शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

शेतीपयोगी साहित्याची बाजारात रेलचेल

By admin | Updated: January 9, 2016 00:35 IST

एकेकाळी गुरांचे चांदूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरातील बाजारपेठेत आता शेतीपयोगी साहित्य मोठ्या प्रमाणात विक्रीला येत आहे.

शेतमजूर, शेतकऱ्यांचा वाढता ओढा : डाले, टोपले, गुरांचे साहित्य, बैलबंडीचे सुटे भागचांदूरबाजार : एकेकाळी गुरांचे चांदूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरातील बाजारपेठेत आता शेतीपयोगी साहित्य मोठ्या प्रमाणात विक्रीला येत आहे. त्यामुळे आता शहराची गुरांचे चांदूर ही ओळख लोप पावत चालली आहे. पूर्वी साखरेच्या तुलनेत गुळाचे भाव बरेच कमी होेते. त्यामुळे शेतमजूर आणि गरीब वर्ग गुळाचाच वापर करीत होते. अलिकडच्या काळात गुळाचे भाव साखरेच्या तुलनेत वधारले आहेत. त्यामुळे गूळ खरेदी करणाऱ्यांची संख्या घटत चालली आहे. गूळ विक्रेत्यांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. चांदूरबाजार तालुक्याची जमीन सुपीक असून बागायतदारांचा तालुका म्हणूनही या भागाकडे पाहिले जाते. या भागात मोठ्या प्रमाणात ओलिताची शेती असल्याने शेतकऱ्यांकडे आर्थिक सुबत्ता दिसून येते. त्यामुळे शेतपयोगी साहित्याला आता बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. या भागात कापूस, तूर, सोयाबीन, हरभरा, गहू, संत्री ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. सध्या शहरातील शिवाजी चौकात गाय, बैल, म्हशीच्या गळ्यातील घंटा, खुरपे, विळे, कुऱ्हाडी, बैलगाडीसाठी लागणारे साहित्य असलेली दुकाने थाटलेली दिसून येतात. हे साहित्य लोहार समाजातील काही कुटुंब विक्रीसाठी उपलब्ध करून देतात. पूर्वी शेतकऱ्यांना हे साहित्य खरेदी करण्याकरिता रविवारच्या आठवडी बाजाराची वाट पहावी लागत असे. आता मात्र हे साहित्य येथे केव्हाही उपलब्ध होते. औद्योगिकीकरणाच्या लाटेमध्ये ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. आधुनिकीकरणाच्या लाटेमध्ये पारंपरिक व्यवसाय भरडले जात आहेत. अनेक ग्रामीण कारागिरांचे व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. वेताच्या काठ्या आणि कळकापासून तयार करण्यात येणाऱ्या टोपल्या, डाले काळाच्या ओघात दिसेनासे झाले. आता प्लास्टिकच्या डाले टोपल्यांचे दिवस असून हे डाले टोपले येथील बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध आहे. (तालुका प्रतिनिधी)