शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; 'भाजपानुकूल मतदारसंघ ऐनवेळी सेनेला देणे नडले'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 01:42 IST

मेळघाटात झालेल्या पराभवाचे समीकरण सूर्यवंशी यांनी मांडले. मेळघाट हा आदिवासींचा प्रांत अशीच ओळख असली तरी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून गैरआदिवासींची संख्यादेखील तेथे महत्त्वपूर्ण ठरणारी आहे. गवळी, मालविय, खाटीक, कलाल, गवलान, बलई या समाजघटकांचा त्यात समावेश आहे. या गैरआदिवासी मंडळींचे एकत्रित मतदान तब्बल ३५ ते ३८ टक्के आहे.

ठळक मुद्देभाजपच्या मतांचा टक्का वाढला : दर्यापुरात 'स्थानिक नेतृत्त्वा'ची घाई, मेळघाटात गैरआदिवासी मतांचा फटका

गणेश देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कभाजपच्या मतांची टक्केवारी वाढली असली तरी विधानसभा निवडणुकीचे निकाल अनपेक्षित आणि धक्कादायकच आहेत. त्यासाठीची कारणमीमांसा आम्ही सुरू केली आहे. सामान्यांच्या अपेक्षापूर्तीत संघटना कुठे कमी पडली, हेदेखील आम्ही जाणून घेणार आहोत. तसे बदल करून चूक सुधारली जाईल , अशी ग्वाही भाजपचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) दिनेश सूर्यवंशी यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. जिल्ह्यात भाजपचे पानीपत का झाले, याची चर्चा तोंडोतोंडी आहे. संघटनेचा प्रमुख चेहरा असलेले दिनेश सूर्यवंशी हे पराभवाची कारणमीमांसा कशी करतात, हे आम्ही 'लोकमत'च्या वाचकांसाठी जाणून घेतले.मेळघाटात झालेल्या पराभवाचे समीकरण सूर्यवंशी यांनी मांडले. मेळघाट हा आदिवासींचा प्रांत अशीच ओळख असली तरी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून गैरआदिवासींची संख्यादेखील तेथे महत्त्वपूर्ण ठरणारी आहे. गवळी, मालविय, खाटीक, कलाल, गवलान, बलई या समाजघटकांचा त्यात समावेश आहे. या गैरआदिवासी मंडळींचे एकत्रित मतदान तब्बल ३५ ते ३८ टक्के आहे. आदिवासींसाठी आपुलकीचा असलेला; परंतु गैरआदिवासींमध्ये असुरक्षितता निर्माण करणाऱ्या पेसा या कायद्याचा नियोजनबद्धरीत्या अपपप्रचार करण्यात आला. तो खोडून काढण्यात आम्ही अपयशी ठरलो. त्याचा परिणाम झाला असा की, कधी नव्हे ते गैरआदिवासी मतदार भाजप उमदेवाराविरुद्ध ताकदीने एकवटले. घाटपायथ्याला अचलपूरजजीक ९० बुथ होते. 'पेसा'च्या बागुलबुव्यामुळे तेथेही अपक्ष राजकुमार पटेलांना एकतर्फी मतदान झाले.दर्यापुरात अनुकूल स्थिती असताना भाजपला 'डॅमेज' होईल, अशी स्थिती भाजपच्या 'स्थानिक नेतृत्त्वा'ने निर्माण केली. लोकसभेत हार झाल्यानंतर सीमा सावळे या नवख्या नि परक्या उमेदवाराला दर्यापुरातून लढविण्याची आश्चर्यकारक घाई केली गेली. सावळेंना तिकीट न मिळाल्यामुळे रमेश बुंदिले यांनी विकास केला नसल्याचा प्रचार सावळेंनी केला. स्वत: सावळे यांनीही १८-१९ हजार मते घेतली. सावळेंना शब्द देऊन त्यांच्या आशा पल्लवित करण्याची घाई करणाºया 'स्थानिक नेतृत्त्वा'ने सावळेंना भाजपविरुद्ध बंडखोरी करून देण्याची जबाबदारी मात्र पार पाडली नाही. पक्षाला त्याची किंमत चुकवावी लागली. 'स्थानिक नेतृत्त्व' म्हणजे कोण, या प्रश्नाच्या उत्तरात माझ्यासकट कुणीही असू शकेल, असे उत्तर त्यांनी दिले.मोर्शी मतदारसंघाला मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची धुरा सोपविल्यावर मतदारसंघ अनुकूल असणे अपेक्षित होते. तसे नसेल तर तो अनुकूल करण्यासाठीची आवश्यक ती उपाययोजना करता यावी, असे सामर्थ्य पक्षाने पालकमंत्री अनिल बोंडे यांना बहाल केले होतेच. काही अंतर्गत बाबींवर मी त्यांना अवगत केले होते; अंतिम निर्णय त्यांना घ्यावयाचे होते.तिवस्याबाबत कमालीचे 'कॉन्फिडन्ट' असलेले सूर्यवंशी म्हणतात, 'तेथे कमळ फुललेच असते.' मोठा कालावधी देऊन भाजपने 'नरीश' केलेला तो मतदारसंघ ऐनवेळी शिवसेनला देण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेण्यात आला. भाजपजन नाऊमेद झाले. मी तरीही पदाधिकारी, कार्यकर्त्यांना चेतवित ठेवले. नवख्या राजेश वानखडे यांनी यशोमती ठाकुरांना काट्याची टक्कर दिली, त्याचे प्रमुख श्रेय अर्थातच् भाजपच्या श्रमाला द्यावे लागेल. आताही सांगतो, तेथे कमळावर उमेदवार उभा केला असता, तर यशोमतींना पराभूत व्हावेच लागले असते!तिवस्याचीच पुनराववृत्ती अचलपुरात झाली. ऐनवेळी मतदारसंघ शिवसेनेला दिला गेला. काय साध्य झाले ते सर्वांसोर आहेच.शिवसेनेला बडनेरा वगळता इतर दोन मतदारसंघ मुळीच सोडू नये, अशी आमची आग्रही मागणी होती. तरीही ते सेनेला देण्यामागे वरिष्ठांचे काही नियोजन असेल; पण स्थानिक पातळीवर त्याचा विपरीत परिणाम इतरही मतदारसंघांवर झाला. जिल्हाभरातील भाजप संघटनेत अनुत्साह निर्माण झाला, हा मुद्दा संघटनेला लक्षात घ्यावाच लागणार आहे. निर्णायक संख्येत असलेल्या परंपरागत मतदारांना अमरावती जिल्ह्यात प्रतिनिधीत्त्व देऊन त्यांची सन्मानपूर्वक दखल घेण्याचे राहून गेल्याचा मुद्दाही त्यांनी चर्चेदरम्यान अधोरेखित केला.हल्लीची भाजप ओबीसी, मराठा ओरीएन्टेडप्रमोद महाजन यांच्या काळात ओबीसींना संघटनेत मुख्य प्रवाहात सामिल करून घ्यावे, राज्यात संख्येने सर्वाधिक असलेल्या मराठा समाजाला नेतृत्त्वसंधी द्यावी, असा विचार मांडला गेला. तेव्हापासून भाजपात ओबीसी, मराठा मुख्य प्रवाहात आलेत.- अन् परिश्रम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा उत्साह मावळलाभाजपने सातत्याने परिश्रम घेऊन अनेक मतदारसंघांची जोपासना केली. तळागाळातील कार्यकर्त्यांनीही त्यासाठी जीव ओतला. संघटनेचे कर्तव्य या नात्याने विधानसभा निवडणूक येईपर्यंत आम्ही भाजपसाठी जमिन सुपीक करवून ठेवली. ऐनवेळी मतदारसंघ सेनेच्या वाट्याला गेल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह मावळला.

टॅग्स :amravati-acअमरावती