शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

अचलपूर तालुक्याचा भूजलस्तर विदर्भात सर्वात कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 23:06 IST

बोअरवेलद्वारे भूगर्भातील पाण्याचा झालेला अमर्याद उपसा व त्या तुलनेत जलपुनर्भरण होत नसल्याने सध्या अचलपूर तालुक्यातील भूजलस्तरात कमालीची घट आली आहे. पाच वर्षांपूर्वीच्या १२.३६ मी. पातळीच्या तुलनेत सध्याची सरासरी पातळी १८.३० मी.पर्यंत कमी झाली आहे.

ठळक मुद्दे‘जीएसडीए’चे निरीक्षण : पाच वर्षांच्या तुलनेत उणे ५.९४ मीटरने पातळीत घट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बोअरवेलद्वारे भूगर्भातील पाण्याचा झालेला अमर्याद उपसा व त्या तुलनेत जलपुनर्भरण होत नसल्याने सध्या अचलपूर तालुक्यातील भूजलस्तरात कमालीची घट आली आहे. पाच वर्षांपूर्वीच्या १२.३६ मी. पातळीच्या तुलनेत सध्याची सरासरी पातळी १८.३० मी.पर्यंत कमी झाली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जाहीर अहवालात हे धक्कादायक निरीक्षण नोंदविलेले आहे.जिल्ह्याच्या ऊत्तरेकडील धारणी, चिखलदरा व मध्यापासून दक्षिणेकडील अमरावती, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, मोर्शी, तिवसा व वरूडचा भाग डेक्कन बेसाल्ट या खडकाचे प्रस्तराने व्याप्त आहे. पूर्णा नदीच्या खोऱ्यातील चांदूर बाजार, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, दर्यापूर व भातकुली तालुक्यांमध्ये पूर्णा नदीच्या गाळाचा प्रदेश आहे. यातील दर्यापूर भातकुली, अंजनगाव सूर्जी व चांदूर बाजार तालुक्याचा काही भाग खारपाणपट्यात समाविष्ट आहे.जिल्ह्याचा ७५ टक्के भूभाग बसॉल्ट खडकाने व २५ टक्के पूर्णा नदीच्या गाळाने व्यापलेला आहे. याची १० ते १२ मीटरपर्यंतची खोली भूजल पुनर्भरणास योग्य आहे. मात्र, सलग तीन वर्षांपासून जिल्ह्यात सरासरीच्या किमान २५ ते २८ टक्के पाऊस कमी होत आहे. त्यामुळे अपेक्षित भूजल पुनर्भरण झालेले नाही. त्यामुळे लघुपाणलोट क्षेत्रातील (रन आॅफ झोन) निरीक्षण विहिरींतील पाणी पातळीत घट झाली आहे. त्यामुळेच आता या परिसरातील गावांना पाणीटंचाईची झळ पोहचत आहे. मोर्शी व वरूड भाग अतिविकसित पाणलोट क्षेत्र विहिरी व विंधन विहिरीद्वारे अमर्याद पाण्याचा उपसा झाल्याने भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. आता अचलपूर व चांदूरबाजार तालुक्याच्या काही भागात हीच स्थिती ओढावली असल्याने भूजल पातळीत कमालीची घट झालेली आहे. सध्याही रबी हंगाम व बहुवार्षिक पिकांसाठी पाण्याचा अमर्याद उपसा होत असल्याने भूजलस्तर दिवसागणिक कमी होत असल्याचे हे निरीक्षण आगामी काळासाठी धक्कादायक ठरणारे आहे.पावसाचा खंड अन् अमर्याद उपसाजिल्ह्यात साधारणपणे आॅगस्ट व सप्टेंबर हा पावसाळ्याचा कालखंड भूजल पुनर्भरणाचा असतो. मात्र, या कालावधीत पावसाचा प्रदीर्घ खंड राहिल्याने खरिपासाठी भूजलाचा अमर्याद उपसा झाला. परिणामी भूजल पातळीत झपाट्याने घट झाली. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने ही स्थिती ओढावली. यंदा भूगर्भाचे पुनर्भरण न झाल्यास या तालुक्याची स्थिती गंभीर होणार आहे. जलयुक्त शिवारची कामेदेखील पारदर्शकपणे होणे या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे आहे.बोअरने केली भूगर्भाची चाळणभूजलस्तरात कमी होत असल्याने या तालुक्यातील विहिरींना आता पाणीच नाही. त्यामुळे विंधन विहिरींवर अधिक जोर आहे. त्याद्वारे पुन्हा पाण्याचा अमर्याद उपसा होत आहे. साधारणपणे ४० फुटांपर्यंत वाळूचा थर असतो. त्याखाली ४० फुटांपर्यंत चोपन व काळ्या मातीचा थर व पुन्हा ११० ते १२० फुटांपर्यंत वाळूचा थर, अशी साधारण येथील रचना आहे. मात्र, बोअरद्वारे पाणी उपस्याच्या तुलनेत पुनर्भरण होत नसल्याने या तालुक्याची पातळी दिवसेंदिवस खोल जात असल्याचे वास्तव पुढे येऊ लागले आहे.अचलपूर, चांदूरबाजार तालुक्याची भूजलस्तर स्थिती१ अचलपूर ताालुक्यात सात निरीक्षण विहिरींची पाच वर्षांतील मार्च महिन्याची सरासरी पातळी १२.३६ मीटर आहे. त्यातुलनेत यंदा याच महिन्यात १८.३० मीटर झालेली आहे. म्हणजेच उणे ५.९४ मी. एवढी तूट सध्या आहे.२ चांदूर बाजार तालुक्यात सात निरीक्षण विहिरींची पाच वर्षांतील मार्च महिन्याची सरासरी स्थिर पातळी ११.७३ मीटर आहे. त्यातुलनेत यंदा याच महिन्यात १५.४० मीटर झालेली आहे. म्हणजेच उणे ३.६७ मी. एवढी तूट सध्या आहे.जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत पर्जन्यमान कमी झाल्याने पुनर्भरण होण्याच्या काळात उपसा झाला व सध्याही बोअरद्वारे अमर्याद उपसा होत आहे. त्यामुळे भूजल पातळीत घट झाली. मात्र, जलयुक्तच्या कामांमुळे गतवर्षीच्या तलनेत स्थिरता आहे.- विजय कराड,वरिष्ठ भूवैज्ञानिक, जीएसडीए