शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

तेरवी आटोपलेला १७ वर्षांनंतर सापडला ग्वाल्हेरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2022 19:50 IST

Amravati News घरातून निघून गेलेला व्यक्ती आता या जगात नाही असे समजून घरच्यांनी त्याची तेरवी केली. मात्र तब्बल १७ वर्षांनी तो सापडला आणि घरी परतल्याची घटना अमरावती जिल्ह्यात घडली.

ठळक मुद्देस्वयंसेवकांनी ३० नवलगावात घेतला नातेवाइकांचा शोध व्हॅलेंटाईन डेला आली जिवंत असल्याची माहिती

अमरावती : तालुक्यातील नवलगाव येथील रानू तान्या बेठेकर (५४) हा इसम २००५ साली घरून निघून गेला होता. तब्बल १२ वर्षे घरच्यांनी शोध घेतल्यानंतर तो न सापडल्याने २०१७ मध्ये त्याची घरी तेरवीही आटोपली. मात्र, सदर इसम हा मध्य प्रदेशात ग्वाल्हेर जिल्ह्यातील गुढागुढी येथे जिवंत असल्याचा निरोप आला आणि घरच्या लोकांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

ग्वाल्हेर येथील स्वर्ग सदन या सामाजिक संस्थेचे संचालक विकास गोस्वामी यांना ५ जून २०२० रोजी रेल्वे स्टेशनवर रानू तान्या बेठेकर हा इसम आढळला. त्यावेळी ते त्याला आपल्या आश्रमात घेऊन गेले. तेव्हापासून तेथेच तो राहत होता. मनोरुग्णासारखे वर्तन असल्याने कोण, कुठला गावाचा, ही माहिती मिळत नव्हती. त्याच्यावर उपचार झाल्यानंतर घर, गाव, नातेवाईकांबद्दल तो विचारू लागला. तेव्हा इंटरनेटच्या माध्यमातून नवलगावासंदर्भात माहिती मिळविण्यात आली. सहा महिन्यांपासून सतत संस्थेचे अधिकारी, स्वयंसेवक ३० पेक्षा अधिक नवलगावात जाऊन आले आणि अखेर मेळघाटातील नवलगावात नातेवाईक आढळले.

व्हॅलेंटाईन डे ठरला गोड

रानू बेठेकर यांचा शोध घेत असताना विविध मोबाईल क्रमांकावर माहिती टाकण्यात आली. राहू येथे मोबाईल शॉपी चालविणारे संदीप घुमारे यांच्याकडे आलेली माहिती त्यांनी पंचायत समिती सदस्य नानाकराम ठाकरे यांना छायाचित्र आणि माहिती दिली आणि इथून जिवंत असल्याची आनंदाची बातमी मिळाली. अशाप्रकारे व्हॅलेंटाईन डे गोड झाला.

रात्रीतून बेपत्ता, १२ वर्षे शोध अन् बाप-लेकाची तेरवी

रानू बेठेकर शेती आणि मजुरीचे काम करीत होते. मानसिक संतुलन बिघडल्याने १७ वर्षांपूर्वी अचानक रात्री घरातून बेपत्ता झाले. घरात पत्नी, सहा वर्षाचा मुलगा, चार धाकटे भाऊ, तीन बहिणी असा त्यांचा परिवार गुण्यागोविंदाने नांदत होता. बारा वर्षे शोध घेतल्यानंतर त्यांच्यासह वडील तान्या बेठेकर यांची तेरवी परिजनांनी आटोपली.

मुलगा अपरिचित

रविवारी नातेवाइकांनी वर्गणी गोळा करून ग्वाल्हेर गाठले. मुलगा सुनील, भाऊ खानु, नानकराम ठाकरे, बाबू बेठेकर, जोगीलाल अखंडे, संदीप घुमारे, प्रज्वल येवले, गणेश बेठेकर आदींनी स्वर्ण सदन आश्रम गाठले. मुलगा सुनीलला त्यांनी ओळखले नाही. मात्र, भावासोबत कोरकूमध्ये संवाद साधला. सर्व सोपस्कार आटोपून सोमवारी रात्री त्यांना परत आणण्यात आले.

टॅग्स :Socialसामाजिक