शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

Gandhi Jayanti Special : ...अन् राष्ट्रसंतांच्या भजनाने गांधीजींचेही मौन सुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 12:28 IST

राष्ट्रपिता-राष्ट्रसंतांची प्रथम भेट, सेवाग्राम आश्रमात एक महिना मुक्काम

संदीप राऊत 

तिवसा (अमरावती) : 

‘एक दिन जाना गांधीजी ने मेरा भजन अप्रतिमसे

वह कह गये, फिरसे कहो, रहते हुए भी मौनसे

हसते कहा फिर दुसरे दिन, मौन मेरा छूट गया

मै मस्त होने पर भजन मे, ख्याल से भी हट गया’

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या वाङ्मयातील ही आठवण त्यांच्या भजनातील माहात्म्य अधोरेखित करते. १४ जुलै १९३६ रोजी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रमात राष्ट्रपिता व राष्ट्रसंत या दोन महान विभूतींची प्रथमच भेट झाली. राष्ट्रसंतांना पाहताच महात्मा गांधी प्रभावित झाले होते. हे कुणी साधू-संत नसून देश कल्याणासाठी आपले जीवन समर्पित करणारे व समाजप्रबोधन करणारे महान युगप्रवर्तक असल्याची प्रचीती महात्मा गांधी यांना पहिल्या भेटीतच आली होती.

२४ फेब्रुवारी ते ५ मार्च १९३५ दरम्यान तुकडोजी महाराजांनी सालबर्डीच्या घनदाट जंगलात महारुद्र यज्ञाचे आयोजन केले होते. यामध्ये दहा लाखांवर महिला-पुरुषांना अन्नदान करण्यात आले; परंतु काही समाजकंटकांना महाराजांची समाजसेवा पचनी पडली नाही. त्यामुळे त्यांनी महाराजांच्या पावन कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

तुकड्याबुवा धनदांडग्यांकडून जमा केलेल्या धान्याची जंगलात वायफळ उधळण करीत बुवाबाजी करीत असल्याचा आरोप करण्यात आला. सत्यता जाणून घेण्यासाठी गांधीजींनी नागपूर येथील काँग्रेस नेते बाबूराव हरकरे व शंकरराव टिकेकर यांना आदेश देऊन महाराजांना सेवाग्राम आश्रमात येण्यासाठी संदेश पाठवला. प्रथम भेटीतच काहीही संवाद न साधता महाराजांबद्दल पसरविण्यात आलेला गैरसमज गांधीजींच्या मनातून चुटकीसरशी दूर झाला. एक महिन्याच्या सान्निध्यानंतर महाराजांनी सेवाग्राम आश्रमाचा निरोप घेतला त्यावेळी अतिशय जड अंतःकरणाने गांधीजी व आश्रमातील सेवेकऱ्यांनी महाराजांना अनुमती दिली. त्यावेळी गांधीजींनी महाराजांना एक चरखा भेट दिला.

म्हणूनच महाराज म्हणतात,

‘मै गांधीजी का नही शिष्य रहा,

ना गांधी कही मेरे भक्त रहे

पर प्रेम था हम दोनो मे बडा,

वह मिटा न सका कोई लाख कहे’

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीRashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराज