शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

फक्त पाहिले रागाने म्हणून 'गेम' केला तिघाने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2021 15:49 IST

रागाने पाहत असल्याचा गैरसमजातून वचपा म्हणून ३५ दिवसांनी एका तरुणाला तिघांनी चाकूने भोसकून ठार केले. अमरावतीच्या फ्रेजरपुरा येथे २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली. 

ठळक मुद्देजुने वैमनस्य, पुन्हा चायना चाकूतिघेही अटकेत : फ्रेजरपुरा येथे रक्तरंजित थरार

अमरावती : जुन्या वादातून तरुणाला चाकूने सपासप वार करत संपवल्याची घटना अमरावतीच्या फ्रेझरपुरा येथे सोमवारी संध्याकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटकेत घेतले.

रस्त्याने जात असताना समोरचा तरुण रागाने पाहत असल्याचा गैरसमज करीत त्यातून मोठा वाद जन्माला आला. शिवीगाळ झाली. लोकही जमा झाले. चाकू काढून पाहून घेण्याची धमकीदेखील देण्यात आली. मात्र, वाद वाढू नये, म्हणून त्यावेळी पोलीस ठाण्याची पायरी कुणी चढले नाही. त्या वादाचा वचपा म्हणून ३५ दिवसांनी एका तरुणाला तिघांनी चाकूने भोसकून ठार केले. फ्रेजरपुरा येथील कुळसंगे यांच्या घरासमोर २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली. यश तिलकचंद मंडले (२१, रा. फ्रेजरपुरा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

पानटपरीचालक यशच्या खुनाच्या आरोपाखाली फ्रेजरपुरा पोलिसांनी लागलीच ललित ऊर्फ बिट्टू फुलचंद गौतम (तिवारी)(२५, यशोदानगर नं. १), साहिल देवीदास चांदेकर (२०, उत्तमनगर गल्ली नं. १) व अनिकेत जयश्रीराम सुरसाऊत (२१, नमुना गल्ली नं. ६) यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०२, ३४१, ३४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तिघांनाही अटक करण्यात आली. याप्रकरणी मृताचा मोठा भाऊ शुभम मंडले याने २६ ऑक्टोबर रोजी पहाटे तक्रार नोंदविली.

यश ऊर्फ मटरू हा त्याच्या लहान चुलतभावासोबत पानठेल्याचा माल आणण्यासाठी बाजारात गेला. सायंकाळी ७ च्या सुमारास ते परत येत असताना कुळसंगे यांच्या घरासमोर यशची दुचाकी अडविली. साहिल चांदेकरने यशला पकडून दुचाकीच्या खाली पाडले, तर बिट्टू तिवारी याने यशच्या छातीवर, पोटावर, पाठीवर चाकूने अनेक वार केले. अनिकेत सुरसाऊतने यशला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यशला रक्तबंबाळ स्थितीत तेथेच टाकून तिघांनीही तेथून पळ काढला. त्याला तातडीने इर्विनमध्ये हलविण्यात आले. तेथून दोन खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. रात्री ८ ते ८.३० च्या सुमारास यशचा मृत्यू झाला. पुढील तपास ठाणेदार राहुलकुमार आठवले, पोलीस निरीक्षक नितीन मगर करीत आहेत.

अशी आहे पार्श्वभूमी

गणपती विसर्जनाच्या दिवशी २० सप्टेंबर रोजी संतोष भिमले याच्या घरी जेवणाचा कार्यक्रम होता. यश व शुभम मंडले हे दोघे भाऊ तेथे जेवण करण्यास गेले. रात्री १२ च्या सुमारास ते भिमले याच्या घराच्या बाहेर उभे असताना यशच्या ओळखीचा ललित ऊर्फ बिट्टू तिवारी हा तेथून पायी जात होता. यश त्याच्याकडे पाहत असल्याने बिट्टूने रागाने काय पाहतो, अशी विचारणा केली. यशला शिवीगाळदेखील करण्यात आली होती. त्या वैमनस्यातून यशला जिवे मारण्यात आले, अशी तक्रार शुभम मंडले याने नोंदविली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी