शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

महाराष्ट्र नं 1, राज्यात आदिवासींना 31 लाख एकर जमिनीचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 20:50 IST

आदिवासी बांधवांना वनहक्क मान्यता कायद्यानुसार जून अखेरपर्यंत 31 लाख एकर जमीन वाटप करण्यात आली आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र देशात जमीन वाटपात अव्वल ठरला आहे.

गणेश वासनिक 

अमरावती : आदिवासी बांधवांना वनहक्क मान्यता कायद्यानुसार जून अखेरपर्यंत 31 लाख एकर जमीन वाटप करण्यात आली आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र देशात जमीन वाटपात अव्वल ठरला आहे. आदिवासी बांधवांना ते कसत असलेली जमीन ही उपजीविकेचे साधन म्हणून उपलब्ध व्हावी, यासाठी वैयक्तिक वनहक्क, सामूहिक वनहक्क, अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) कायदा- 2006, वैयक्तिक व सामूहिक दाव्यांवरील अपिलाप्रमाणे ती वाटप केली जाते. जिल्हाधिकाऱ्यांच्या सनियंत्रणात आदिवासींना जमीन वाटपाची प्रक्रिया राबविली जाते. त्यानुसार आदिवासीबहुल क्षेत्रातील पालघर जिल्ह्यात सर्वाधिक जमीन वाटप करण्यात आली आहे. 

आदिवासींना जमीन वाटपाबाबत त्रिस्तरावरील समितीच्या माध्यमातून जमिनींचे वाटप करण्यात येते. यात काही प्रकरणे प्राथमिक स्तरावरच निकाली काढली जातात. तरीसुद्धा वैयक्तिक आणि सामूहिक दाव्यांबाबत राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन जमिनींचे वाटप केले आहे. आदिवासींना जमीन वाटप करताना एकूण 17 प्रकारच्या अटी-शर्तींचे पालन करण्याची नियमावली आहे. 13 डिसेंबर 2005 पूर्वी जमिनींवर आदिवासींचे अतिक्रमण असल्याबाबतची नोंद तपासून जमीनवाटप करण्यात आले आहे. लाभार्थी आदिवासी हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी, 21 वर्षे वय पूर्ण, वार्षिक उत्पन्न 3600 रुपये, महसूल विभागाने गाव नमुना ‘ई’ शासकीय जमीन अतिक्रमण नोंद आणि सन 1972 व 1978 मध्ये लाभ मिळाल्याबाबत खात्री केल्यानंतरच आदिवासींना जमीनवाटपाची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. त्यानुसार 15 हजार 500 गावांतील आदिवासींना वैयक्तिक वनहक्क दाव्यांमध्ये 3 लाख 25 हजार एकर, तर सामूहिक दाव्यांमध्ये 27 लाख 78 हजार एकर जमीनवाटप झाली. अमरावतीचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी वनमित्र मोहिमेंतर्गत उपविभागीय स्तरावरील वनहक्क समिती अंतर्गत सभा बोलावून आदिवासींना जमीनवाटपाची प्रक्रिया चालविली. 

अशी वाटप झाली जिल्हानिहाय जमीनजिल्हा                एकरपालघर           19777.78ठाणे                   3628.78अमरावती          60033.46नाशिक               26352औरंगाबाद           1132नांदेड                 129710पुणे                 25.10कोल्हापूर          633.30अहमदनगर         18838नंदूरबार           36945धुळे              61418जळगाव          6154नाशिक        26,353रायगड        1356.49

दऱ्याखोऱ्यात व रानावनात वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांना त्यांच्या उपजीविकेचे साधन उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्याअनुषंगाने आदिवासी क्षेत्रातील जिल्ह्यांमध्ये जमीनवाटपाची मोहीम राबविली. ती सकारात्मकपणे सुरू असून, यात राज्य आघाडीवर असल्याचा अभिमान आहे. 

सुधीर मुनगंटीवार,अर्थ व वनमंत्री, महाराष्ट्र. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारTrible Development Schemeआदिवासी विकास योजना