शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

न्यायासाठी आमचा संघर्ष, शासनाच्या दडपशाहीला बळी पडणार नाही; वीज कर्मचाऱ्यांची जोरदार घोषणाबाजी

By उज्वल भालेकर | Updated: January 4, 2023 13:27 IST

महावितरणच्या संपामध्ये शेकडो कर्मचारी सहभागी, कार्यालये पडली ओस

अमरावती : उर्जा क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपाच्या भितीमुळे राज्य शासनाने राज्यात सध्या महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम (मेस्मा) लागू केला आहे. परंतु तरीही महावितरणच्या अमरावती परिमंडळ कार्यालयासमोर शेकडो अधिकारी, कर्मचारीसंपात सहभागी झाले आहेत.  

सरकार हे दडपशाही पध्दतीने आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु उर्जा क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी याला बळी पडणार नसून ते आपल्या निर्णयावर ठाम आहे. हा संप खासगीकरणा विरोधात असून सर्वसामान्यांच्या न्यायासाठीची ही लढाई असल्याचे मत संपकऱ्यांनी व्यक्त केले. संपामुळे महावितरण कार्यालय ओस पडली आहेत.

डॉक्टरांनो, जनरेटरची व्यवस्था करून ठेवा; महावितरणचे रुग्णालयांना पत्र

उर्जा क्षेत्राचे खासगीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. समांतर वीज वितरण परवान्यामुळे अडाणी, अंबानी उर्जा क्षेत्रात गुंतवणूक करुन महावितरण, महानिर्मिती, महापारेषाण या राज्य शासनाच्या तीनही कंपन्याचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने समांतर वीज वितरण परवान्याला विरोध दर्शविण्यासाठी तसेच उर्जा क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या इतर प्रलंबित मागण्यासाठी तीन दिवसीय काम बंद संप पुकारला आहे. हा संप दडपण्यासाठीच राज्य शासनाने मेस्मा लागु केल्याचे संपकरी अधिकारी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

महावितरणच्या अमरावती परिमंडळ कार्यालयासमोर सुरु असलेल्या संपात शेकडो महावितरणचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे महावितरणची कार्यालये ओस पडली आहेत. शासनाने जर या संपाची दखल घेतली नाही तर बेमुदत संप पुकारण्याचा इशाराही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिला आहे. संपादरम्यान कर्मचाऱ्यांनी उर्जामंत्री देवेंद्र फडवणवीस व राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करुन आपली नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजEmployeeकर्मचारीStrikeसंपagitationआंदोलनAmravatiअमरावती