शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

माहोल हमने बिगाडा, हमारे लोगों ने बिगाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 01:00 IST

‘माहोल हमने बिगाडा, हमारे लोगोने बिगाडा’ अशी कबुली देणारा व्हिडीओ जुळ्या शहरात व्हायरल झाला आहे. यातील तो धमकावणारा कोण, तो पाच दिवसानंतरही मोकाट कसा, त्याच्या अन्य पसार साथीदारांची माहिती त्याच्याकडून का घेतली जात नाही, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

ठळक मुद्देव्हिडीओ व्हायरल : पोलिसांपुढे सार्वजनिक कबुली; आरोपी मोकाटच

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : ‘माहोल हमने बिगाडा, हमारे लोगोने बिगाडा’ अशी कबुली देणारा व्हिडीओ जुळ्या शहरात व्हायरल झाला आहे. यातील तो धमकावणारा कोण, तो पाच दिवसानंतरही मोकाट कसा, त्याच्या अन्य पसार साथीदारांची माहिती त्याच्याकडून का घेतली जात नाही, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. व्हिडीओमधील कबुली धक्कादायक मानली जात आहे.मंगळवारी रात्री ९.३० वाजता परतवाडा शहरात जुन्या वैमनस्यातून सल्लू ऊर्फ सलमान सय्यद रहमान याची हत्या करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी दीपक ऊर्फ झांशी शंकर कुंबलेले याला अटक केली. घटनेतील त्याचे दोन साथीदार लल्ला ठाकूर व पवन दोघेही पसार आहेत. पोलिसांना पाच दिवसानंतरही त्यांना अटक करण्यात यश आले नाही. हत्येतील आरोपी व मृत एकेकाळचे जीवलग मित्र होते. अंतर्गत बाबीमुळे दोघांतील कटुतेचे पर्यावसान हत्याप्रकरणात झाला. या प्रकरणाशी शहरातील व्यापारी तसेच प्रतिष्ठानांवर दगडफेक करून लुटमार व चाकुहल्ला करणाऱ्यांचा संबंध नसल्याचे आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. तो सुनियोजित कट असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या संदर्भाने बोलले जात आहे. व्यापारी प्रतिष्ठानांवर हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचा व्हिडीओ जुन्या शहरात व्हायरल होत आहे. पोलिसांनी सत्यता तपासून आरोपीला जेरबंद करण्याची मागणी व्यापाºयांनी केली आहे.नांगी ठेचणार का ?प्रतिष्ठानांवर बुधवारी सकाळी १० वाजता अचानक दगडफेक होताच सर्वत्र खळबळ उडाली होती. मोठा जमाव त्या ठिकाणी एकत्र आला. व्यापारी व उपस्थितांमध्ये तू-तू-मैं-मैं झाली. एका व्यापारी नेत्याने ‘माहोल किसने बिगाडा?’ असा थेट प्रश्न करताच, ‘हमने बिगाडे, हमारे लोगों ने बिगाडे!’ अशी सार्वजनिक कबुली देणारा आवाज त्या व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. थेट कबुली देणाºयास पकडून पोलीस त्याची नांगी ठेचणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.व्यापारी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत?दगडफेक व चाकुहल्ला प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा व्यापारपेठ बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा यापूर्वीच देण्यात आला होता. हल्लेखोर ५० ते ६० च्या संख्येने होते. त्यांच्यापैकी पाच दिवसांत सहा आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांचा संथ गतीचा तपास पाहता, व्यापारी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत आहेत. पोलिसांकडून सुरक्षिततेची हमी असताना, आरोपींना अटक करण्यात होत असलेली दिरंगाई व्यापाºयांमध्ये संताप व्यक्त करणारी ठरली आहे.