शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

फक्त पाहिले रागाने म्हणून 'गेम' केला तिघाने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2021 15:49 IST

रागाने पाहत असल्याचा गैरसमजातून वचपा म्हणून ३५ दिवसांनी एका तरुणाला तिघांनी चाकूने भोसकून ठार केले. अमरावतीच्या फ्रेजरपुरा येथे २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली. 

ठळक मुद्देजुने वैमनस्य, पुन्हा चायना चाकूतिघेही अटकेत : फ्रेजरपुरा येथे रक्तरंजित थरार

अमरावती : जुन्या वादातून तरुणाला चाकूने सपासप वार करत संपवल्याची घटना अमरावतीच्या फ्रेझरपुरा येथे सोमवारी संध्याकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटकेत घेतले.

रस्त्याने जात असताना समोरचा तरुण रागाने पाहत असल्याचा गैरसमज करीत त्यातून मोठा वाद जन्माला आला. शिवीगाळ झाली. लोकही जमा झाले. चाकू काढून पाहून घेण्याची धमकीदेखील देण्यात आली. मात्र, वाद वाढू नये, म्हणून त्यावेळी पोलीस ठाण्याची पायरी कुणी चढले नाही. त्या वादाचा वचपा म्हणून ३५ दिवसांनी एका तरुणाला तिघांनी चाकूने भोसकून ठार केले. फ्रेजरपुरा येथील कुळसंगे यांच्या घरासमोर २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली. यश तिलकचंद मंडले (२१, रा. फ्रेजरपुरा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

पानटपरीचालक यशच्या खुनाच्या आरोपाखाली फ्रेजरपुरा पोलिसांनी लागलीच ललित ऊर्फ बिट्टू फुलचंद गौतम (तिवारी)(२५, यशोदानगर नं. १), साहिल देवीदास चांदेकर (२०, उत्तमनगर गल्ली नं. १) व अनिकेत जयश्रीराम सुरसाऊत (२१, नमुना गल्ली नं. ६) यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०२, ३४१, ३४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तिघांनाही अटक करण्यात आली. याप्रकरणी मृताचा मोठा भाऊ शुभम मंडले याने २६ ऑक्टोबर रोजी पहाटे तक्रार नोंदविली.

यश ऊर्फ मटरू हा त्याच्या लहान चुलतभावासोबत पानठेल्याचा माल आणण्यासाठी बाजारात गेला. सायंकाळी ७ च्या सुमारास ते परत येत असताना कुळसंगे यांच्या घरासमोर यशची दुचाकी अडविली. साहिल चांदेकरने यशला पकडून दुचाकीच्या खाली पाडले, तर बिट्टू तिवारी याने यशच्या छातीवर, पोटावर, पाठीवर चाकूने अनेक वार केले. अनिकेत सुरसाऊतने यशला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यशला रक्तबंबाळ स्थितीत तेथेच टाकून तिघांनीही तेथून पळ काढला. त्याला तातडीने इर्विनमध्ये हलविण्यात आले. तेथून दोन खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. रात्री ८ ते ८.३० च्या सुमारास यशचा मृत्यू झाला. पुढील तपास ठाणेदार राहुलकुमार आठवले, पोलीस निरीक्षक नितीन मगर करीत आहेत.

अशी आहे पार्श्वभूमी

गणपती विसर्जनाच्या दिवशी २० सप्टेंबर रोजी संतोष भिमले याच्या घरी जेवणाचा कार्यक्रम होता. यश व शुभम मंडले हे दोघे भाऊ तेथे जेवण करण्यास गेले. रात्री १२ च्या सुमारास ते भिमले याच्या घराच्या बाहेर उभे असताना यशच्या ओळखीचा ललित ऊर्फ बिट्टू तिवारी हा तेथून पायी जात होता. यश त्याच्याकडे पाहत असल्याने बिट्टूने रागाने काय पाहतो, अशी विचारणा केली. यशला शिवीगाळदेखील करण्यात आली होती. त्या वैमनस्यातून यशला जिवे मारण्यात आले, अशी तक्रार शुभम मंडले याने नोंदविली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी