शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

चांदूरमध्ये कमी दाबाचा वीजपुरवठा

By admin | Updated: November 8, 2014 22:31 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांना महावितरण कंपनीकडून सातत्याने कमी दाबाचा वीज पुरवठा केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरीवर विद्युत पंप जळत असून या प्रकाराने शेतकरी हैराण झाले आहेत.

सुमित हरकुट - चांदूरबाजारतालुक्यातील शेतकऱ्यांना महावितरण कंपनीकडून सातत्याने कमी दाबाचा वीज पुरवठा केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरीवर विद्युत पंप जळत असून या प्रकाराने शेतकरी हैराण झाले आहेत. शेतकरी आधीच भारनियमनाने त्रस्त झाला आहे. आता तर तो मरणासन्न अवस्थेत पोहोचला आहे. भारनियमनात शेतकऱ्यांना विद्युत पंपासाठी दररोज सहा तासच वीज पुरवठा केला जातो. आठवड्यातून एक दिवस पूर्णत: २४ तास वीज पुरवठा बंद असतो. उर्वरित सहा दिवसांत रोज केवळ सहा तास शेतकऱ्यांना शेतीकरिता वीज मिळते. यातील तीन दिवस दिवसा व उर्वरित तीन दिवस रात्री १२ वाजतानंतर वीज पुरवठा होते. त्यामुळे शेतकऱ्यांना सहा दिवसांत फक्त २४ तास वीज मिळते. आठवड्याला मिळणाऱ्या या २४ तास विजेपैकी सर्वदूरपर्यंत चार तास या-ना त्या कारणाने वीजपुरवठा बंद असतो. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रत्यक्षात २० तासच विद्युत पुरवठा होत असल्याचे वास्तव आहे. हा वीजपुरवठादेखील अत्यंत कमी दाबाने होतो. या कमी दाबाच्या विजेमुळे शेतकऱ्यांची विहिरीवरील विद्युत उपकरणे सुरूच होत नाहीत. त्यामुळे विद्युत संच जळून जातो. त्यामुळे दुरूस्तीचा पाच ते आठ हजारांचा नाहक भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. खरीप हंगामातील सोयाबीन पीक पूर्णत: शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे. कापूस व संत्रा पिकावर शेतकऱ्यांच्या थोड्याफार आशा आहेत. परंतु महावितरणने शेतकऱ्यांच्या या आशेवरही पाणी फेरल्याचे चित्र दिसत आहे. सोयाबीनमुळे पार उद्ध्वस्त झालेला शेतकरी रबी पिकाचे नियोजन करीत आहे. अशा वेळी विजेअभावी पाणी मिळत नसल्याने रबीचे पीकही हातचे जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ब्रेकडाऊनच्या नावाखाली दिवसा तासन्तास वीजपुरवठा खंडित केला जातो. वीज कंपनीने वेळीच या समस्येची दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे.