शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
2
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
3
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
4
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
5
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
6
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 
7
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
8
मारुतीच्या 'या' SUV नं स्पर्धकांचं टेन्शन वाढवलं, मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये केली कमाल
9
जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...
10
दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले
11
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
12
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
13
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
14
प्रबोधिनी एकादशी २०२५: देवउठनी एकादशीला विष्णू खरोखरच ४ महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात का?
15
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
16
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
17
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
18
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
19
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
20
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट

महाराष्ट्र नं 1, राज्यात आदिवासींना 31 लाख एकर जमिनीचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 20:50 IST

आदिवासी बांधवांना वनहक्क मान्यता कायद्यानुसार जून अखेरपर्यंत 31 लाख एकर जमीन वाटप करण्यात आली आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र देशात जमीन वाटपात अव्वल ठरला आहे.

गणेश वासनिक 

अमरावती : आदिवासी बांधवांना वनहक्क मान्यता कायद्यानुसार जून अखेरपर्यंत 31 लाख एकर जमीन वाटप करण्यात आली आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र देशात जमीन वाटपात अव्वल ठरला आहे. आदिवासी बांधवांना ते कसत असलेली जमीन ही उपजीविकेचे साधन म्हणून उपलब्ध व्हावी, यासाठी वैयक्तिक वनहक्क, सामूहिक वनहक्क, अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) कायदा- 2006, वैयक्तिक व सामूहिक दाव्यांवरील अपिलाप्रमाणे ती वाटप केली जाते. जिल्हाधिकाऱ्यांच्या सनियंत्रणात आदिवासींना जमीन वाटपाची प्रक्रिया राबविली जाते. त्यानुसार आदिवासीबहुल क्षेत्रातील पालघर जिल्ह्यात सर्वाधिक जमीन वाटप करण्यात आली आहे. 

आदिवासींना जमीन वाटपाबाबत त्रिस्तरावरील समितीच्या माध्यमातून जमिनींचे वाटप करण्यात येते. यात काही प्रकरणे प्राथमिक स्तरावरच निकाली काढली जातात. तरीसुद्धा वैयक्तिक आणि सामूहिक दाव्यांबाबत राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन जमिनींचे वाटप केले आहे. आदिवासींना जमीन वाटप करताना एकूण 17 प्रकारच्या अटी-शर्तींचे पालन करण्याची नियमावली आहे. 13 डिसेंबर 2005 पूर्वी जमिनींवर आदिवासींचे अतिक्रमण असल्याबाबतची नोंद तपासून जमीनवाटप करण्यात आले आहे. लाभार्थी आदिवासी हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी, 21 वर्षे वय पूर्ण, वार्षिक उत्पन्न 3600 रुपये, महसूल विभागाने गाव नमुना ‘ई’ शासकीय जमीन अतिक्रमण नोंद आणि सन 1972 व 1978 मध्ये लाभ मिळाल्याबाबत खात्री केल्यानंतरच आदिवासींना जमीनवाटपाची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. त्यानुसार 15 हजार 500 गावांतील आदिवासींना वैयक्तिक वनहक्क दाव्यांमध्ये 3 लाख 25 हजार एकर, तर सामूहिक दाव्यांमध्ये 27 लाख 78 हजार एकर जमीनवाटप झाली. अमरावतीचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी वनमित्र मोहिमेंतर्गत उपविभागीय स्तरावरील वनहक्क समिती अंतर्गत सभा बोलावून आदिवासींना जमीनवाटपाची प्रक्रिया चालविली. 

अशी वाटप झाली जिल्हानिहाय जमीनजिल्हा                एकरपालघर           19777.78ठाणे                   3628.78अमरावती          60033.46नाशिक               26352औरंगाबाद           1132नांदेड                 129710पुणे                 25.10कोल्हापूर          633.30अहमदनगर         18838नंदूरबार           36945धुळे              61418जळगाव          6154नाशिक        26,353रायगड        1356.49

दऱ्याखोऱ्यात व रानावनात वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांना त्यांच्या उपजीविकेचे साधन उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्याअनुषंगाने आदिवासी क्षेत्रातील जिल्ह्यांमध्ये जमीनवाटपाची मोहीम राबविली. ती सकारात्मकपणे सुरू असून, यात राज्य आघाडीवर असल्याचा अभिमान आहे. 

सुधीर मुनगंटीवार,अर्थ व वनमंत्री, महाराष्ट्र. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारTrible Development Schemeआदिवासी विकास योजना