शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

तेरवी आटोपलेला १७ वर्षांनंतर सापडला ग्वाल्हेरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2022 19:50 IST

Amravati News घरातून निघून गेलेला व्यक्ती आता या जगात नाही असे समजून घरच्यांनी त्याची तेरवी केली. मात्र तब्बल १७ वर्षांनी तो सापडला आणि घरी परतल्याची घटना अमरावती जिल्ह्यात घडली.

ठळक मुद्देस्वयंसेवकांनी ३० नवलगावात घेतला नातेवाइकांचा शोध व्हॅलेंटाईन डेला आली जिवंत असल्याची माहिती

अमरावती : तालुक्यातील नवलगाव येथील रानू तान्या बेठेकर (५४) हा इसम २००५ साली घरून निघून गेला होता. तब्बल १२ वर्षे घरच्यांनी शोध घेतल्यानंतर तो न सापडल्याने २०१७ मध्ये त्याची घरी तेरवीही आटोपली. मात्र, सदर इसम हा मध्य प्रदेशात ग्वाल्हेर जिल्ह्यातील गुढागुढी येथे जिवंत असल्याचा निरोप आला आणि घरच्या लोकांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

ग्वाल्हेर येथील स्वर्ग सदन या सामाजिक संस्थेचे संचालक विकास गोस्वामी यांना ५ जून २०२० रोजी रेल्वे स्टेशनवर रानू तान्या बेठेकर हा इसम आढळला. त्यावेळी ते त्याला आपल्या आश्रमात घेऊन गेले. तेव्हापासून तेथेच तो राहत होता. मनोरुग्णासारखे वर्तन असल्याने कोण, कुठला गावाचा, ही माहिती मिळत नव्हती. त्याच्यावर उपचार झाल्यानंतर घर, गाव, नातेवाईकांबद्दल तो विचारू लागला. तेव्हा इंटरनेटच्या माध्यमातून नवलगावासंदर्भात माहिती मिळविण्यात आली. सहा महिन्यांपासून सतत संस्थेचे अधिकारी, स्वयंसेवक ३० पेक्षा अधिक नवलगावात जाऊन आले आणि अखेर मेळघाटातील नवलगावात नातेवाईक आढळले.

व्हॅलेंटाईन डे ठरला गोड

रानू बेठेकर यांचा शोध घेत असताना विविध मोबाईल क्रमांकावर माहिती टाकण्यात आली. राहू येथे मोबाईल शॉपी चालविणारे संदीप घुमारे यांच्याकडे आलेली माहिती त्यांनी पंचायत समिती सदस्य नानाकराम ठाकरे यांना छायाचित्र आणि माहिती दिली आणि इथून जिवंत असल्याची आनंदाची बातमी मिळाली. अशाप्रकारे व्हॅलेंटाईन डे गोड झाला.

रात्रीतून बेपत्ता, १२ वर्षे शोध अन् बाप-लेकाची तेरवी

रानू बेठेकर शेती आणि मजुरीचे काम करीत होते. मानसिक संतुलन बिघडल्याने १७ वर्षांपूर्वी अचानक रात्री घरातून बेपत्ता झाले. घरात पत्नी, सहा वर्षाचा मुलगा, चार धाकटे भाऊ, तीन बहिणी असा त्यांचा परिवार गुण्यागोविंदाने नांदत होता. बारा वर्षे शोध घेतल्यानंतर त्यांच्यासह वडील तान्या बेठेकर यांची तेरवी परिजनांनी आटोपली.

मुलगा अपरिचित

रविवारी नातेवाइकांनी वर्गणी गोळा करून ग्वाल्हेर गाठले. मुलगा सुनील, भाऊ खानु, नानकराम ठाकरे, बाबू बेठेकर, जोगीलाल अखंडे, संदीप घुमारे, प्रज्वल येवले, गणेश बेठेकर आदींनी स्वर्ण सदन आश्रम गाठले. मुलगा सुनीलला त्यांनी ओळखले नाही. मात्र, भावासोबत कोरकूमध्ये संवाद साधला. सर्व सोपस्कार आटोपून सोमवारी रात्री त्यांना परत आणण्यात आले.

टॅग्स :Socialसामाजिक