शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

Gandhi Jayanti Special : ...अन् राष्ट्रसंतांच्या भजनाने गांधीजींचेही मौन सुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 12:28 IST

राष्ट्रपिता-राष्ट्रसंतांची प्रथम भेट, सेवाग्राम आश्रमात एक महिना मुक्काम

संदीप राऊत 

तिवसा (अमरावती) : 

‘एक दिन जाना गांधीजी ने मेरा भजन अप्रतिमसे

वह कह गये, फिरसे कहो, रहते हुए भी मौनसे

हसते कहा फिर दुसरे दिन, मौन मेरा छूट गया

मै मस्त होने पर भजन मे, ख्याल से भी हट गया’

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या वाङ्मयातील ही आठवण त्यांच्या भजनातील माहात्म्य अधोरेखित करते. १४ जुलै १९३६ रोजी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रमात राष्ट्रपिता व राष्ट्रसंत या दोन महान विभूतींची प्रथमच भेट झाली. राष्ट्रसंतांना पाहताच महात्मा गांधी प्रभावित झाले होते. हे कुणी साधू-संत नसून देश कल्याणासाठी आपले जीवन समर्पित करणारे व समाजप्रबोधन करणारे महान युगप्रवर्तक असल्याची प्रचीती महात्मा गांधी यांना पहिल्या भेटीतच आली होती.

२४ फेब्रुवारी ते ५ मार्च १९३५ दरम्यान तुकडोजी महाराजांनी सालबर्डीच्या घनदाट जंगलात महारुद्र यज्ञाचे आयोजन केले होते. यामध्ये दहा लाखांवर महिला-पुरुषांना अन्नदान करण्यात आले; परंतु काही समाजकंटकांना महाराजांची समाजसेवा पचनी पडली नाही. त्यामुळे त्यांनी महाराजांच्या पावन कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

तुकड्याबुवा धनदांडग्यांकडून जमा केलेल्या धान्याची जंगलात वायफळ उधळण करीत बुवाबाजी करीत असल्याचा आरोप करण्यात आला. सत्यता जाणून घेण्यासाठी गांधीजींनी नागपूर येथील काँग्रेस नेते बाबूराव हरकरे व शंकरराव टिकेकर यांना आदेश देऊन महाराजांना सेवाग्राम आश्रमात येण्यासाठी संदेश पाठवला. प्रथम भेटीतच काहीही संवाद न साधता महाराजांबद्दल पसरविण्यात आलेला गैरसमज गांधीजींच्या मनातून चुटकीसरशी दूर झाला. एक महिन्याच्या सान्निध्यानंतर महाराजांनी सेवाग्राम आश्रमाचा निरोप घेतला त्यावेळी अतिशय जड अंतःकरणाने गांधीजी व आश्रमातील सेवेकऱ्यांनी महाराजांना अनुमती दिली. त्यावेळी गांधीजींनी महाराजांना एक चरखा भेट दिला.

म्हणूनच महाराज म्हणतात,

‘मै गांधीजी का नही शिष्य रहा,

ना गांधी कही मेरे भक्त रहे

पर प्रेम था हम दोनो मे बडा,

वह मिटा न सका कोई लाख कहे’

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीRashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराज