंड तारांबळ उडाली होती. 

चिखलदरा तालुक्यातील सोमठाणा खुर्द, सोमठणा बु., केलपाणी, अमोना, नागरतास, गुल्लरघाट, धारगड व बारूखेडा या आठ गावांचे व्याघ्र प्रकल्पांच्या गाभाक्षेत्रातून सन २०११ ते २०१५ या वर्षात टप्प्याटप्प्याने पुनर्वसन करण्यात आले. मात्र, मेळघाटप्रमाणे त्यांना कुठल्याच मूलभूत सुविधा देण्यात आल्या नाहीत.  यामुळे आदिवासींमध्ये प्रचंड संताप उफाळून आला. अखेरीस १६ आॅगस्ट रोजी माजी आमदार राजकुमार पटेल यांच्या नेतृत्वात बैठक घेऊन ९ सप्टेंबर रोजी सर्व आदिवासी मूळगावी परतीचा निर्णय घेतला होता. व्याघ्र प्रकल्पासह महसूल विभागाने याआंदोलनाचा धसका घेतला होता. आदिवासींना रोखण्यासाठी प्रचंड पोलीस ताफा तैनात करण्यात आला होता. मात्र, तरीही आदिवासींनी खटकाली नाक्याचे कुलूप तोडून मुळगावी प्रवेश केला होता. या प्रकारामुळे शासनाला खडबडून जाग आली. अकोला व अमरावतीच्या जिल्हाधिकाºयांनी १० सप्टेंबर रोजी दिवसभर आदिवासींची मनधरणी केली. मात्र, त्याचा काहीही फायदा झाला नाही. अखेर मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी यांनी राजकुमार पटेल यांचे मन वळवून समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन देत आदिवासींना पुनर्वसित गावी परत नेले होते. 

आज मुख्यमंत्री घेणार आढावापुनर्वसित आदिवासींच्या सर्व समस्यांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी मुंबईत ऐकणार आहेत. या बैठकीला अमरावतीचे आ.सुनील देशमुख, माजी आमदार राजकुमार पटेल, पाणीपुरवठा, महसूल, ग्रामविकास, वने, आदिवासी विभागाचे सचिव, अकोला व अमरावतीचे जिल्हाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

दोन्ही आमदार बेपत्ता?मेळघाटचे आ. प्रभूदास भिलावेकर व अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना या बैठकीला आमंत्रित करण्यात आलेले नाही, हे पत्रावरून स्पष्ट झाले आहे. पुनर्वसित गावात आ.भिलावेकर पोहोचताच आदिवासींनी प्रश्नांचा भडीमार केला होता. त्यानंतर ते इकडे फिरकलेच नाहीत, असे आदिवासींचे म्हणणे आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार