शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अन् तब्बल आठ वर्षांनंतर 'त्याची' कुटुंबाशी झाली भेट; बहादूर माजी सैनिक संघटनेची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 16:54 IST

स्मृतिभ्रंश झाल्याने राहत होता गोव्याच्या निवारागृहात

अमरावती : तो कुटुंबासाठी आणखी पैसे कमावण्यासाठी गोव्यात गेला. मात्र, अपघातात स्मृती गमावून बसला. बहादूर माजी सैनिक संघटनांच्या पुढाकाराने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील या इसमाला आठ वर्षांनंतर त्यांच्या कुटुंबात परत आणण्यात आले.

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाई बोथ येथील सोमनाथ चंपतराव माळोदे (५६) यांचा हा प्रवास आहे. ते पत्नी, चार मुली व मुलगा यांच्यासह राहत होते. कुटुंबाची आर्थिक स्थिती बरी नसल्याने ते आणखी पैसे गाठीशी ठेवण्यासाठी गोव्याला काम पाहण्यास गेले. २०१५ मध्ये त्यांना तेथे अपघात झाला आणि स्मृती गमावून बसले. गोव्यातील डॉक्टर जॅक्सन यांनी त्यांना रस्त्याच्या कडेवरून उचलून त्यांच्यावर उपचार केले. डोक्याची व पोटाची शस्त्रक्रिया केली आणि त्यांना मरणाच्या दारातून बाहेर काढले. त्यांनी गोव्यातील मदर तेरेसा मिशनरी ऑफ चॅरिटी गोवा येथे सोमनाथ यांची व्यवस्था केली. संस्थेने रवी हे टोपण नाव दिले.

दरम्यान, आठ वर्षांमध्ये सोमनाथ हे घरी न परतल्याने माळोदे कुटुंबाने ते दगावल्याची समजूत करून घेतली. पत्नी रंजना यांनी चारपैकी तीन मुलींचे लग्न लावून दिले. २०२३ मध्ये बहादूर माजी सैनिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बी.एस. राय यांचे अकोला येथील नातेवाईक सुरेश घन व त्यांच्या पत्नी गोव्याला गेल्या होत्या. तेथे मदर तेरेसा मिशनरीजमध्ये त्यांना ‘रवी’ भेटले. त्यांनी बडनेरा, वाई असे संबोधन केले. त्यामुळे घन दाम्पत्याने त्याचा व्हिडीओ घेऊन राय यांना सांगितले. राय यांनी नांदगाव खंडेश्वर ठाणेदारांशी व ठाणेदारांनी पोलिस पाटलांशी संपर्क केला.

व्हिडिओवरून पटली ओळख...

पोलिस पाटलांनी व्हिडीओ व फोटो दाखवताच रंजना यांनी पती सोमनाथची ओळख पटविली. यानंतर घन दाम्पत्य व राय हे गोव्याला गेले. तेथून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोमनाथ यांचे ग्रामस्थांशी बोलणे करून दिले. यानंतर सोमनाथ यांची पत्नी व दोन्ही जावई यांनी गोवा गाठले व कागदोपत्री सोपस्कार आटोपून सोमनाथ मालोदे आपल्या गावी परतले. यासाठी बी.एस. राय यांना माजी सैनिक व संघटनेचे पदाधिकारी प्रदीप गायकवाड, नंदकिशोर काळे, गजानन सुरेकर आदींचे सहकार्य लाभले.

टॅग्स :SocialसामाजिकAmravatiअमरावती