शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र नं 1, राज्यात आदिवासींना 31 लाख एकर जमिनीचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 20:50 IST

आदिवासी बांधवांना वनहक्क मान्यता कायद्यानुसार जून अखेरपर्यंत 31 लाख एकर जमीन वाटप करण्यात आली आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र देशात जमीन वाटपात अव्वल ठरला आहे.

गणेश वासनिक 

अमरावती : आदिवासी बांधवांना वनहक्क मान्यता कायद्यानुसार जून अखेरपर्यंत 31 लाख एकर जमीन वाटप करण्यात आली आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र देशात जमीन वाटपात अव्वल ठरला आहे. आदिवासी बांधवांना ते कसत असलेली जमीन ही उपजीविकेचे साधन म्हणून उपलब्ध व्हावी, यासाठी वैयक्तिक वनहक्क, सामूहिक वनहक्क, अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) कायदा- 2006, वैयक्तिक व सामूहिक दाव्यांवरील अपिलाप्रमाणे ती वाटप केली जाते. जिल्हाधिकाऱ्यांच्या सनियंत्रणात आदिवासींना जमीन वाटपाची प्रक्रिया राबविली जाते. त्यानुसार आदिवासीबहुल क्षेत्रातील पालघर जिल्ह्यात सर्वाधिक जमीन वाटप करण्यात आली आहे. 

आदिवासींना जमीन वाटपाबाबत त्रिस्तरावरील समितीच्या माध्यमातून जमिनींचे वाटप करण्यात येते. यात काही प्रकरणे प्राथमिक स्तरावरच निकाली काढली जातात. तरीसुद्धा वैयक्तिक आणि सामूहिक दाव्यांबाबत राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन जमिनींचे वाटप केले आहे. आदिवासींना जमीन वाटप करताना एकूण 17 प्रकारच्या अटी-शर्तींचे पालन करण्याची नियमावली आहे. 13 डिसेंबर 2005 पूर्वी जमिनींवर आदिवासींचे अतिक्रमण असल्याबाबतची नोंद तपासून जमीनवाटप करण्यात आले आहे. लाभार्थी आदिवासी हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी, 21 वर्षे वय पूर्ण, वार्षिक उत्पन्न 3600 रुपये, महसूल विभागाने गाव नमुना ‘ई’ शासकीय जमीन अतिक्रमण नोंद आणि सन 1972 व 1978 मध्ये लाभ मिळाल्याबाबत खात्री केल्यानंतरच आदिवासींना जमीनवाटपाची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. त्यानुसार 15 हजार 500 गावांतील आदिवासींना वैयक्तिक वनहक्क दाव्यांमध्ये 3 लाख 25 हजार एकर, तर सामूहिक दाव्यांमध्ये 27 लाख 78 हजार एकर जमीनवाटप झाली. अमरावतीचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी वनमित्र मोहिमेंतर्गत उपविभागीय स्तरावरील वनहक्क समिती अंतर्गत सभा बोलावून आदिवासींना जमीनवाटपाची प्रक्रिया चालविली. 

अशी वाटप झाली जिल्हानिहाय जमीनजिल्हा                एकरपालघर           19777.78ठाणे                   3628.78अमरावती          60033.46नाशिक               26352औरंगाबाद           1132नांदेड                 129710पुणे                 25.10कोल्हापूर          633.30अहमदनगर         18838नंदूरबार           36945धुळे              61418जळगाव          6154नाशिक        26,353रायगड        1356.49

दऱ्याखोऱ्यात व रानावनात वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांना त्यांच्या उपजीविकेचे साधन उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्याअनुषंगाने आदिवासी क्षेत्रातील जिल्ह्यांमध्ये जमीनवाटपाची मोहीम राबविली. ती सकारात्मकपणे सुरू असून, यात राज्य आघाडीवर असल्याचा अभिमान आहे. 

सुधीर मुनगंटीवार,अर्थ व वनमंत्री, महाराष्ट्र. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारTrible Development Schemeआदिवासी विकास योजना